शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सेवाशुल्क स्थगितीने उद्योग क्षेत्राला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:34 IST

संतोष मिठारी । कोल्हापूर : औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) भूखंडांच्या सेवाशुल्काच्या वाढीला राज्य शासनाने स्थगिती दिल्याने कोल्हापुरातील उद्योग क्षेत्राला दिलासा ...

संतोष मिठारी ।कोल्हापूर : औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) भूखंडांच्या सेवाशुल्काच्या वाढीला राज्य शासनाने स्थगिती दिल्याने कोल्हापुरातील उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. मंदीचा सामना करणाऱ्या येथील तीन मोठ्या औद्योगिक वसाहतींमधील १५०० उद्योजकांना काहीसा आधार मिळाला आहे. या शुल्कामध्ये होणारी वाढ कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी उद्योजकांच्या संघटना शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडी अ‍ॅक्ट १९६१ नुसार राज्यभरात विविध प्रकारची औद्योगिक क्षेत्रे विकसित केली आहेत. या क्षेत्रांत रस्ते, दिवाबत्ती, पाणीपुरवठा वितरण, सांडपाणी व्यवस्था आणि अनुषंगिक सेवांचा समावेश होतो. या सेवा पुरविण्यासाठी महामंडळास जो खर्च करावा लागतो, त्याची प्रतिपूर्ती होण्यासाठी रास्त दराने भूखंड धारकांना सेवाशुल्क आकारण्याचे अधिकार या महामंडळास दिले आहेत. सेवा-सुविधांवरील खर्चात गेल्या १0 वर्षांत झालेली वाढ विचारात घेऊन महामंडळाने सेवाशुल्काच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यपालांच्या आदेशाने या निर्णयाचे परिपत्रक महामंडळाकडून नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध केले. या सेवाशुल्काचे दर पाचपट वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांतून नाराजी व्यक्त झाली.औद्योगिक क्षेत्रात मंदीची स्थिती असल्याने शासनाने सेवा शुल्कामध्ये वाढ करू नये,अशी मागणी उद्योजकांनी केली; त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सेवाशुल्क वाढीच्या ११ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशाला स्थगिती दिली आहे; त्यामुळे शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील १५०० उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.सुविधांवरील खर्चात झालेली वाढ विचारात घेऊन महामंडळाने सेवाशुल्कात वाढ करण्याचा घेतला होता निर्णय.सेवाशुल्काचे दर पाचपट वाढल्याने जिल्ह्यातील उद्योजकांनी व्यक्त केली होती नाराजी.मंदीच्या काळात हा अतिरिक्त बोजा नको असल्याची भावना.उद्योजकांनी पाठपुरावा केल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई सेवाशुल्क वाढीच्या आदेशाला दिली स्थगिती.यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.अशी झाली होतीसेवाशुल्कात वाढया सुधारित दरानुसार कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव आणि शिरोली औद्योगिक वसाहतीतील ५०० ते २००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडासाठी १२ ते १५ रुपये प्रतिचौरस मीटर प्रतिवर्ष असणार होता.गडहिंग्लज, हलकर्णी औद्योगिक वसाहतीमधील दरवाढ ८ ते १० रुपये इतकी झाली होती. या दरवाढीच्या निर्णयापूर्वी कागल-हातकणंगलेमधील हा दर ४ रुपये ५० पैसे, तर शिरोली आणि गोकुळ शिरगाव वसाहतीतील दर तीन रुपये होता.