शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:26 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याने ...

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याने रात्री दहानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी एकत्र आले. तीन तास चर्चा झाली. विविध ठिकाणी फोन केले गेले. निर्णय झाला. वाहने आणि चालक बोलावण्यात आले. पुणे आणि रत्नागिरीला चाचण्यांसाठी स्वॅब पाठवूनच अधिकारी बैठकीतून उठले. कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि मृत्युदर कमी व्हावा यासाठी दिवसरात्र लढणाऱ्या या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची तडफ पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

गेल्यावर्षीपासून सातत्याने कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे अनेक क्षण आले. गेल्यावर्षी तर कोरोनाचा कहर सुरू असताना दोनवेळा कोल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावर गेला होता. नंतरच्या काळात काही दिवस शांत गेल्यानंतर जानेवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि एप्रिलच्या मध्यापासून तर कहर सुरू केला.

रोज एक हजारवर रुग्ण आणि ५० च्या वर मृत्यू यामुळे चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मोठ्या संख्येने स्वॅबचे संकलन करण्यात आले. परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत रोज अडीच हजार स्वॅबची चाचणी करण्यात येते. एवढीच क्षमता असल्याने गेल्या तीन दिवसात सात हजार स्वॅब विनाचाचणी पडून होते.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान हा मुद्दा समोर आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, शेंडा पार्क प्रयोगशाळेतील डॉ. विजय कुलकर्णी हे सर्वजण रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले.

या बैठकीला काही खासगी प्रयोगशाळांच्या चालकांनाही बोलावण्यात आले होते. त्यांच्याशी सुरुवातीला चर्चा करण्यात आली. नंतर संजयसिंह चव्हाण यांनी पुण्यातील तर डॉ. योगेश साळे यांनी रत्नागिरीतील संबंधितांशी संपर्क साधला. अखेर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे १५००, बीजे मेडिकल कॉलेजकडे १५०० तर रत्नागिरी येथील प्रयोगशाळेकडे १ हजार स्वॅब पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

चौकट

गाड्या पाठवूनच अधिकारी घरी

निर्णय झाल्यानंतर या तीनही ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. रात्रीच या वाहनांवरील चालकांना उठवण्यात आले. त्यांना तातडीने बोलावून घेऊन पुणे येथे दोन ठिकाणी आणि रत्नागिरीला गाड्या गेल्यानंतरच अधिकारी बैठकीतून उठले. तातडीने या सर्वांनी मिळून निर्णय घेतल्याने प्रयोगशाळेवर येणारा संभाव्य ताण टळला आहे.

चौकट

नागरिकांच्या सहकार्याची गरज

आपण कधीही पॉझिटिव्ह येऊ शकतो हे माहिती असतानाही अधिकारी आणि कर्मचारी ज्या पध्दतीने कोरोना संकटकाळात काम करत आहेत. ते पाहता आता नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कारण प्रशासन मजबूतपणे काम करण्यामध्ये सर्वांचे हित आहे.