शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बैठकीमध्ये शौमिका-अमलची हजेरी-: ‘मातोश्री’वर माझी तक्रार जाता कामा नये - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:55 IST

एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा

ठळक मुद्देलोकसभेसाठी व्यूहरचना

कोल्हापूर : एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करा. आपण कमी पडलो म्हणून माझी तक्रार ‘मातोश्री’वर जाणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.

येथील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्टÑ संघटनमंत्री रवी अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी, चंदगड, कागल विधानसभा मतदार संघनिहाय पालकमंत्री पाटील यांनी पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन केले.युती झाल्याने कोणी मनात संभ्रम बाळगण्याची गरज नाही. आपली दिशा स्पष्ट असून, युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचे आहे; यासाठीकार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करावे. प्रचार करताना यंत्रणेबाबत मित्रपक्षाला तसदी न देता, त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नका. स्वत:ची यंत्रणा राबवा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, हेमंत कोलेकर, राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, आर. डी. पाटील, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, मामा कोळवणकर, मारुती भागोजी, अशोक लोहार, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, अनिल देसाई, नगरसेवक विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, संभाजी जाधव, किरण नकाते, विजयसिंह खाडे, जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता कुंभार, गीता गुरव, भाग्यश्री शेटके उपस्थित होते.कुणाच्या भागात किती मते चेक करणारही निवडणूक युतीसाठी महत्त्वाची आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एक आणि एक जागा महत्त्वाची आहे; त्यामुळे कोल्हापुरातून संजय मंडलिक यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. कोणत्याच बाबतीत आपण कमी पडता कामा नये. निवडणुकीनंतर कोणत्या भागातून किती मतदान मिळाले, याचा आढावा नगरसेवकांसह जिल्हा परिषद सदस्यांकडून घेतला जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर