शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

शहरभान कॉलम-०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST

शहरभान आर्कि. जीवन बोडके कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, ...

शहरभान

आर्कि. जीवन बोडके

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, तमक्याची ताकद यांची नेहमीचीच साचेबध्द मांडणी सुरू झाली आहे. ही निवडणूक, त्याच त्या साचेबध्द राजकारणातून बाहेर पडून शहराला नवा विचार, नवी दिशा देणारी व्हावी, यासाठी शहरभान या नावाने एक सजग चळवळ आकार घेऊ लागली आहे. त्यातून पारंपरिक ढाच्यातून बाहेर काढून जबाबदार लोकप्रतिनिधित्व आकारास यावे, असा प्रयत्न सुरू झाला आहे. या चळवळीमागील भूमिका मांडण्याचा हा प्रयत्न...

‘शहर’ हे माणसाने निर्माण केलेले विश्व आहे. ‘शहरे’ एकमेकांबरोबर जुळवून घेऊन सलोख्याने जगायला शिकवतात. शहरी जीवन हे परस्परावलंबी असते. शहरी जीवनात सहिष्णुता, सहनशीलता एकमेकांबाबत आदर हे गुण अंगी बाणवावे लागतात. शहरे लोकशाहीस चालना देणारी असतात. लोकशाही संकल्पनेचा पाया शहरांनीच घातला आहे. शहरातील संस्कृती बहुभाषिक, बहुधार्मिक असते. शहरामध्ये वेगवेगळे आचार-विचार, वेगवेगळ्या खाद्य संस्कृती एकत्र नांदत असतात. शहरात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय एकमेकांच्या साहाय्यानेच भरभराटीला येत असतात.

शहरांचे वाढते आकार आणि वाढती लोकसंख्या ही शहरांना लोकांनी दिलेली पसंती दर्शवतात. शहरांच्या विस्ताराला आवर घालणे आजवर कोणालाही जमलेले नाही. येणाऱ्या काळात जमेल असेही वाटत नाही. वाढत्या लोकसंख्येचा आणि तंत्रज्ञानाचा विचार करता, शहरीकरण अटळ आहे हे आता स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे ते समजून घेण्यात शहाणपण आहे.

शहर नियोजन आणि शहर विकास ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हा गुंता समजून घेऊ शकतील, त्याची उत्तरे शोधू शकतील अशा कल्पक, बुद्धिमान आणि ध्येयनिष्ठ नगरसेवकांची शहरांना गरज आहे. नागरी जीवनाची गुणवत्ता आणि नागरी नेतृत्वाची कल्पकता, यांचा जवळचा संबंध आहे. ‘नगरसेवक, दैनंदिन नागरी जीवनाच्या समस्यांकडे मुकादमाच्या क्षमतेने सोडवू शकतो, की प्रशासकाच्या क्षमतेने सोडवू शकतो?’ हा एक महत्त्वाचा विचार नगरसेवक निवडताना नागरिकांनी करणे गरजेचे आहे. मुकादम हवाय की शहराचा धोरणकर्ता हवाय? नागरी नेतृत्व निवडण्याबाबत आवश्यक ती प्रगल्भता आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये आहे असे वाटत नाही. सक्षम, ध्येयनिष्ठ मनुष्यबळ प्रत्येक शहरात उपलब्ध आहे. पण सत्तेच्या, बडेजावाच्या दांडगाव्यापुढे ते परिघाबाहेरच घुटमळत राहिले आहे. त्यात आपल्या निवडणूक पद्धतीने सततची अस्थिरता निर्माण करून गोंधळात आणखी भर घातली आहे. नागरी जीवनाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या चळवळींना दोन्ही आघाड्यांवर काम करावे लागणार आहे.

१) सामाजिक प्रबोधन आणि २) कायद्यात बदल.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने काही विषय ऐरणीवर घेता येतील. नागरी समाज म्हणजे काय? नगरपालिका, महानगरपालिका, या संस्था नेमक्या काय? आहेत? या संस्था कोण चालवू शकते? या संस्था चालवणाऱ्यांची क्षमता आणि नागरी जीवनाची गुणवत्ता यांचा काही संबंध आहे की नाही? या संस्थात विधायक आणि उन्नतीचे राजकारण अशक्य आहे का? गुंड-पुंड, ऐरे-गैरे यांना नेतृत्व करण्याएवढा आत्मविश्वास कशामुळे आला? आरक्षणाची तरतूद, त्यासाठी आलटून पालटून राखीव प्रभाग, यामुळे शहरांना स्थिर, ध्येयनिष्ठ नेतृत्व लाभू शकेल का? भारतीय नागरी समाजाची मानसिकता, ७४ व्या घटना दुरुस्तीची गरज, आणि वास्तव, असे किती तरी विषय या निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर घेण्यासारखे आहेत.

(लेखक कोल्हापुरातील ज्येष्ठ आर्किटेक्ट व पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत)

(फोटो ग्रंथालयात आहे तो वापरावा)