शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

भाजपच्या बैठकीमध्ये शौमिका-अमलची हजेरी-: ‘मातोश्री’वर माझी तक्रार जाता कामा नये - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:55 IST

एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा

ठळक मुद्देलोकसभेसाठी व्यूहरचना

कोल्हापूर : एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करा. आपण कमी पडलो म्हणून माझी तक्रार ‘मातोश्री’वर जाणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.

येथील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्टÑ संघटनमंत्री रवी अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी, चंदगड, कागल विधानसभा मतदार संघनिहाय पालकमंत्री पाटील यांनी पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन केले.युती झाल्याने कोणी मनात संभ्रम बाळगण्याची गरज नाही. आपली दिशा स्पष्ट असून, युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचे आहे; यासाठीकार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करावे. प्रचार करताना यंत्रणेबाबत मित्रपक्षाला तसदी न देता, त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नका. स्वत:ची यंत्रणा राबवा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, हेमंत कोलेकर, राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, आर. डी. पाटील, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, मामा कोळवणकर, मारुती भागोजी, अशोक लोहार, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, अनिल देसाई, नगरसेवक विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, संभाजी जाधव, किरण नकाते, विजयसिंह खाडे, जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता कुंभार, गीता गुरव, भाग्यश्री शेटके उपस्थित होते.कुणाच्या भागात किती मते चेक करणारही निवडणूक युतीसाठी महत्त्वाची आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एक आणि एक जागा महत्त्वाची आहे; त्यामुळे कोल्हापुरातून संजय मंडलिक यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. कोणत्याच बाबतीत आपण कमी पडता कामा नये. निवडणुकीनंतर कोणत्या भागातून किती मतदान मिळाले, याचा आढावा नगरसेवकांसह जिल्हा परिषद सदस्यांकडून घेतला जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर