शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

भाजपच्या बैठकीमध्ये शौमिका-अमलची हजेरी-: ‘मातोश्री’वर माझी तक्रार जाता कामा नये - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:55 IST

एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा

ठळक मुद्देलोकसभेसाठी व्यूहरचना

कोल्हापूर : एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करा. आपण कमी पडलो म्हणून माझी तक्रार ‘मातोश्री’वर जाणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.

येथील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्टÑ संघटनमंत्री रवी अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी, चंदगड, कागल विधानसभा मतदार संघनिहाय पालकमंत्री पाटील यांनी पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन केले.युती झाल्याने कोणी मनात संभ्रम बाळगण्याची गरज नाही. आपली दिशा स्पष्ट असून, युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचे आहे; यासाठीकार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करावे. प्रचार करताना यंत्रणेबाबत मित्रपक्षाला तसदी न देता, त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नका. स्वत:ची यंत्रणा राबवा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, हेमंत कोलेकर, राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, आर. डी. पाटील, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, मामा कोळवणकर, मारुती भागोजी, अशोक लोहार, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, अनिल देसाई, नगरसेवक विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, संभाजी जाधव, किरण नकाते, विजयसिंह खाडे, जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता कुंभार, गीता गुरव, भाग्यश्री शेटके उपस्थित होते.कुणाच्या भागात किती मते चेक करणारही निवडणूक युतीसाठी महत्त्वाची आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एक आणि एक जागा महत्त्वाची आहे; त्यामुळे कोल्हापुरातून संजय मंडलिक यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. कोणत्याच बाबतीत आपण कमी पडता कामा नये. निवडणुकीनंतर कोणत्या भागातून किती मतदान मिळाले, याचा आढावा नगरसेवकांसह जिल्हा परिषद सदस्यांकडून घेतला जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर