शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:26 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याने ...

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याने रात्री दहानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी एकत्र आले. तीन तास चर्चा झाली. विविध ठिकाणी फोन केले गेले. निर्णय झाला. वाहने आणि चालक बोलावण्यात आले. पुणे आणि रत्नागिरीला चाचण्यांसाठी स्वॅब पाठवूनच अधिकारी बैठकीतून उठले. कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि मृत्युदर कमी व्हावा यासाठी दिवसरात्र लढणाऱ्या या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची तडफ पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

गेल्यावर्षीपासून सातत्याने कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे अनेक क्षण आले. गेल्यावर्षी तर कोरोनाचा कहर सुरू असताना दोनवेळा कोल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावर गेला होता. नंतरच्या काळात काही दिवस शांत गेल्यानंतर जानेवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि एप्रिलच्या मध्यापासून तर कहर सुरू केला.

रोज एक हजारवर रुग्ण आणि ५० च्या वर मृत्यू यामुळे चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मोठ्या संख्येने स्वॅबचे संकलन करण्यात आले. परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत रोज अडीच हजार स्वॅबची चाचणी करण्यात येते. एवढीच क्षमता असल्याने गेल्या तीन दिवसात सात हजार स्वॅब विनाचाचणी पडून होते.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान हा मुद्दा समोर आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, शेंडा पार्क प्रयोगशाळेतील डॉ. विजय कुलकर्णी हे सर्वजण रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले.

या बैठकीला काही खासगी प्रयोगशाळांच्या चालकांनाही बोलावण्यात आले होते. त्यांच्याशी सुरुवातीला चर्चा करण्यात आली. नंतर संजयसिंह चव्हाण यांनी पुण्यातील तर डॉ. योगेश साळे यांनी रत्नागिरीतील संबंधितांशी संपर्क साधला. अखेर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे १५००, बीजे मेडिकल कॉलेजकडे १५०० तर रत्नागिरी येथील प्रयोगशाळेकडे १ हजार स्वॅब पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

चौकट

गाड्या पाठवूनच अधिकारी घरी

निर्णय झाल्यानंतर या तीनही ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. रात्रीच या वाहनांवरील चालकांना उठवण्यात आले. त्यांना तातडीने बोलावून घेऊन पुणे येथे दोन ठिकाणी आणि रत्नागिरीला गाड्या गेल्यानंतरच अधिकारी बैठकीतून उठले. तातडीने या सर्वांनी मिळून निर्णय घेतल्याने प्रयोगशाळेवर येणारा संभाव्य ताण टळला आहे.

चौकट

नागरिकांच्या सहकार्याची गरज

आपण कधीही पॉझिटिव्ह येऊ शकतो हे माहिती असतानाही अधिकारी आणि कर्मचारी ज्या पध्दतीने कोरोना संकटकाळात काम करत आहेत. ते पाहता आता नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कारण प्रशासन मजबूतपणे काम करण्यामध्ये सर्वांचे हित आहे.