शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

परीक्षार्थ्यांकडून ‘भारताचे संविधान’ला सर्वाधिक मागणी वाचकांचीही पसंती : शासकीय मुद्रणालयात सातवी आवृत्ती उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:10 IST

कोल्हापूर : भारतीय राज्यघटना अर्थात ‘भारताचे संविधान’ या पुस्तकाला आजही वाचकांची पसंती आहे. भारतीय लोकशाहीचा मूलाधार असलेले हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध

कोल्हापूर : भारतीय राज्यघटना अर्थात ‘भारताचे संविधान’ या पुस्तकाला आजही वाचकांची पसंती आहे. भारतीय लोकशाहीचा मूलाधार असलेले हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षार्थ्यांकडून त्याला सर्वाधिक मागणी आहे.

राज्यघटनेच्या तरतुदींनुसार येथील लोकशाही, राज्यव्यवस्था, धर्मनिरपेक्षता जपली जाते. राज्यघटनेचे लेखन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण झाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताने तिचा स्वीकार केला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘भारताचे संविधान’ हे पुस्तक केवळ मराठीत होते. मात्र, अभ्यासकांसह बºयाच परभाषिक नागरिकांना ते समजून घेण्यात अडचणी येत होत्या.

वाचकांच्या मागणीमुळे २०१४ साली या पुस्तकाची इंग्रजी आणि मराठी अशी द्विभाषी आवृत्ती भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी तयार केली आहे. संवैधानिक जनादेशाची पूर्तता व्हावी, जनतेला या देशातील कायद्यांची माहिती व्हावी, त्यांना त्यांच्या प्रादेशिक राजभाषेमध्ये ते समजून घेता यावेत, हा यामागील उद्देश होता. या आवृत्तीत संविधानातील (अठ्ठ्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २०१२ यांच्या तरतुदीसह सर्व सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकांचा १५ आॅगस्ट, २६ जानेवारीच्या दरम्यान सर्वाधिक खप होतो. भेट म्हणून देण्यासाठीही त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

हे पुस्तक ४१७ रुपयांना असून, २०१४ सालापासून आजतागायत अंदाजे १३०० च्या आसपास पुस्तकांची विक्री ताराबाई पार्क येथील शासकीय मुद्रणालयातून करण्यात आली आहे. या पुस्तकाची छपाई केंद्र शासनाच्यावतीने केली जात असल्याने विक्रीतून मिळालेली रक्कमही केंद्राकडे जमा केली जाते. ‘भारताचे संविधान’सह साहित्य संस्कृती मंडळ, दर्शनिका विभाग, भाषा संचालनालय आणि शासनाचे सर्व अधिनियम (जीआर) यांची छपाई शासकीय मुद्रणालयातून केली जाते.बदलानुसार सुधारित आवृत्ती‘भारताचे संविधान’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७९ साली निघाली. दुसरी १९८३, तिसरी १९८८, चौथी १९९२, १९९६, पाचवी २००२, सहावी २००६, २०११ आणि २०१२ साली; तर सातवी आवृत्ती २०१४ साली काढण्यात आली आहे. राज्यघटना लिहिली गेली त्यावेळी देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक स्थिती वेगळी होती. त्यानंतर समाजव्यवस्थेत कालानुरूप बदल होत गेले. या बदलांसाठी म्हणून राज्यघटनेतील विविध कलमांमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. तरतुदी बदलत गेल्या, कायद्यांमध्ये बदल सुचविले गेले. आजतागायत ही बदलांची प्रक्रिया सुरूच आहे. त्या बदलांनुसार पुस्तकाच्या आवृत्त्या काढल्या आहेत. 

‘भारताचे संविधान’ या पुस्तकाला विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांतील नागरिकांकडून मोठी मागणी आहे. इंग्रजी आणि मराठीमध्ये हे पुस्तक असल्याने ते समजून घेण्यासाठी अधिक सोपे आहे. मागणीनुसार पुस्तकाची छपाई केली जाते. याशिवाय बाबासाहेब आंबेडकर व शाहू गौरवग्रंथ या पुस्तकांची अधिक विक्री होते.- संजय वायचळ, व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय