शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही-राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 21:50 IST

महाराष्ट्रात चिखलातून कमळ उगवल्याप्रमाणे अनेक सुधारक झाले; परंतु आता भलतीच कमळं उगवली आहेत. देशातील खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही. हा सगळा चोरांचा बाजार

ठळक मुद्देराजू शेट्टी यांचा भाजपवर हल्लाबोल : दलालापासून राष्ट्र, राज्य वाचविले पाहिजे

कोल्हापूर : महाराष्ट्रात चिखलातून कमळ उगवल्याप्रमाणे अनेक सुधारक झाले; परंतु आता भलतीच कमळं उगवली आहेत. देशातील खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही. हा सगळा चोरांचा बाजार आहे. या दलालांपासून देश आणि महाराष्ट्र वाचविला पाहिजे, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी संकलित केलेल्या वह्या शेट्टी यांच्या हस्ते शुक्रवारी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. त्यावेळी शेट्टी यांनी भाजप सरकारचा पंचनामा केला. आमदार पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांच्यासह कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, जून महिना आला की, पालकांना मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे पोटात गोळा येतो. या सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असून, अशा परिस्थितीत सतेज पाटील यांनी संकलित केलेल्या पाच लाखांहून अधिक वह्या मुलांसाठी वाळवंटातील ओअ‍ॅसिस ठरणार आहेत.

भाजपच्या कारभारावर चौफेर टीका करताना शेट्टी म्हणाले, शाळा बंद करून सध्याच्या सरकारमध्ये असलेल्यांचा चंगळवाद पोसण्यासाठी नवे गुलाम तयार करण्याचे काम सुरू आहे. मीदेखील ‘अच्छे दिन’च्या भूलभुलय्याला भुललो होतो; परंतु ‘सर्व शिक्षा अभियान’ बंद आहे, पेयजल योजना ठप्प आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न तर ‘जैसे थे’च आहेत.

दूध दराचे हे संकट येणार, हे मी आधी दोन वर्षे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांना सांगितले होते. क्रूड आॅईलच्या किमती आवाक्यात असताना ५० रुपये वाढीव दराने पेट्रोल विकले जाते. हे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.यांचं धर्मकार्य अन् भोगतोय आम्ही !न्यूझीलंड, डेन्मार्क, आॅस्ट्रेलिया या देशांत भाकड जनावरे कत्तलखान्याला पाठविली जातात. मात्र, भारतात गोवंश हत्याबंदीचा कायदा केल्याने आम्हाला भाकड जनावरे पोसण्याची पाळी आली. सोडून दिलेली अशी हजारो जनावरे उभे पीक उद्ध्वस्त करीत आहेत. यांचे धर्मकार्य होते आणि ते मात्र आम्ही शेतकरी भोगतोय, असे शेट्टी म्हणाले. 

मी विंचू चावल्याचे सांगितलेमारुतीच्या मूर्तीच्या बेंबीत एका मुलाने हात घातला तर त्याला विंचू चावला. त्याने इतरांना मात्र आपल्याला गार लागल्याचे सांगितले. इतर मुलेही गार लागले असेच म्हणू लागली; पण मी खरे बोलणारा आहे. मला यांच्या नादाला लागून खरेच विंचू चावला आहे, असे शेट्टी यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर