शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

‘जलयुक्त शिवार’साठी १२ गावांची निवड

By admin | Updated: November 21, 2015 00:16 IST

शाहूवाडी तालुका : पिण्याचे, शेतीचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार

मलकापूर : पाणी पातळीत वाढ होण्यासाठी व टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानार्गत शाहूवाडी तालुक्यातील बारा गावांची निवड झाली आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, मात्र गेली पाच वर्षे पाऊसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील गावातील पाणी पातळीत घट होऊ लागली आहे, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तालुक्यात कडवी, गेळवडे, मानोली, कांडपण, चांदोली, पालेश्वर अशी छोटी मोठी धरणे आहेत. बारमाही कडवी, वारणा, कासारी नद्या भरून वाहत असतात. मात्र डोंगर कपारीत असणाऱ्या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणि टंचाईवर मात करण्यासाठी तसेच कोरडवाहु जमीन बागायत होऊन बळीराजा सुखी होण्यासाठी भुगर्भातील पाणी पातळीत वाढ होण्याची गरज आहे. यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानार्गत शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे, परखंडळे, पणुंद्रे, कोदे, शित्तुर तर्फे मलकापूर,चाळणवाडी-आंबा मानोली कोतोली, तुरूकवाडी, कोळगाव, टेकोली, पिशवी या गावाची निवड झाली आहे. या गावात नाळाबंडिग पाणी आडवा पाणि जिरवा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. माती बंधारे, सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहे. पाणि स्त्रोत बळकटीकरण योजना राबविली जात आहे. ओढे स्वच्छ करणे, आडे लावणे, पाण्याबाबत लोकामध्ये जागृती निर्माण करणे पाणी पातळीत वाढ झाली की ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. डोंगर माथ्यावर बंधारे बांधणे, पाणी अडवणे आदी योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे या बारा गावातील नागरिकांना पिण्याचे व शेतीचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ही योजना राबविण्यासाठी शासनाचे कृषी विभागाचे कर्मचारी राबताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)