शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

‘जलयुक्त शिवार’साठी १२ गावांची निवड

By admin | Updated: November 21, 2015 00:16 IST

शाहूवाडी तालुका : पिण्याचे, शेतीचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार

मलकापूर : पाणी पातळीत वाढ होण्यासाठी व टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानार्गत शाहूवाडी तालुक्यातील बारा गावांची निवड झाली आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, मात्र गेली पाच वर्षे पाऊसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील गावातील पाणी पातळीत घट होऊ लागली आहे, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तालुक्यात कडवी, गेळवडे, मानोली, कांडपण, चांदोली, पालेश्वर अशी छोटी मोठी धरणे आहेत. बारमाही कडवी, वारणा, कासारी नद्या भरून वाहत असतात. मात्र डोंगर कपारीत असणाऱ्या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणि टंचाईवर मात करण्यासाठी तसेच कोरडवाहु जमीन बागायत होऊन बळीराजा सुखी होण्यासाठी भुगर्भातील पाणी पातळीत वाढ होण्याची गरज आहे. यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानार्गत शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे, परखंडळे, पणुंद्रे, कोदे, शित्तुर तर्फे मलकापूर,चाळणवाडी-आंबा मानोली कोतोली, तुरूकवाडी, कोळगाव, टेकोली, पिशवी या गावाची निवड झाली आहे. या गावात नाळाबंडिग पाणी आडवा पाणि जिरवा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. माती बंधारे, सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहे. पाणि स्त्रोत बळकटीकरण योजना राबविली जात आहे. ओढे स्वच्छ करणे, आडे लावणे, पाण्याबाबत लोकामध्ये जागृती निर्माण करणे पाणी पातळीत वाढ झाली की ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. डोंगर माथ्यावर बंधारे बांधणे, पाणी अडवणे आदी योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे या बारा गावातील नागरिकांना पिण्याचे व शेतीचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ही योजना राबविण्यासाठी शासनाचे कृषी विभागाचे कर्मचारी राबताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)