शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शहरभान कॉलम-०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST

शहरभान आर्कि. जीवन बोडके कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, ...

शहरभान

आर्कि. जीवन बोडके

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, तमक्याची ताकद यांची नेहमीचीच साचेबध्द मांडणी सुरू झाली आहे. ही निवडणूक, त्याच त्या साचेबध्द राजकारणातून बाहेर पडून शहराला नवा विचार, नवी दिशा देणारी व्हावी, यासाठी शहरभान या नावाने एक सजग चळवळ आकार घेऊ लागली आहे. त्यातून पारंपरिक ढाच्यातून बाहेर काढून जबाबदार लोकप्रतिनिधित्व आकारास यावे, असा प्रयत्न सुरू झाला आहे. या चळवळीमागील भूमिका मांडण्याचा हा प्रयत्न...

‘शहर’ हे माणसाने निर्माण केलेले विश्व आहे. ‘शहरे’ एकमेकांबरोबर जुळवून घेऊन सलोख्याने जगायला शिकवतात. शहरी जीवन हे परस्परावलंबी असते. शहरी जीवनात सहिष्णुता, सहनशीलता एकमेकांबाबत आदर हे गुण अंगी बाणवावे लागतात. शहरे लोकशाहीस चालना देणारी असतात. लोकशाही संकल्पनेचा पाया शहरांनीच घातला आहे. शहरातील संस्कृती बहुभाषिक, बहुधार्मिक असते. शहरामध्ये वेगवेगळे आचार-विचार, वेगवेगळ्या खाद्य संस्कृती एकत्र नांदत असतात. शहरात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय एकमेकांच्या साहाय्यानेच भरभराटीला येत असतात.

शहरांचे वाढते आकार आणि वाढती लोकसंख्या ही शहरांना लोकांनी दिलेली पसंती दर्शवतात. शहरांच्या विस्ताराला आवर घालणे आजवर कोणालाही जमलेले नाही. येणाऱ्या काळात जमेल असेही वाटत नाही. वाढत्या लोकसंख्येचा आणि तंत्रज्ञानाचा विचार करता, शहरीकरण अटळ आहे हे आता स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे ते समजून घेण्यात शहाणपण आहे.

शहर नियोजन आणि शहर विकास ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हा गुंता समजून घेऊ शकतील, त्याची उत्तरे शोधू शकतील अशा कल्पक, बुद्धिमान आणि ध्येयनिष्ठ नगरसेवकांची शहरांना गरज आहे. नागरी जीवनाची गुणवत्ता आणि नागरी नेतृत्वाची कल्पकता, यांचा जवळचा संबंध आहे. ‘नगरसेवक, दैनंदिन नागरी जीवनाच्या समस्यांकडे मुकादमाच्या क्षमतेने सोडवू शकतो, की प्रशासकाच्या क्षमतेने सोडवू शकतो?’ हा एक महत्त्वाचा विचार नगरसेवक निवडताना नागरिकांनी करणे गरजेचे आहे. मुकादम हवाय की शहराचा धोरणकर्ता हवाय? नागरी नेतृत्व निवडण्याबाबत आवश्यक ती प्रगल्भता आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये आहे असे वाटत नाही. सक्षम, ध्येयनिष्ठ मनुष्यबळ प्रत्येक शहरात उपलब्ध आहे. पण सत्तेच्या, बडेजावाच्या दांडगाव्यापुढे ते परिघाबाहेरच घुटमळत राहिले आहे. त्यात आपल्या निवडणूक पद्धतीने सततची अस्थिरता निर्माण करून गोंधळात आणखी भर घातली आहे. नागरी जीवनाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या चळवळींना दोन्ही आघाड्यांवर काम करावे लागणार आहे.

१) सामाजिक प्रबोधन आणि २) कायद्यात बदल.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने काही विषय ऐरणीवर घेता येतील. नागरी समाज म्हणजे काय? नगरपालिका, महानगरपालिका, या संस्था नेमक्या काय? आहेत? या संस्था कोण चालवू शकते? या संस्था चालवणाऱ्यांची क्षमता आणि नागरी जीवनाची गुणवत्ता यांचा काही संबंध आहे की नाही? या संस्थात विधायक आणि उन्नतीचे राजकारण अशक्य आहे का? गुंड-पुंड, ऐरे-गैरे यांना नेतृत्व करण्याएवढा आत्मविश्वास कशामुळे आला? आरक्षणाची तरतूद, त्यासाठी आलटून पालटून राखीव प्रभाग, यामुळे शहरांना स्थिर, ध्येयनिष्ठ नेतृत्व लाभू शकेल का? भारतीय नागरी समाजाची मानसिकता, ७४ व्या घटना दुरुस्तीची गरज, आणि वास्तव, असे किती तरी विषय या निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर घेण्यासारखे आहेत.

(लेखक कोल्हापुरातील ज्येष्ठ आर्किटेक्ट व पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत)

(फोटो ग्रंथालयात आहे तो वापरावा)