शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

ज्योत्स्ना शिंदे यांच्या विरोधात गंभीर तक्रारी

By admin | Updated: February 10, 2017 23:53 IST

आर्थिक व्यवहार : समितीकडून चौकशी सुरू

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणी त्या चौकशीच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांची चौकशी होणार असे कळताच तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात त्यांच्याविरोधात शंभराहून अधिक गंभीर तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या आदेशानुसार चौकशी समितीने शिंदे यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाचा जिल्हा परिषद प्रशासनाशी तसा थेट संबंध नाही; पण या विभागाचा कारभार गेले अनेक दिवस चर्चेत राहिल्याने जिल्हा परिषदेची नाहक बदनामी झाल्याने हा विभागच हलविण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न सुरू होते. या विभागाचा थेट संबंध शिक्षण संस्थाचालकांशी येत असल्याने येथे कामावरून अनेकवेळा प्रशासन व संस्थाचालकांमध्ये खडाजंगी पाहावयास मिळत होती. त्यामुळे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत रोज एक तरी तक्रार असते. ज्योत्स्ना शिंदे यांचा कारभार सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला. या विभागात मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण घडामोडी होत असल्याच्या उघड चर्चा शिक्षणक्षेत्रात सुरू होत्या. एकूणच कारभाराबद्दलही संस्थाचालक, शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष पाहावयास मिळतो. वैयक्तिक मान्यतेबाबत वाईट अनुभव येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या विभागातील काही कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप करीत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार यांनी शिंदे यांच्या कारभाराची चौकशी करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश चौकशी समितीला दिले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली असून, त्यांनी चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, शुक्रवारी शिंदे यांची चौकशी सुरू केल्याचे समजताच त्यांच्याविरोधात तक्रारींचा अक्षरश: पाऊस सुरू झाला. चौकशी समितीपुढे शंभराहून अधिक तक्रारी दाखल झाल्याने चौकशीची व्याप्ती वाढणार हे मात्र निश्चित आहे. न्यायालयाच्या आदेशालाही टोपली शिंदे यांनी संस्थाचालक, शिक्षकांना जुमानले नाहीच; पण त्याबरोबरच काही प्रकरणांबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते. त्यालाही केराची टोपली दाखविल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. राजकीय दबावासाठी यंत्रणा सक्रिय!चौकशीची प्रक्रिया सुरू झाल्याने शिंदे चांगल्याच धास्तावल्या आहेत. त्यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, ही कारवाईच होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून दबावाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर जिल्हा परिषदेत होती.