शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शरद पवार यांनी सांगूनही राष्ट्रवादी देणं विसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST

कोल्हापूर : आमच्यासाठी विधानपरिषद कधीच महत्त्वाची नव्हती, तो जीवन-मरणाचा प्रश्नदेखील नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील बैठकीत ठरल्याप्रमाणे शरद पवार यांनी ...

कोल्हापूर : आमच्यासाठी विधानपरिषद कधीच महत्त्वाची नव्हती, तो जीवन-मरणाचा प्रश्नदेखील नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील बैठकीत ठरल्याप्रमाणे शरद पवार यांनी सव्वा वर्षांपूर्वी बारामतीत बोलावून घेत विधानपरिषदेची एक जागा देऊ, असे स्वत: सांगितले होते. लोकसभेला केलेल्या मदतीच्या बदल्यात हे राष्ट्रवादी देणे लागत होती, पण आता ती देणे विसरली आहे, अशी टीका स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

राजू शेट्टी हे सध्या राज्य सरकारविरोधात पूरग्रस्तांनी काढलेल्या पदयात्रेचे नेतृत्व करत आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत या आमदारांच्या नियुक्तीबाबत सकारात्मक निर्णय लवकरच होणार आहे. पण या १२ जणांच्या यादीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टीचे नाव कापण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोकसभा निवडणूकीपुर्वी दिल्लीत शरद पवार यांच्यासमवेत माझी बैठक झाली होती. यावेळी लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली होती, पण पवार यांनी लोकसभेऐवजी विधानपरिषदेवर घेऊ, असा पर्याय दिला होता. जून २०१९मध्ये बारामतीमध्ये स्वत: पवार यांनी बोलावून घेत विधानपरिषदेसाठी तुमचे नाव राष्ट्रवादीच्या कोट्यातून देत असल्याचे सांगितले आणि ही जागा तुम्ही स्वत: स्वीकारावी, असेही सांगितले. पण त्यानंतर पुढे सव्वा वर्षात यासंदर्भात मी कुणालाही भेटलो नाही, चर्चा केली नाही, भेटलो असेल तर पुढे येऊन सांगावे. विधानपरिषद आमच्यासाठी महत्त्वाची नाही, आमदारकी आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न कधीच नव्हती. फक्त राष्ट्रवादी देणं लागत होती, ते त्यांनी दिले नाही. सध्या पूरग्रस्तांच्या प्रश्नाशिवाय आमच्यादृष्टीने काहीही महत्त्वाचे नाही.