शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

शेतकरी ‘सुकाणू समिती’चा शंखध्वनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:41 IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, यांसह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात शंखध्वनी केला. सरकार दरबारी मागण्या करून थकल्याने बारा महिने आमच्यासोबत प्रामाणिकपणे असलेला मुका बैलच जिल्हाधिकाºयांशी बोलेल, असा आग्रह धरत ‘बैल-एक्का’ आत नेण्यावरून आंदोलनकर्ते व पोलिसांत चांगलीच खडाजंगी उडाली.महावीर गार्डन ...

कोल्हापूर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, यांसह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात शंखध्वनी केला. सरकार दरबारी मागण्या करून थकल्याने बारा महिने आमच्यासोबत प्रामाणिकपणे असलेला मुका बैलच जिल्हाधिकाºयांशी बोलेल, असा आग्रह धरत ‘बैल-एक्का’ आत नेण्यावरून आंदोलनकर्ते व पोलिसांत चांगलीच खडाजंगी उडाली.महावीर गार्डन येथून महाराष्टÑ राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या मोर्चास सुरुवात झाली. ‘बैल-एक्क्या’तून सविनय कायदेभंग फॉर्म ठेवून माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली.सरकार बहिरे झाल्याने आम्ही आता त्यांच्याशी बोलणार नाही, माणसाची भाषा कळत नसल्याने मालकाशी इमानीइतबारे राहणारा मुका बैलच आमची व्यथा जिल्हाधिकाºयांसमोर मांडेल. त्यामुळे तरी प्रशासनाचे डोळे उघडतात काय पाहू, असे सांगून संपतराव पवार यांनी ‘बैल-एक्का’ जिल्हाधिकारी कार्यालयात घालण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी एक्का आवारात घेण्यास हस्तक्षेप केल्याने पवार व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यामध्ये खडाजंगी उडाली.त्यानंतर झालेल्या सभेत संपतराव पवार यांनी सरकारसह जिल्हा प्रशासनावर सडकून टीका केली. राज्य व केंद्रातील सरकार हे लबाडांचे असून, ते कष्टकरी जनतेला ताकदीच्या बळावर दाबून टाकत आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी केवळ रस्त्यांवर उतरून चालणार नाही. गावागावांत सरकारविरोधात बंड उभे केल्याशिवाय आपण जगू शकणार नाही. इंग्रजांच्या काळात देखील लोकशाही मार्गाने होणाºया आंदोलनाला कधी विरोध झाला नाही. सध्याच्या काळ्या ब्रिटिशांना बैलाचे एवढे वावडे का? अशी विचारणा पवार यांनी केली.यावेळी किसान सभेचे प्रा. नामदेव गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.आंदोलनावेळी बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, बाबासाहेब देवकर, केरबा भाऊ पाटील, अंबाजी पाटील, एकनाथ पाटील, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, वसंतराव पाटील, प्रमोद पाटील, संग्राम पाटील-म्हाळुंगेकर, दिलीप देसाई, आदी उपस्थित होते.सरकारचे नाक मोडते का ?आम्ही लोकशाही मार्गाने, तेही शांततेत शेतकºयांच्या भावना बैल-एक्क्याच्या माध्यमातून मांडत असताना पोलिसांनी दडपशाही चालविली. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना आदेश दिल्याने आम्हाला रोखले गेले. बैल-एक्का आत गेल्याने सरकारचे नाक मोडते का ? अशी टीका पवार यांनी केली.पोलीस कर्मचाºयाने फॉर्म स्वीकारलेसुकाणू समितीने निवेदनाऐवजी बैल-एक्क्यातून सविनय कायदेभंगाचे फॉर्म आणले होते. ते बैल-एक्क्यातून जिल्हाधिकाºयांच्या कक्षाबाहेर ओतण्याचा आंदोलनकर्त्यांचा आग्रह होता. पोलिसांनी मज्जाव केल्याने प्रवेशद्वारातच पोलीस कर्मचाºयाने ते फॉर्म स्वीकारले.