शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:26 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याने ...

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याने रात्री दहानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी एकत्र आले. तीन तास चर्चा झाली. विविध ठिकाणी फोन केले गेले. निर्णय झाला. वाहने आणि चालक बोलावण्यात आले. पुणे आणि रत्नागिरीला चाचण्यांसाठी स्वॅब पाठवूनच अधिकारी बैठकीतून उठले. कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि मृत्युदर कमी व्हावा यासाठी दिवसरात्र लढणाऱ्या या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची तडफ पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

गेल्यावर्षीपासून सातत्याने कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे अनेक क्षण आले. गेल्यावर्षी तर कोरोनाचा कहर सुरू असताना दोनवेळा कोल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावर गेला होता. नंतरच्या काळात काही दिवस शांत गेल्यानंतर जानेवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि एप्रिलच्या मध्यापासून तर कहर सुरू केला.

रोज एक हजारवर रुग्ण आणि ५० च्या वर मृत्यू यामुळे चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मोठ्या संख्येने स्वॅबचे संकलन करण्यात आले. परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत रोज अडीच हजार स्वॅबची चाचणी करण्यात येते. एवढीच क्षमता असल्याने गेल्या तीन दिवसात सात हजार स्वॅब विनाचाचणी पडून होते.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान हा मुद्दा समोर आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, शेंडा पार्क प्रयोगशाळेतील डॉ. विजय कुलकर्णी हे सर्वजण रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले.

या बैठकीला काही खासगी प्रयोगशाळांच्या चालकांनाही बोलावण्यात आले होते. त्यांच्याशी सुरुवातीला चर्चा करण्यात आली. नंतर संजयसिंह चव्हाण यांनी पुण्यातील तर डॉ. योगेश साळे यांनी रत्नागिरीतील संबंधितांशी संपर्क साधला. अखेर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे १५००, बीजे मेडिकल कॉलेजकडे १५०० तर रत्नागिरी येथील प्रयोगशाळेकडे १ हजार स्वॅब पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

चौकट

गाड्या पाठवूनच अधिकारी घरी

निर्णय झाल्यानंतर या तीनही ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. रात्रीच या वाहनांवरील चालकांना उठवण्यात आले. त्यांना तातडीने बोलावून घेऊन पुणे येथे दोन ठिकाणी आणि रत्नागिरीला गाड्या गेल्यानंतरच अधिकारी बैठकीतून उठले. तातडीने या सर्वांनी मिळून निर्णय घेतल्याने प्रयोगशाळेवर येणारा संभाव्य ताण टळला आहे.

चौकट

नागरिकांच्या सहकार्याची गरज

आपण कधीही पॉझिटिव्ह येऊ शकतो हे माहिती असतानाही अधिकारी आणि कर्मचारी ज्या पध्दतीने कोरोना संकटकाळात काम करत आहेत. ते पाहता आता नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कारण प्रशासन मजबूतपणे काम करण्यामध्ये सर्वांचे हित आहे.