शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

सातवा आयोग नवीन वर्षात शक्य, सरकारने मागवली महापालिकेकडून माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:04 IST

कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याकरिता नवीन वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे माहिती मागविली असल्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत किमान चार महिन्यांचा अवधी जाईल.

ठळक मुद्देसातवा आयोग नवीन वर्षात शक्यसरकारने मागवली महापालिकेकडून माहिती

कोल्हापूर : सातवा वेतन आयोग लागू करण्यासारखी महानगरपालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती नाही; मात्र कर्मचारी संघटनेच्या आग्रही रेट्यामुळे सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याकरिता नवीन वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे माहिती मागविली असल्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत किमान चार महिन्यांचा अवधी जाईल.केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला; त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग द्या, अशी मागणी जोर खात आहे. महापालिका कर्मचारी संघटनेने तसे लेखी निवेदन प्रशासनास दिले असून, त्यावर संघटना पदाधिकारी, पदाधिकारी, अधिकारी यांच्यात बैठका होत आहेत.सातवा वेतन आयोग लागू करण्यास कोणाचीही ना नाही; परंतु तो कसा देणार, महानगरपालिका तिजोरीवर किती बोजा पडणार आणि या अतिरिक्त बोजाची रक्कम कशी उभी करणार हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आजतरी कोणाकडे नाही.राज्यसरकारने नुकतेच एक पत्र पाठवून महापालिकेच्या सर्व मार्गांनी येणारे उत्पन्न, केंद्र व राज्यामार्फत देण्यात आलेल्या योजनांमधील हिस्सा, कर्ज व त्यावरील व्याजाच्या परतफेडीसाठी आवश्यक रक्कम, आस्थापनावरील खर्च, प्रशासकीय खर्च, न्यायालयीन दाव्याच्या रकमा, विद्युत व पाणी पुरवठ्याची देयके, आदींबाबतची माहिती मागविली आहे. त्यानुसार माहिती संकलित केली जात आहे.५४ कोटींचा पडणार बोजाकर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव देण्यास प्रशासनाला सांगितले आहे, असे स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले. आमच्या माहितीप्रमाणे महापालिका, पाणी पुरवठा, शिक्षण मंडळ, तसेच केएमटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करायचा झाला, तर ५४ कोटी रुपयांचा बोजा तिजोरीवर पडणार आहे; त्यामुळे आम्ही मंजूर केला, तरी तो कसा देणार, हा प्रश्न प्रशासनाचा आहे. सध्या बजेटमध्ये कोणतीच तरतूद नसल्यामुळे पुढील वर्षातच त्याची अंमलबजावणी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.शिक्षण समितीचे पगार सरकारने द्यावेतराज्यातील सर्वच खासगी अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांचे पगार राज्य सरकार करते; मात्र महापालिकेत मात्र ५० टक्केच रक्कम दिली जाते. उर्वरित रक्कम महापालिकेला द्यावी लागते; त्यामुळे महापालिकेवर त्याचा ३२ कोटींचा बोजा पडतो; त्यामुळे शिक्षण समितीकडील सर्वच कर्मचाºयांचे पगार राज्यसरकारने करावेत, अशी मागणी स्थायी सभापती देशमुख यांनी केली.

 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाkolhapurकोल्हापूर