शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा नितीन कोळी सीमेवर लढताना शहीद

By admin | Updated: October 30, 2016 00:55 IST

दुधगाववर शोककळा : दिवाळी साजरी न करण्याचा गावाचा निर्णय -पुण्यात आज पार्थिव

सांगली/दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी (वय २८) जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडाजवळील मच्छली सेक्टर येथे शुक्रवारी मध्यरात्री शहीद झाले. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. ते शहीद झाल्याचे वृत्त समजताच दुधगाववर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आणि दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.नितीन कोळी यांच्या पश्चात आई सुमन, वडील सुभाष, भाऊ उल्हास, पत्नी संपदा, मुले देवराज व युवराज असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव विमानाने रविवारी दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे. तेथून दुधगाव या त्यांच्या जन्मगावी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. नितीन कोळी यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. २००८ मध्ये ते सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते.शुक्रवारी ते सहकाऱ्यांसोबत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाजवळील मच्छली सेक्टरजवळ कर्तव्य बजावत होते. रात्री साडेनऊ वाजता पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार सुरू झाला. यावेळी झालेल्या चकमकीत कोळी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले होते. उपचार सुरू असताना मध्यरात्री अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कोळी शहीद झाल्याचे वृत्त शनिवारी सकाळी गावात येऊन धडकले. त्यांच्या कुटुंबास बऱ्याच वेळानंतर माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून दुपारी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शोकसभा घेऊन कोळी यांना आदरांजली वाहिली. गावात दिवाळी साजरी करायची नाही तसेच कोणीही फटाके फोडायचे नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा आडमुठे, उपसरपंच संजय देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी, विश्वास कोळी, विलास आवटी उपस्थित होते. घरावर लावण्यात आलेले आकाशदिवे ग्रामस्थांनी स्वत:हून काढले. गावातील प्रमुख कर्मवीर चौकासह सर्वत्र दिवसभर शुकशुकाट होता. कोळी यांचे पार्थिव रविवारी पुण्यात आणण्यात येणार आहे. तेथून दुधगाव येथे आणले जाणार आहे. (प्रतिनिधी)कुटुंबाचा आधार हरपलाकुटुंबाचा आधार हरपलाशहीद जवान नितीन कोळी यांचे वडील सुभाष कोळी म्हणाले की, लहानपणापासून नितीनची सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. आमची घरची परिस्थिती बेताचीच होती, तरीही मी कष्ट करून नितीनला शिकविले. सैन्यात भरती होण्यासाठी त्याला आम्ही पाठबळ दिले. भरती होण्यासाठी त्यानेही खूप कष्ट केले. त्याच्या कष्टाला यश मिळाले. आठ वर्षांपूर्वी तो भरती झाला. तो शहीद झाल्याने कुटुंबाचा आधार गेला असून, फार मोठे नुकसान झाले आहे. ते कधीही न भरूनयेणारे आहे.\पत्नीशी चार दिवसांपूर्वीच मोबाईलवर संपर्कनितीन कोळी यांनी चार दिवसांपूर्वी पत्नी संपदा यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून कुटुंबाची विचारपूस केली होती. ५ नोव्हेंबरला गावी सुटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले, पण शुक्रवारी रात्री गोळीबारात ते शहीद झाले. पत्नीशी मोबाईलवर बोलल्यानंतर काही दिवसांतच ते शहीद झाल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. शनिवारी दुपारपर्यंत घरी वडील व भावालाच ते शहीद झाल्याचे माहीत होते.मे महिन्यात सुटीलानितीन कोळी मे महिन्यात गावाकडे सुटीला आले होते. नवरात्रौत्सवात ब्रह्मनाथ कल्चरल ग्रुपतर्फे गावातील सैन्य दलात असलेल्या जवानांचा सत्कार ठेवण्यात आला होता. त्यावेळी ३२ जवान सुटीसाठी गावाकडे आले होते. या सर्वांचा सत्कार केला होता, पण या कार्यक्रमास कोळी यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांची पत्नी संपदा यांचा सत्कार करण्यात आला होता.घराजवळ शुकशुकाटदुधगावातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकालगत कोळी यांचे घर आहे. शनिवारी दुपारी घराजवळ शुकशुकाट होता. पत्नी व आईला ते शहीद झाल्याचे सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे घराचे लोखंडी गेटही बंद केले होते. शेजारील चार-पाच ग्रामस्थ तेथे बसून होते. कोळी यांची मुले देवराज (वय चार) आणि युवराज (वय दोन) घरातच होती.