शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडी तालुक्यात शेतीचे भाव गगनाला भिडले

By admin | Updated: October 23, 2014 22:50 IST

जमिनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक : कर्मचारीवर्गाचा शेती खरेदी करण्याकडे कल

सरूड : वर्षभर राबराब-राबूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे शेतीच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना जमत नाही़ शेती व्यवसाय करणे म्हणजे वर्षाकाठी डोक्यावर कर्ज करून घेणे ही व्याख्या आता शेतकऱ्यांत रूढ झाली आहे़, असे असताना व्यापारी, डॉक्टर मंडळी व अधिकाऱ्यांनी शेतीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढीव दराने करणे सुरू केल्याने शाहूवाडी तालुक्यात शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत़वडिलोपार्जित जमीन आहे आणि स्वत:ला नोकरी नाही अथवा कोणता व्यवसाय नाही म्हणून काही तरी करावे लागते, म्हणून शेती करणाऱ्यांंची संख्या अधिक आहे़ खरीप हंगाम उजाडताच पावसाळ्यात पेरणीसाठी वेळेवर खते मिळत नाहीत म्हणून महिन्याआधीच खते खरेदी करण्यासाठी बाजारात चकरा माराव्या लागतात़ खते व बियाणे खरेदी करण्यापासून शेतकऱ्यांना अडते, व्यापारी, बँका व सावकाराकडून दरवर्षी व्याजाने पैसे घ्यावे लागतात़. खते, बियाणे खरेदी व शेतीवर वर्षभर करावा लागणारा खर्च, सालगड्याचा खर्च वजा जाता शेतकरी शेतीच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकत नाही़, अशी भयावह व सत्य परिस्थिती शेतकऱ्यांची आहे़ शेतीसाठी लागणारा प्रचंड खर्च व त्या मानाने मिळणारा नाममात्र भाव यामुळे धानविक्री करून सगळे देणे झाल्यानंतर वर्षभर सुखाने जीवन जगू शकेल इतका पैसादेखील शेतकऱ्यांंजवळ राहत नाही, यामुळे शेतकरीवर्ग शेतीला कंटाळला आहे.अधिकारी वर्ग, डॉक्टर, अभियंता व मोठे व्यापारी महिन्याला लाखो रूपये कमवितात. यातील ८० टक्के रक्कम बचत होते. या रकमेला बँकेमध्ये अत्यंत कमी व्याजदर मिळतो. इतर उद्योगांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर स्वतंत्र लक्ष ठेवावे लागते. मात्र, एवढा वेळ या मंडळींकडे नाही. त्यामुळे या मंडळींचा जमीन खरेदी करण्याकडे कल असल्याचे दिसून येते. जमिनीमधून खर्चाएवढेही उत्पादन होत नसले तरी जमिनीच्या किमती मात्र दरवर्षी वाढत चालल्या आहेत व भविष्यातही त्यामध्ये वाढ होणार आहे. ही बाब या मंडळींना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे.त्याचबरोबर घेतलेली जमीन पडीत असली तरी शेतीमधून उत्पन्न दाखवून इन्कम टॅक्स वाचविला जातो. भविष्यात मुलाला नोकरी न मिळाल्यास शेवटचा पर्याय म्हणूनदेखील शेती केली जाते. त्यामुळे शेती हा घाट्याचा व्यवसाय असूनसुद्धा जमिनीच्या किमती इतर वस्तूंपेक्षा वेगाने वाढत आहेत. (वार्ताहर)भू-माफियांच्या मगरमिठीत अडकला शेतकरीरस्त्यालगतच्या शेतीला अवाजवी भाव देऊन भू-माफिया शेती शेतकऱ्यांकडून स्वत:च्या ताब्यात घेत आहेत. हा शेतीचा व्यवहार फक्त एका करारनाम्यावर केला जातो़ त्या जागेचा अकृषक करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जातो़ सरकारी बाबूंना पैशाचे आमिष दाखवून अवैधरीत्या शेतीचे प्लॉटमध्ये रूपांतर केले जाते. हा प्लॉट विक्रीसाठी बुकिंगच्या नावाने काढला जातो़ या सर्व खेळात शेतकऱ्याला पडद्यामागे ठेवले जात आहे. केवळ रजिस्टरच्या वेळी शेतकऱ्यांना समोरो केले जाते़ शेतकऱ्यांच्या हातावर थोडीशी रक्कम ठेवून त्याला मोकळे केले जाते. त्यानंतर प्लॉट पाडून कोट्यवधी रुपये कमाविण्याचा रोजगार सुरू झाला आहे.