शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

शहरभान कॉलम-०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST

जो मानवी समूह आपल्या सामाजिक जीवनाला आणि सामाजिक व्यवहाराला एक प्रकारची शिस्त लावून घेतो आणि ही शिस्त, संस्था निर्माण ...

जो मानवी समूह आपल्या सामाजिक जीवनाला आणि सामाजिक व्यवहाराला एक प्रकारची शिस्त लावून घेतो आणि ही शिस्त, संस्था निर्माण करून राबवतो, त्या समूहाला ‘नागरी समाज’ म्हटले जाते. नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या संस्थांची निर्मिती नागरिकांच्या सामाजिक जीवनाला आणि सामाजिक व्यवहाराला शिस्त लावण्याच्या गरजेपोटी झाली आहे. या संस्थांच्या निर्मितीमागे पुढारलेल्या, पाश्चिमात्य नागरी समाजाच्या टाऊन कौन्सिल, सिटी कौन्सिल, कौन्सिलर, मेयर या संकल्पनांचा आधार आहे. या संस्था नागरिकांच्याच आहेत आणि त्या नागरिकांनीच चालवायच्या आहेत, हा मूलभूत विचार या संस्थांच्या निर्मितीमागे आहे.

‘नागरिकांच्या संस्था नागरिकांनीच चालवाव्यात’ हा विचार भारतीय नागरी समाजात अजूनही तितकासा रुजलेला नाही. भारतीय समाज या विचारापासून कोसो दूर आहे. नगरपालिका, महापालिका या नागरी संस्थांची सामाजिक गरज लोकांनी अजूनही गांभीर्याने समजून घेतलेली नाही. प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका घायची जबाबदारी राज्य निवडणूक आयोग पार पाडते. हौशे, गवसे, नवशे निवडणूक लढवतात. आमदार निवडणुकांमध्ये आपली शक्ती पणाला लावतात. नगरसेवक निवडायची प्रक्रिया पार पडते. महापौर, सभापती निवडीचा, सत्तेचा खेळ सुरू होतो. नगरसेवकांची पळवापळवी सुरू होते. महापौर, सभापती निवडले जातात. निवडणुकांचा फड पार पडतो आणि शासन (आमदार) आयुक्त नेमून ‘महापालिका’ चालवतात. ही एक रूढ प्रथा झाली आहे. पालिका जर आयुक्तांनीच चालवायच्या असतील, तर मग निवडणुकांचा हा महाउद्योग कशासाठी? कमिशन एजंट नेमण्यासाठी? तसे नक्कीच नाही. नागरिकांनी आपली शहरे योग्य प्रतिनिधी निवडून सांभाळावीत, यासाठी निवडणुका आहेत.

महापालिका चालवणारे नगरसेवक अभ्यासू असतील, नगर नियोजनकार असतील, कायदा, कला, क्रीडा, वाणिज्य, आरोग्य या क्षेत्रातील जाणकार असतील, तर् महापालिकेच्या दैनंदिन व्यवहाराला एक विशिष्ट दर्जा ते देऊ शकतात. याउलट प्रत्येक कामात ढपला पाडणारे, अधिकाऱ्यांशी फाजील संघर्ष, वादावादी करणारे नगरसेवक शहराच्या स्वास्थ्याला हानी पोहोचवतात. संपन्न नागरी जीवनासाठी पालिकांच्या कारभारात सुधारणा, ही प्राथमिक गरज आहे. सध्याची जी राजकीय आणि कायद्याची व्यवस्था आहे, त्यात अमूलाग्र बदल गरजेचे आहेत. महापौर पदाच्या वायफळ खेळात कायदे मंडळाचे सदस्य असलेल्या आमदारांची शक्ती खूप वाया जाते. आपलं शहर सांभाळण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडायचा आहे, तिथं फाजील उन्माद, ईर्षा, संघर्ष कशासाठी? हे कुठे तरी थांबले पाहिजे. शहरांच्या हे हिताचे नाही.

शहरी जीवनाच्या समस्या खूप गुंतागुंतीच्या असतात. त्या जाणून त्यांची उत्तरे शोधण्याचा ध्यास, कौशल्य, कसब असलेल्या नागरी नेतृत्वाची गरज शहरांना आहे. नागरी जीवनाची गुणवत्ता, महापालिका चालविणारे कोण आहेत, यावर बरेचसे अवलंबून असते. या संस्था कोण चालवतात? त्यांची क्षमता, त्यांची वैचारिक बैठक, त्यांची कल्पकता, ते समाजवादी विचाराचे आहेत की सरंजामी. या सर्वांचा नागरी जीवनावर दूरगामी परिणाम होत असतो. ज्या नागरी समाजाकडे नगरपालिका, महापालिका या आपल्या संस्था उत्तम चालविण्याचे कौशल्य असते, तोच नागरी समाज लोकशाहीला बळकटी देणारा आणि गुणवत्तापूर्ण नागरी जीवन जगणारा असतो. स्थानिक स्वराज्य संस्था ‘संसद’ या उच्चत्तम सभागृहाच्या पाठशाळा मानल्या जातात. लोकशाहीचा दर्जा सुधारावयाचा असेल, तर या पाठशालांचा दर्जा सुधारला गेला पाहिजे. गेली तीस-पस्तीस वर्षे रंकाळा चळवळीच्या निमित्ताने महापालिकेचे राजकारण, महापालिकेचे प्रशासन, पत्रकार, आमदार यांच्याशी जवळून संपर्क आला. दर पाच वर्षांनी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका बघितल्या. गेली निवडणूक यापेक्षा बरी होती, असेच प्रत्येक वेळी वाटत गेले. सुरुवातीला जी संवेदनशील सचोटीची माणसे होती, ती हळूहळू नाहीशी होत गेली. सामूहिक जबाबदारीच्या भावनेची जागा सत्ता आणि बडेजावाने घेतली. सभागृहाचा दर्जा उन्नत होण्याऐवजी खालावतच गेला. हे फक्त कोल्हापुरातच घडत गेले असेही नाही. संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात यापेक्षा फारसे वेगळे चित्र नाही. सत्तासंघर्ष आणि बडेजावाच्या राजकारणात नगरपालिका, महापालिका या नागरी संस्थांचा दर्जा खालावत गेला. याबाबत लोकप्रबोधन करावे लागणार आहे. स्थानिक संस्था निवडणूक कायद्यात अमूलाग्र बदलही करावे लागणार आहेत.