शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

नर्सरी बागेत शाहू महाराजांची समाधी

By admin | Updated: April 10, 2015 00:31 IST

महापालिकेचा निर्णय : अखेर समाधीची इच्छा पूर्ण होणार; पहिल्या टप्प्यात होणार ६७ लाख खर्च

कोल्हापूर : समाजोद्धाराचे कार्य करणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची समाधीची अखेरची इच्छा आता पूर्ण होणार आहे. ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी शककर्ते शिवाजी महाराज, ताराराणी यांची मंदिरे निर्माण केली, त्याच नर्सरी बागेत महापालिकेच्यावतीने पहिल्या टप्प्यात ६७ लाख रुपये खर्चून शाहू महाराजांचे समाधिस्थळ विकसित करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईची फळे आजही कोल्हापूरला मिळत असली तरी महाराजांची कोल्हापुरात समाधी नाही. कसबा बावडा परिसरातील शाहू जन्मस्थळाचे काम रडतखडत आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. राजर्षी शाहू महाराजांनी नर्सरी बागेत नितांत श्रद्धेतून शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांचे मंदिर बांधले. शिवाजी महाराजांच्या मंदिरामागे छत्रपती घराण्यातील राजे व महाराणीसाहेबांच्या, अगदी राजर्षी शाहू महाराजांच्याही आई-वडिलांचीही समाधी मंदिरे आहेत; पण आज त्यांची अवस्था न सांगण्यासारखी आहे. शाहू महाराजांचे मुंबईतील ‘पन्हाळा लॉज’ या बंगल्यात ६ मे १९२२ रोजी निधन झाले. तत्पूर्वी, त्यांनी माझ्या मृत्यूनंतरही रघुनाथ पंडित महाराज व माझी ताटातूट होऊ नये यासाठी पंचगंगा घाटावर असलेल्या रघुनाथ पंडित महाराज यांच्या समाधिमंदिराशेजारी माझे समाधिमंदिर व्हावे, या आशयाचे पत्र लिहून ठेवले होते. मात्र त्यावेळी ते शक्य झाले नाही; पण महाराजांच्या निधनानंतर त्याच वर्षी महाराजांनी सत्यशोधक टी स्टॉल ज्यांना उघडून दिला, त्या गंगाराम कांबळे व सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांनी मिळून नर्सरी बागेत शाहू महाराजांची समाधी बांधली. तिची छायाचित्रे आणि कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. या समाधिस्थळाच्या परिसरात राजाराम महाराजांच्या काळात शालिनी क्लबची स्थापना झाली. येथे टेबल टेनिस खेळले जात असे. या खेळात समाधीचा अडथळा होऊ लागला म्हणून ती समाधीच तेथून काढून टाकण्यात आली. त्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराजांची समाधीच नव्हती. तीन-चार वर्षांपूर्वी शाहू महाराजांची समाधी पूर्वी ज्या परिसरात होती, तेथेच ती पुन्हा उभारण्याचा विचार पुढे आला. या जागेवर महापालिकेने ग्रीन झोनचे आरक्षण टाकले होते; पण शाहू महाराजांच्या समाधीचा विषय मांडल्यानंतर हे ग्रीन झोनचे आरक्षण उठवून त्यावर समाधिस्थळाचे आरक्षण टाकण्यात आले. महापालिकेच्या सभेत राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचा ठराव करून तो शासनाला पाठविण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात त्याची टेंडर प्रक्रियाही सुरू होईल, असे अधिकृत सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)४८ फूट उंचीची समाधी साकारणारनर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणींचे मंदिर हा परिसर छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल व मैदान हा परिसर महापालिकेच्या ताब्यात आहे; पण महापालिकेने या पूर्ण परिसराचा विकास आराखडा बनविला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च चार ते पाच कोटींपर्यंत अपेक्षित आहे. यामध्ये बगीचा, आंबेडकर हॉलची पुनर्बांधणी यांचा समावेश आहे. महापालिकेने आता समाधिस्थळासाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या ठिकाणी काळ्या पाषणात शाहू महाराजांची ४८ फूट उंचीची समाधी बांधण्यात येणार आहे. त्यावर छत्री असेल. समाधीच्या चारीही बाजूंना रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीप्रमाणे शिल्प उभारण्यात येणार आहे. यावर छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी केलेली वक्तव्ये कोरण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यात महाराजांच्या इच्छेनुसार येथेच रघुनाथ पंडित महाराज यांचीही समाधी उभारण्यात येणार आहे. आपली समाधी रघुनाथ पंडित यांच्या समाधीच्या शेजारी असावी, असे पत्र शाहू महाराजांनी लिहून ठेवले आहे; पण कोल्हापुरात त्यांची समाधीच नव्हती. आता महापालिकेने समाधी बांधण्याचा निर्णय घेतल्याने शाहू महाराजांची इच्छा पूर्ण होईल. - इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक