शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

‘मैत्रेय’ची मालमत्ता विकून पैसे देऊ; गुंतवणूकदारांना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:18 IST

कोल्हापूर : दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या वसई-मुंबई येथील मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीची राज्यभरातील मालमत्ता शासनाने जप्त केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ही मालमत्ता लिलावामध्ये विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळास ...

कोल्हापूर : दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या वसई-मुंबई येथील मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीची राज्यभरातील मालमत्ता शासनाने जप्त केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ही मालमत्ता लिलावामध्ये विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळास शुक्रवारी दिली.गृहराज्यमंत्री केसरकर हे शुक्रवारी कोल्हापूर दौºयावर आले असताना आॅल इंडिया मैत्रेय उपभोक्ता असोसिएशन या गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळाने त्यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये विनायक चव्हाण, दत्तात्रय श्ािंगाडे, नीलेश वाणी यांच्यासह महिला गुंतवणूकदारांनी आपली मते मांडली. वसई येथील मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीच्या अध्यक्षा वर्षा सकपाळकर व संचालकांनी दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून सामान्य लोकांकडून दोन हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत रक्कम भरून घेतली.सुमारे १३ राज्यात या कंपनीचा विस्तार असल्याने लोकांनी गुंतवणूक केली. २०१५ पासून या कंपनीने आपला गाशा गुंडाळून सुमारे २८ हजार कोटींचा अपहार केला. सांगली जिल्ह्यातून ८९ कोटींची, तर कोल्हापुरातून ३० कोटींची गुंतवणूक झाली आहे. या कंपनीविरोधात नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. कंपनीची सांगलीतील ३९ कोटी रकमेची मालमत्ता शासनाने जप्त केली आहे. शासनाने या मालमत्ता विकून आम्हाला पैसे परत करावे, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली. त्यावर मंत्री केसरकर यांनी सांगितले की, देशभरातून या कंपनीविरोधात फिर्यादी दाखल झाल्या आहेत. महाराष्टÑातही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. राज्य शासनाने या कंपनीच्या काही मालमत्ता जप्त केल्या आहेत. या अपहार प्रकरणावर मुंबईचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार खत्री यांची प्राधिकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.