शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

शाहूवाडीतून भारत पाटील विधानसभेला ठोकणार शड्डू

By admin | Updated: May 24, 2014 01:08 IST

संपर्कदौरा सुरू : स्वाभिमानी की शिवसेना हीच उत्सुकता; खासदार शेट्टींशी प्राथमिक चर्चा

 कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जनसुराज्य पक्षाचे नेते भारतअप्पा पाटील हे शाहूवाडी मतदारसंघातून विधानसभेला शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मतदारसंघात व्यक्तिगत संपर्कदौराही सुरू केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनेच्या उमेदवारीचा पर्याय त्यांच्यासमोर खुला आहे. खासदार राजू शेट्टी यांच्याशी त्यांची यासंबंधी प्राथमिक चर्चा झाली असून, स्वाभिमानी संघटनेकडूनच त्यांनी रिंगणात उतरावे, अशा हालचाली आहेत. पाटील हे आमदार विनय कोरे यांचे कार्यकर्ते मानले जातात. श्री. कोरे हे सध्या याच मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. परंतु त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा अस्पष्ट आहे. ते नेमके काय करणार आहेत, हे समजत नाही. लोकसभेला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पाठिंबा दिला. त्यांच्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही खासदार शेट्टी विजयी झाले. त्यामुळे कोरे यांचे राजकारण बॅकफूटवर गेले आहे. भारत पाटील यांनी गेल्याच निवडणुकीत करवीर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, परंतु त्यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करण्यासाठी कोरे यांनी माजी आमदार पी. एन. पाटील यांना पाठिंबा दिला व त्यातून घडले उलटेच. त्यामुळे आता यावेळेला काही झाले तरी विधानसभा लढवायची, अशा विचारात भारत पाटील आहेत. सत्ता असो की नसो ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने लोकसंपर्कात आहेत. मध्यंतरी पन्हाळ््यावर वीर शिवा काशीद यांचे स्मारक उभारून त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते केले. त्याचवेळी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. अजित पवार यांच्याशीही त्यांचे संबंध जिव्हाळ््याचे आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे आणि आघाडींमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यात त्यांना अडचणी आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ते ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शेट्टी यांचे आंदोलन व भारत पाटील यांची विकासाची चळवळ अशी गट्टी जमल्यास त्यांना लोकांचे चांगले पाठबळ मिळू शकते. शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी लोकसभेला शेट्टी यांना मदत न केल्याने यावेळेला शिवसेनेची उमेदवारी त्यांना मिळू नये, असे शेट्टी यांचे प्रयत्न राहतील. त्याऐवजी ही जागा ‘स्वाभिमानी’लाच मिळायला हवी, अशी त्यांची मागणी आहे तसे झाल्यास संघटनेचा उमेदवार म्हणून भारत पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. पक्ष कोणताही असो, त्यांनी या वेळेला लढायचे पक्के केले असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)