शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

शौमिका महाडिक, राजू मगदूम यांच्यात खडाजंगी; कोल्हापूर जिल्हा परिषद दणाणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:56 IST

कोल्हापूर : यशवंत ग्राम पुरस्कार निवडीचे निमित्त होऊन जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्षा शौमिका महाडिक व माणगावचे उपसरपंच व महिला ...

कोल्हापूर : यशवंत ग्राम पुरस्कार निवडीचे निमित्त होऊन जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्षा शौमिका महाडिक व माणगावचे उपसरपंच व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू मगदूम यांच्यात जोरदार वादावादी झाली. पंधरा मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या शाब्दिक खडाजंगीने अध्यक्षांच्या अ‍ॅँटीचेंबरसह जिल्हा परिषद दणाणली. अखेर बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर व गटनेते अरुण इंगवले यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविल्याने प्रकरण शांत झाले. मगदूम या आवाडे गटाचे सदस्य आहेत.यशवंत ग्राम पुरस्कारासाठी गावांची निवड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आजरा तालुक्यातील हत्तीवडे आणि हातकणंगलेतील माणगाव या दोन गावांना समान गुण मिळाल्याने पुरस्कार निवडीचा गुंता निर्माण झाला आहे. यावर जिल्हा परिषदेत धुसफूस सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या संदर्भात अध्यक्षा महाडिक यांनी माणगावचे उपसरपंच मगदूम यांना बैठकीसाठी बोलावले; पण स्वत: त्याच कार्यालयात उपस्थित नसल्याने बैठक होऊ शकली नाही. अखेर दुपारी सव्वाचारच्या सुमारास पुन्हा एकदा मगदूम यांना बोलावले. अध्यक्षांच्या अ‍ॅँटीचेंबरमध्ये बैठक सुरू होती. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आवाडे हेही उपस्थित होते. मगदूम यांनी ‘तुम्ही पाच गुण वाढवून देतो असे म्हटला होता, त्याचे काय झाले?’ अशी विचारणा केली, ‘हत्तीवडे गावाची लोकसंख्या एक हजार आहे, आमच्या गावची १६ हजार आहे. आम्हाला डावलले तर आम्ही सगळा गाव जिल्हा परिषदेत आणू,’ असे त्यांनी सांगितले. यावर भडकलेल्या महाडिक यांनी ‘राजू मगदूम, तुम्ही पेपरबाजी करता; मी खपवून घेणार नाही,’ असे सुनावले.यावर मगदूम यांनीही ‘आवाज वाढवून बोलायचे नाही; तुम्ही आमच्या मालक नाही. हळू आवाजात बोलायचे,’ असे सांगताच दोघांमध्ये जोरदार वादाला सुरुवात झाली. ‘लहानसहान गोष्टींत राजकारण करताय; निदान मोठे तरी करा,’ असे महाडिक यांनी सुनावले. याला मगदूम यांनीही ‘आम्ही लहानच राजकारण करणार; तुम्ही मोठे करा,’ असे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले. एकेरीवर आलेला वाद हातघाईवर येणार म्हटल्यावर बांधकाम सभापती पेरीडकर व इंगवले यांनी हस्तक्षेत करीत दोघांनाही शांत केले. वाद मिटला तरी यावरून जिल्हा परिषदेचे वातावरण चांगलेच तापले होते.इशारे काय देता..सत्तेतून बाहेर पडा : महाडिकहा वाद सुरू असतानाच सदस्य राहुल आवाडे यांनी हस्तक्षेप करीत ‘अध्यक्षांप्रमाणे वागा,’ असे म्हणताच भडकलेल्या महाडिक यांनी ‘सारखा-सारखा इशारा काय देता? सत्तेतून बाहेर पडा!’ असे सुनावले. यावर मगदूम यांंनी, तुम्हाला सांगूनच बाहेर पडतो. तुम्ही करवीरच्या सभापतींचा राजीनामा काही तासांत मंजूर केला; महिला बालकल्याण सभापतींचा राजीनामा मंजूर करण्यासाठी दहा दिवस घालवल्याची आठवण करून दिली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.सत्ताधाऱ्यांमध्येच धुमशानसत्ताधाºयांमध्येच वाद होण्याची जिल्हा परिषदेतील गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. चार दिवसांपूर्वी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे व सदस्य राहुल आवाडे यांच्यात सायकल वाटपावरून वादावादी झाली. यापूर्वी सर्वसाधारण सभेतही असाच वाद झाला होता. आता सत्ताधारी अध्यक्ष व महिला बालकल्याणच्या सभापतीचे पती यांच्यात झालेल्या वादाने संघर्ष कोणत्या टोकावर पोहोचलाय, याची झलक दिसत आहे.आकांडतांडव करणे चुकीचे : महाडिकनिकाल जाहीर करण्यापूर्वी आकांडतांडव करणे चुकीचे आहे. अध्यक्ष म्हणून माझा या निर्णय प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप नाही. राजू मगदूम हे अधिकाºयांवर दबाब आणतात. गैरसमज पसरवतात. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे, म्हणून त्यांना सुनावले. मी कधीही सावत्रपणाची भूमिका घेतलेली नाही, असे महाडिक यांनी सांगितले.अध्यक्षांनी पदाला शोभेल असे वागावे : आवाडेअध्यक्षा महाडिक यांनी पदाला शोभेल असे समजूतदारपणे आणि जबाबदारीने वागणे अपेक्षित होते; पण याऐवजी त्या एकेरीवर येऊन सदस्यांशी बोलतात. दादागिरीची भाषा करणे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. नेत्यांच्या कानांवर या गोष्टी घातल्या जाणार आहेत असे सदस्य राहूल आवाडे यांनी सांगितले.न्यायासाठीच भांडलो : मगदूममाझ्या गावाची लोकसंख्या जास्त असतानाही जाणीवपूर्वक डावलले जात असल्याबद्दल अध्यक्षांकडे रीतसर तक्रार केली. स्वत: अध्यक्षांनीच केबिनमध्ये बोलावल्यामुळे गेलो असताना तेथे चर्चेऐवजी आमच्यावरच पेपरबाजी करीत असल्याचा आरोप करीत त्या जाब विचारतात, हे योग्य नाही. न्यायासाठी भांडलो आणि यापुढेही भांडत राहणार असल्याचे माणगांवचे उपसरपंच राजू मगदूम यांनी सांगितले.