शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सातवा आयोग नवीन वर्षात शक्य, सरकारने मागवली महापालिकेकडून माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:04 IST

कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याकरिता नवीन वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे माहिती मागविली असल्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत किमान चार महिन्यांचा अवधी जाईल.

ठळक मुद्देसातवा आयोग नवीन वर्षात शक्यसरकारने मागवली महापालिकेकडून माहिती

कोल्हापूर : सातवा वेतन आयोग लागू करण्यासारखी महानगरपालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती नाही; मात्र कर्मचारी संघटनेच्या आग्रही रेट्यामुळे सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याकरिता नवीन वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे माहिती मागविली असल्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत किमान चार महिन्यांचा अवधी जाईल.केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला; त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग द्या, अशी मागणी जोर खात आहे. महापालिका कर्मचारी संघटनेने तसे लेखी निवेदन प्रशासनास दिले असून, त्यावर संघटना पदाधिकारी, पदाधिकारी, अधिकारी यांच्यात बैठका होत आहेत.सातवा वेतन आयोग लागू करण्यास कोणाचीही ना नाही; परंतु तो कसा देणार, महानगरपालिका तिजोरीवर किती बोजा पडणार आणि या अतिरिक्त बोजाची रक्कम कशी उभी करणार हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आजतरी कोणाकडे नाही.राज्यसरकारने नुकतेच एक पत्र पाठवून महापालिकेच्या सर्व मार्गांनी येणारे उत्पन्न, केंद्र व राज्यामार्फत देण्यात आलेल्या योजनांमधील हिस्सा, कर्ज व त्यावरील व्याजाच्या परतफेडीसाठी आवश्यक रक्कम, आस्थापनावरील खर्च, प्रशासकीय खर्च, न्यायालयीन दाव्याच्या रकमा, विद्युत व पाणी पुरवठ्याची देयके, आदींबाबतची माहिती मागविली आहे. त्यानुसार माहिती संकलित केली जात आहे.५४ कोटींचा पडणार बोजाकर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव देण्यास प्रशासनाला सांगितले आहे, असे स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले. आमच्या माहितीप्रमाणे महापालिका, पाणी पुरवठा, शिक्षण मंडळ, तसेच केएमटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करायचा झाला, तर ५४ कोटी रुपयांचा बोजा तिजोरीवर पडणार आहे; त्यामुळे आम्ही मंजूर केला, तरी तो कसा देणार, हा प्रश्न प्रशासनाचा आहे. सध्या बजेटमध्ये कोणतीच तरतूद नसल्यामुळे पुढील वर्षातच त्याची अंमलबजावणी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.शिक्षण समितीचे पगार सरकारने द्यावेतराज्यातील सर्वच खासगी अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांचे पगार राज्य सरकार करते; मात्र महापालिकेत मात्र ५० टक्केच रक्कम दिली जाते. उर्वरित रक्कम महापालिकेला द्यावी लागते; त्यामुळे महापालिकेवर त्याचा ३२ कोटींचा बोजा पडतो; त्यामुळे शिक्षण समितीकडील सर्वच कर्मचाºयांचे पगार राज्यसरकारने करावेत, अशी मागणी स्थायी सभापती देशमुख यांनी केली.

 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाkolhapurकोल्हापूर