शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

शहरभान कॉलम-०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST

जो मानवी समूह आपल्या सामाजिक जीवनाला आणि सामाजिक व्यवहाराला एक प्रकारची शिस्त लावून घेतो आणि ही शिस्त, संस्था निर्माण ...

जो मानवी समूह आपल्या सामाजिक जीवनाला आणि सामाजिक व्यवहाराला एक प्रकारची शिस्त लावून घेतो आणि ही शिस्त, संस्था निर्माण करून राबवतो, त्या समूहाला ‘नागरी समाज’ म्हटले जाते. नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या संस्थांची निर्मिती नागरिकांच्या सामाजिक जीवनाला आणि सामाजिक व्यवहाराला शिस्त लावण्याच्या गरजेपोटी झाली आहे. या संस्थांच्या निर्मितीमागे पुढारलेल्या, पाश्चिमात्य नागरी समाजाच्या टाऊन कौन्सिल, सिटी कौन्सिल, कौन्सिलर, मेयर या संकल्पनांचा आधार आहे. या संस्था नागरिकांच्याच आहेत आणि त्या नागरिकांनीच चालवायच्या आहेत, हा मूलभूत विचार या संस्थांच्या निर्मितीमागे आहे.

‘नागरिकांच्या संस्था नागरिकांनीच चालवाव्यात’ हा विचार भारतीय नागरी समाजात अजूनही तितकासा रुजलेला नाही. भारतीय समाज या विचारापासून कोसो दूर आहे. नगरपालिका, महापालिका या नागरी संस्थांची सामाजिक गरज लोकांनी अजूनही गांभीर्याने समजून घेतलेली नाही. प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका घायची जबाबदारी राज्य निवडणूक आयोग पार पाडते. हौशे, गवसे, नवशे निवडणूक लढवतात. आमदार निवडणुकांमध्ये आपली शक्ती पणाला लावतात. नगरसेवक निवडायची प्रक्रिया पार पडते. महापौर, सभापती निवडीचा, सत्तेचा खेळ सुरू होतो. नगरसेवकांची पळवापळवी सुरू होते. महापौर, सभापती निवडले जातात. निवडणुकांचा फड पार पडतो आणि शासन (आमदार) आयुक्त नेमून ‘महापालिका’ चालवतात. ही एक रूढ प्रथा झाली आहे. पालिका जर आयुक्तांनीच चालवायच्या असतील, तर मग निवडणुकांचा हा महाउद्योग कशासाठी? कमिशन एजंट नेमण्यासाठी? तसे नक्कीच नाही. नागरिकांनी आपली शहरे योग्य प्रतिनिधी निवडून सांभाळावीत, यासाठी निवडणुका आहेत.

महापालिका चालवणारे नगरसेवक अभ्यासू असतील, नगर नियोजनकार असतील, कायदा, कला, क्रीडा, वाणिज्य, आरोग्य या क्षेत्रातील जाणकार असतील, तर् महापालिकेच्या दैनंदिन व्यवहाराला एक विशिष्ट दर्जा ते देऊ शकतात. याउलट प्रत्येक कामात ढपला पाडणारे, अधिकाऱ्यांशी फाजील संघर्ष, वादावादी करणारे नगरसेवक शहराच्या स्वास्थ्याला हानी पोहोचवतात. संपन्न नागरी जीवनासाठी पालिकांच्या कारभारात सुधारणा, ही प्राथमिक गरज आहे. सध्याची जी राजकीय आणि कायद्याची व्यवस्था आहे, त्यात अमूलाग्र बदल गरजेचे आहेत. महापौर पदाच्या वायफळ खेळात कायदे मंडळाचे सदस्य असलेल्या आमदारांची शक्ती खूप वाया जाते. आपलं शहर सांभाळण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडायचा आहे, तिथं फाजील उन्माद, ईर्षा, संघर्ष कशासाठी? हे कुठे तरी थांबले पाहिजे. शहरांच्या हे हिताचे नाही.

शहरी जीवनाच्या समस्या खूप गुंतागुंतीच्या असतात. त्या जाणून त्यांची उत्तरे शोधण्याचा ध्यास, कौशल्य, कसब असलेल्या नागरी नेतृत्वाची गरज शहरांना आहे. नागरी जीवनाची गुणवत्ता, महापालिका चालविणारे कोण आहेत, यावर बरेचसे अवलंबून असते. या संस्था कोण चालवतात? त्यांची क्षमता, त्यांची वैचारिक बैठक, त्यांची कल्पकता, ते समाजवादी विचाराचे आहेत की सरंजामी. या सर्वांचा नागरी जीवनावर दूरगामी परिणाम होत असतो. ज्या नागरी समाजाकडे नगरपालिका, महापालिका या आपल्या संस्था उत्तम चालविण्याचे कौशल्य असते, तोच नागरी समाज लोकशाहीला बळकटी देणारा आणि गुणवत्तापूर्ण नागरी जीवन जगणारा असतो. स्थानिक स्वराज्य संस्था ‘संसद’ या उच्चत्तम सभागृहाच्या पाठशाळा मानल्या जातात. लोकशाहीचा दर्जा सुधारावयाचा असेल, तर या पाठशालांचा दर्जा सुधारला गेला पाहिजे. गेली तीस-पस्तीस वर्षे रंकाळा चळवळीच्या निमित्ताने महापालिकेचे राजकारण, महापालिकेचे प्रशासन, पत्रकार, आमदार यांच्याशी जवळून संपर्क आला. दर पाच वर्षांनी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका बघितल्या. गेली निवडणूक यापेक्षा बरी होती, असेच प्रत्येक वेळी वाटत गेले. सुरुवातीला जी संवेदनशील सचोटीची माणसे होती, ती हळूहळू नाहीशी होत गेली. सामूहिक जबाबदारीच्या भावनेची जागा सत्ता आणि बडेजावाने घेतली. सभागृहाचा दर्जा उन्नत होण्याऐवजी खालावतच गेला. हे फक्त कोल्हापुरातच घडत गेले असेही नाही. संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात यापेक्षा फारसे वेगळे चित्र नाही. सत्तासंघर्ष आणि बडेजावाच्या राजकारणात नगरपालिका, महापालिका या नागरी संस्थांचा दर्जा खालावत गेला. याबाबत लोकप्रबोधन करावे लागणार आहे. स्थानिक संस्था निवडणूक कायद्यात अमूलाग्र बदलही करावे लागणार आहेत.