शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शहरभान कॉलम-०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST

शहरभान आर्कि. जीवन बोडके कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, ...

शहरभान

आर्कि. जीवन बोडके

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, तमक्याची ताकद यांची नेहमीचीच साचेबध्द मांडणी सुरू झाली आहे. ही निवडणूक, त्याच त्या साचेबध्द राजकारणातून बाहेर पडून शहराला नवा विचार, नवी दिशा देणारी व्हावी, यासाठी शहरभान या नावाने एक सजग चळवळ आकार घेऊ लागली आहे. त्यातून पारंपरिक ढाच्यातून बाहेर काढून जबाबदार लोकप्रतिनिधित्व आकारास यावे, असा प्रयत्न सुरू झाला आहे. या चळवळीमागील भूमिका मांडण्याचा हा प्रयत्न...

‘शहर’ हे माणसाने निर्माण केलेले विश्व आहे. ‘शहरे’ एकमेकांबरोबर जुळवून घेऊन सलोख्याने जगायला शिकवतात. शहरी जीवन हे परस्परावलंबी असते. शहरी जीवनात सहिष्णुता, सहनशीलता एकमेकांबाबत आदर हे गुण अंगी बाणवावे लागतात. शहरे लोकशाहीस चालना देणारी असतात. लोकशाही संकल्पनेचा पाया शहरांनीच घातला आहे. शहरातील संस्कृती बहुभाषिक, बहुधार्मिक असते. शहरामध्ये वेगवेगळे आचार-विचार, वेगवेगळ्या खाद्य संस्कृती एकत्र नांदत असतात. शहरात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय एकमेकांच्या साहाय्यानेच भरभराटीला येत असतात.

शहरांचे वाढते आकार आणि वाढती लोकसंख्या ही शहरांना लोकांनी दिलेली पसंती दर्शवतात. शहरांच्या विस्ताराला आवर घालणे आजवर कोणालाही जमलेले नाही. येणाऱ्या काळात जमेल असेही वाटत नाही. वाढत्या लोकसंख्येचा आणि तंत्रज्ञानाचा विचार करता, शहरीकरण अटळ आहे हे आता स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे ते समजून घेण्यात शहाणपण आहे.

शहर नियोजन आणि शहर विकास ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हा गुंता समजून घेऊ शकतील, त्याची उत्तरे शोधू शकतील अशा कल्पक, बुद्धिमान आणि ध्येयनिष्ठ नगरसेवकांची शहरांना गरज आहे. नागरी जीवनाची गुणवत्ता आणि नागरी नेतृत्वाची कल्पकता, यांचा जवळचा संबंध आहे. ‘नगरसेवक, दैनंदिन नागरी जीवनाच्या समस्यांकडे मुकादमाच्या क्षमतेने सोडवू शकतो, की प्रशासकाच्या क्षमतेने सोडवू शकतो?’ हा एक महत्त्वाचा विचार नगरसेवक निवडताना नागरिकांनी करणे गरजेचे आहे. मुकादम हवाय की शहराचा धोरणकर्ता हवाय? नागरी नेतृत्व निवडण्याबाबत आवश्यक ती प्रगल्भता आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये आहे असे वाटत नाही. सक्षम, ध्येयनिष्ठ मनुष्यबळ प्रत्येक शहरात उपलब्ध आहे. पण सत्तेच्या, बडेजावाच्या दांडगाव्यापुढे ते परिघाबाहेरच घुटमळत राहिले आहे. त्यात आपल्या निवडणूक पद्धतीने सततची अस्थिरता निर्माण करून गोंधळात आणखी भर घातली आहे. नागरी जीवनाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या चळवळींना दोन्ही आघाड्यांवर काम करावे लागणार आहे.

१) सामाजिक प्रबोधन आणि २) कायद्यात बदल.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने काही विषय ऐरणीवर घेता येतील. नागरी समाज म्हणजे काय? नगरपालिका, महानगरपालिका, या संस्था नेमक्या काय? आहेत? या संस्था कोण चालवू शकते? या संस्था चालवणाऱ्यांची क्षमता आणि नागरी जीवनाची गुणवत्ता यांचा काही संबंध आहे की नाही? या संस्थात विधायक आणि उन्नतीचे राजकारण अशक्य आहे का? गुंड-पुंड, ऐरे-गैरे यांना नेतृत्व करण्याएवढा आत्मविश्वास कशामुळे आला? आरक्षणाची तरतूद, त्यासाठी आलटून पालटून राखीव प्रभाग, यामुळे शहरांना स्थिर, ध्येयनिष्ठ नेतृत्व लाभू शकेल का? भारतीय नागरी समाजाची मानसिकता, ७४ व्या घटना दुरुस्तीची गरज, आणि वास्तव, असे किती तरी विषय या निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर घेण्यासारखे आहेत.

(लेखक कोल्हापुरातील ज्येष्ठ आर्किटेक्ट व पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत)

(फोटो ग्रंथालयात आहे तो वापरावा)