शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

‘मैत्रेय’ची मालमत्ता विकून पैसे देऊ; गुंतवणूकदारांना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:18 IST

कोल्हापूर : दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या वसई-मुंबई येथील मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीची राज्यभरातील मालमत्ता शासनाने जप्त केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ही मालमत्ता लिलावामध्ये विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळास ...

कोल्हापूर : दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या वसई-मुंबई येथील मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीची राज्यभरातील मालमत्ता शासनाने जप्त केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ही मालमत्ता लिलावामध्ये विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळास शुक्रवारी दिली.गृहराज्यमंत्री केसरकर हे शुक्रवारी कोल्हापूर दौºयावर आले असताना आॅल इंडिया मैत्रेय उपभोक्ता असोसिएशन या गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळाने त्यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये विनायक चव्हाण, दत्तात्रय श्ािंगाडे, नीलेश वाणी यांच्यासह महिला गुंतवणूकदारांनी आपली मते मांडली. वसई येथील मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीच्या अध्यक्षा वर्षा सकपाळकर व संचालकांनी दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून सामान्य लोकांकडून दोन हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत रक्कम भरून घेतली.सुमारे १३ राज्यात या कंपनीचा विस्तार असल्याने लोकांनी गुंतवणूक केली. २०१५ पासून या कंपनीने आपला गाशा गुंडाळून सुमारे २८ हजार कोटींचा अपहार केला. सांगली जिल्ह्यातून ८९ कोटींची, तर कोल्हापुरातून ३० कोटींची गुंतवणूक झाली आहे. या कंपनीविरोधात नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. कंपनीची सांगलीतील ३९ कोटी रकमेची मालमत्ता शासनाने जप्त केली आहे. शासनाने या मालमत्ता विकून आम्हाला पैसे परत करावे, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली. त्यावर मंत्री केसरकर यांनी सांगितले की, देशभरातून या कंपनीविरोधात फिर्यादी दाखल झाल्या आहेत. महाराष्टÑातही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. राज्य शासनाने या कंपनीच्या काही मालमत्ता जप्त केल्या आहेत. या अपहार प्रकरणावर मुंबईचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार खत्री यांची प्राधिकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.