शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

हे चित्र पाहून वसंतदादा स्वर्गात रडत असतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2015 00:18 IST

पतंगराव कदम : जयंत पाटील-मदन पाटील यांच्या जिल्हा बँकेतील युतीवर केली टीका--जिल्हा बँक निवडणूक

सांगली : एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले जयंत पाटील आणि मदन पाटील कधी एकत्र येतील असे मला वाटले नव्हते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वसंतदादा घराण्यातील दोन वारसदार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, हे चित्र पाहून वसंतदादा स्वर्गात रडत असतील, असे मत पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, जयंत पाटील आणि मदन पाटील यांचीच भांडणे होती. महापालिका, बाजार समिती आणि बऱ्याच ठिकाणी दोघेजण भांडत होते. आता पुन्हा तेच एकत्र आले आहेत. आता वसंतदादांचे वारसदारच एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, ही गोष्ट बरोबर नाही. युती झाल्यानंतर मला विशाल पाटील यांनी दूरध्वनी करून, दोन टोळ्या एकत्र आल्याची माहिती दिली. कोणत्या टोळ्या आहेत, त्यांचे उद्योग काय आहेत, याची मला माहिती नाही. पण बँकेच्या हितासाठी राजकारण झाले पाहिजे. मतदारांनी या गोष्टीचे भान ठेवून उमेदवार निवडून द्यावेत. जिल्ह्यातील आर्थिक व्यवस्था सांभाळणारी ही महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे याठिकाणी स्वार्थी कारभार उपयोगाचा नाही. लोक आता हुशार झाले आहेत. युती कशासाठी झाली, कोणी केली, बँकेच्या हितासाठी केली की स्वहितासाठी, हे लोक जाणून आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासघात झाल्याचे वाटत असेल, तर त्यांची भावना चुकीची नाही. त्यांना योग्य तेच वाटत असणार. मदन पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा की नाही, या गोष्टीवर आता चर्चा करण्यात अर्थ नाही. मी त्यांच्याकडे याबाबत काहीही विचारणा केली नाही. त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केलेले आहे. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. काही कारभाऱ्यांनी ही बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणली. याठिकाणच्या घोटाळ्यांचे किस्से राज्यभर गाजले. त्यांची चौकशी अजून सुरू आहे. या चौकशा कधी थांबत नाहीत. त्यामुळे आज ना उद्या त्या पुन्हा मागे लागणार. बँकेतील चुकीच्या कारभाराची माहिती मिळाल्यानंतर रिझर्व्ह बँक व नाबार्डने प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले. प्रशासक नियुक्तीनंतर लगेचच बँकेची आर्थिक स्थिती सुधारली. सांगलीने संपूर्ण महाराष्ट्राला सहकार शिकवला आणि दुर्दैवाने सांगलीतीलच सहकारी संस्थांची अशी अवस्था झाली. याला कोण जबाबदार आहे, याची कल्पना जिल्ह्यातील जनतेला आहे. त्यामुळे कुणी कितीही टिमकी वाजवत असले तरी बँकेचा कारभार चांगला नव्हता, म्हणून रिझर्व्ह बँक व नाबार्डला कडक पाऊल उचलावे लागले. प्रशासक नियुक्तीचा अधिकार हा राज्याच्या अखत्यारीतला नाही. त्यामुळे टीका करणारे काहीही सांगत असतात, असे पतंगराव कदम म्हणाले. (प्रतिनिधी)धोरण बदलतेसिंचन योजनांबाबत शेतकऱ्यांना टंचाई निधीतून मदत केली होती. आता सरकार बदलले आहे. त्यामुळे याबाबतीत धोरणही बदलले आहे. सिंचनाच्या अनुशेषाबाबतही अजूनही पश्चिम महाराष्ट्राच्या नावाने ओरड होत आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले. वाळू माफियांचा बंदोबस्त करावावाळू माफियांची दादागिरी वाढत आहे. तहसीलदार, प्रांत, पोलीस व अन्य कर्मचाऱ्यांवर बेधडकपणे हल्ले केले जात आहेत. वाळू ठेक्यांमध्ये माफियाच घुसले आहेत. माफियांमुळे नदीपात्रातील नैसर्गिक समतोल बिघडला आहे. वाळू उपशामुळे मगरी आक्रमक होऊन हल्ले करीत आहेत. त्यामुळे वाळू माफियांबाबत राज्य शासनाला ठोस निर्णय घ्यावा लागेल, असे कदम म्हणाले बँकेत भ्रष्टाचार करणारे व न करणारे कोण उमेदवार आहेत, हे मतदारांनी पाहावे. चांगले लोक आल्यास बँकेचे हित साधले जाणार आहे, असे ते म्हणाले.