शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडी तालुक्यात शेतीचे भाव गगनाला भिडले

By admin | Updated: October 23, 2014 22:50 IST

जमिनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक : कर्मचारीवर्गाचा शेती खरेदी करण्याकडे कल

सरूड : वर्षभर राबराब-राबूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे शेतीच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना जमत नाही़ शेती व्यवसाय करणे म्हणजे वर्षाकाठी डोक्यावर कर्ज करून घेणे ही व्याख्या आता शेतकऱ्यांत रूढ झाली आहे़, असे असताना व्यापारी, डॉक्टर मंडळी व अधिकाऱ्यांनी शेतीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढीव दराने करणे सुरू केल्याने शाहूवाडी तालुक्यात शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत़वडिलोपार्जित जमीन आहे आणि स्वत:ला नोकरी नाही अथवा कोणता व्यवसाय नाही म्हणून काही तरी करावे लागते, म्हणून शेती करणाऱ्यांंची संख्या अधिक आहे़ खरीप हंगाम उजाडताच पावसाळ्यात पेरणीसाठी वेळेवर खते मिळत नाहीत म्हणून महिन्याआधीच खते खरेदी करण्यासाठी बाजारात चकरा माराव्या लागतात़ खते व बियाणे खरेदी करण्यापासून शेतकऱ्यांना अडते, व्यापारी, बँका व सावकाराकडून दरवर्षी व्याजाने पैसे घ्यावे लागतात़. खते, बियाणे खरेदी व शेतीवर वर्षभर करावा लागणारा खर्च, सालगड्याचा खर्च वजा जाता शेतकरी शेतीच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकत नाही़, अशी भयावह व सत्य परिस्थिती शेतकऱ्यांची आहे़ शेतीसाठी लागणारा प्रचंड खर्च व त्या मानाने मिळणारा नाममात्र भाव यामुळे धानविक्री करून सगळे देणे झाल्यानंतर वर्षभर सुखाने जीवन जगू शकेल इतका पैसादेखील शेतकऱ्यांंजवळ राहत नाही, यामुळे शेतकरीवर्ग शेतीला कंटाळला आहे.अधिकारी वर्ग, डॉक्टर, अभियंता व मोठे व्यापारी महिन्याला लाखो रूपये कमवितात. यातील ८० टक्के रक्कम बचत होते. या रकमेला बँकेमध्ये अत्यंत कमी व्याजदर मिळतो. इतर उद्योगांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर स्वतंत्र लक्ष ठेवावे लागते. मात्र, एवढा वेळ या मंडळींकडे नाही. त्यामुळे या मंडळींचा जमीन खरेदी करण्याकडे कल असल्याचे दिसून येते. जमिनीमधून खर्चाएवढेही उत्पादन होत नसले तरी जमिनीच्या किमती मात्र दरवर्षी वाढत चालल्या आहेत व भविष्यातही त्यामध्ये वाढ होणार आहे. ही बाब या मंडळींना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे.त्याचबरोबर घेतलेली जमीन पडीत असली तरी शेतीमधून उत्पन्न दाखवून इन्कम टॅक्स वाचविला जातो. भविष्यात मुलाला नोकरी न मिळाल्यास शेवटचा पर्याय म्हणूनदेखील शेती केली जाते. त्यामुळे शेती हा घाट्याचा व्यवसाय असूनसुद्धा जमिनीच्या किमती इतर वस्तूंपेक्षा वेगाने वाढत आहेत. (वार्ताहर)भू-माफियांच्या मगरमिठीत अडकला शेतकरीरस्त्यालगतच्या शेतीला अवाजवी भाव देऊन भू-माफिया शेती शेतकऱ्यांकडून स्वत:च्या ताब्यात घेत आहेत. हा शेतीचा व्यवहार फक्त एका करारनाम्यावर केला जातो़ त्या जागेचा अकृषक करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जातो़ सरकारी बाबूंना पैशाचे आमिष दाखवून अवैधरीत्या शेतीचे प्लॉटमध्ये रूपांतर केले जाते. हा प्लॉट विक्रीसाठी बुकिंगच्या नावाने काढला जातो़ या सर्व खेळात शेतकऱ्याला पडद्यामागे ठेवले जात आहे. केवळ रजिस्टरच्या वेळी शेतकऱ्यांना समोरो केले जाते़ शेतकऱ्यांच्या हातावर थोडीशी रक्कम ठेवून त्याला मोकळे केले जाते. त्यानंतर प्लॉट पाडून कोट्यवधी रुपये कमाविण्याचा रोजगार सुरू झाला आहे.