शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

आषाढात श्रावणाची प्रचिती!

By admin | Updated: July 4, 2017 18:54 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस, अद्याप तेरा बंधारे पाण्याखाली

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0४ : जिल्ह्यात मंगळवारी पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. काही वेळ ऊन, तर त्यानंतर जोरदार सरी कोसळत राहिल्याने ऐन आषाढात श्रावणाची प्रचिती अनुभवावयास येत आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस असून अद्याप विविध नद्यांवरील तेरा बंधारे पाण्याखाली आहेत.

गेले तीन-चार दिवस पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. मंगळवारी सकाळी खडखडीत ऊन पडले होते. नऊनंतर हलक्या सरी कोसळत राहिल्या. दुपारी पुन्हा ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिला. साधारणत: श्रावण महिन्यात ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळतो; पण यंदा चक्क आषाढ महिन्यातच याची प्रचिती आली.

सायंकाळनंतर पुन्हा जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रात सरासरी ५० मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस घटप्रभा धरणक्षेत्रात ९० मिलिमीटर झाला आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी २१ फुटांपर्यंत खाली आली असून, अद्याप पंचगंगा नदीवरील सहा, भोगावती नदीवरील तीन, तर कासारी नदीवरील चार असे तेरा बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात एका घराची अंशत: पडझड होऊन सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे.

आज ‘तरणा’ पाऊस निघणार!

मृगाच्या हुलकावणीनंतर ‘आर्द्रा’ नक्षत्रकाळात जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिके जोमात आहेत. आज, बुधवारपासून ‘पुनर्वसू’ नक्षत्र निघत आहे. उत्तररात्री ४ वाजून ३९ मिनिटांनी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करीत असून वाहन ‘कोल्हा’ आहे. या काळातही चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.

तालुकानिहाय मिलिमीटरमध्ये पाऊस असा-

हातकणंगले- ४.५०, शिरोळ- ४.८५, पन्हाळा- १४.२८, शाहूवाडी- २०.३३, राधानगरी- ३२.६७, गगनबावडा- १९.५०, करवीर- ७.९०, कागल- २३.१४, गडहिंग्लज- १०.८५, भुदरगड- २३, आजरा- २४, चंदगड- ३३.८३.