शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST

नंदकुमार ढेरे चंदगड : चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगडवरील सर्व तलाव व विहिरी कोरड्या पडल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली ...

नंदकुमार ढेरे

चंदगड : चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगडवरील सर्व तलाव व विहिरी कोरड्या पडल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांवर पावसाळ्यापर्यंत गाव सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवली आहे. सुटीच्या कालावधीत गावी येणारे पुणे- मुंबई येथील चाकरमान्यांचीही मोठी अडचण झाली आहे. शिवकाळापासून पारगडावर गणेश, फाटक, गुंजन व महादेव या चार तलावांसह १८ विहिरींची नोंद आहे. यातील महादेव तलाव वगळता इतर ३ तलाव वापरात असले तरी सद्य:स्थितीत तीनही तलाव कोरडे पडले आहेत. १८ विहिरींपैकी वापरात असलेल्या ३-४ विहिरीही पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत हीच परिस्थिती असून, एप्रिल- मे महिन्यांत पावसाळा सुरू होईपर्यंत गडावरील रहिवाशांना पाण्याअभावी स्थलांतरित व्हावे लागत आहे. त्यामुळे मुंबई- पुण्यासह बाहेर काम करणाऱ्या चाकरमानी मंडळींना सुटी असूनही सहकुटुंब आपल्या गावी काही दिवस राहण्याचे भाग्य लाभत नाही. ऐतिहासिक वारसा लाभलेला पारगड छत्रपती शिवरायांनी बांधलेला शेवटचा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या उन्हाळी सुटीतील पर्यटकांनाही पाणीटंचाईच्या झळांनी होरपळण्याची वेळ येत आहे. सात-आठ वर्षांपूर्वी राबविलेल्या नळपाणी योजना व अन्य सुधारणांचेही शासन व पर्यटन विभागाच्या दुर्लक्षामुळे तीनतेरा वाजले आहेत. शासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीन वृत्तीमुळे पारगड रहिवाशांना पाणी, आरोग्य आदी मूलभूत सुविधांअभावी जीवन कंठावे लागत आहे. ग्रामस्थांना चार- पाच किलोमीटरवरून पाणी आणून जगण्याची वेळ आली आहे. किल्ल्याला पाणीटंचाईपासून मुक्त करण्याची आर्त हाक पारगड ग्रामस्थांनी शासनाला दिली आहे.

-

टँकरने तलाव पुनर्भरणाची मागणी

गडावरील दरवर्षी ओढवणाऱ्या पाणीटंचाईवरील कायमस्वरूपी उपाययोजनांसह सद्य:स्थितीत टँकरने पाणीपुरवठा करून गडावरील गणेश व फाटक तलाव टँकरने भरून घ्यावीत, अशी मागणी कान्होबा माळवे, प्रकाश चिरमुरे, रघुवीर शेलार आदींनी केली आहे.

फोटो ओळी :

पारगड (ता. चंदगड) येथील पाण्याअभावी कोरडा पडलेला गणेश तलाव. क्रमांक : २३०४२०२१-गड-०३