शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

बंद मुठीतील गुपित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:57 IST

गत आठवड्यात इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. हे १०६ वे अधिवेशन. पहिले अधिवेशन १५ ते १७ जानेवारी १९१४ या कालावधीत कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे भरले. दोन ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ प्रा. जे. एल. सायमन्सन आणि प्रा. पी. एस. मॅकमोहन यांच्या पुढाकारातून याची सुरुवात झाली.

विज्ञान--

डॉ. व्ही. एन. शिंदेगत आठवड्यात इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. हे १०६ वे अधिवेशन. पहिले अधिवेशन १५ ते १७ जानेवारी १९१४ या कालावधीत कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे भरले. दोन ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ प्रा. जे. एल. सायमन्सन आणि प्रा. पी. एस. मॅकमोहन यांच्या पुढाकारातून याची सुरुवात झाली. १०५ संशोधकांनी पहिल्या अधिवेशनात भाग घेतला. विज्ञानप्रेमी सर आशुतोष मुखर्जी अध्यक्ष होते. त्याकाळी सहा गट होते. या सहा गटांत ३५ शोधनिबंध वाचण्यात आले. आज ६०,००० पेक्षा जास्त सभासद आहेत. गटांची संख्या १४ झाली आहे. शोधनिबंधांची संख्या २००० पेक्षा जास्त आहे. १९४७ ला पंतप्रधान नेहरू अध्यक्ष होते. ते ३४ वे अधिवेशन होते. तेव्हापासून दरवर्षी पंतप्रधान या अधिवेशनाचे उद्घाटन करतात.

यंदाचे १०६ वे अधिवेशन ३-७ जानेवारी २०१९ या कालावधीत फगवारा येथील लवली प्रोफेशनल विद्यापीठात पार पडले. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून भविष्यातील भारत’ हा या वर्षीचा मुख्य विषय होता. अधिवेशनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपयुक्त संशोधनावर भर देण्याची गरज व्यक्त केली. संशोधनात स्वस्त वैद्यकीय सेवा, निवास, स्वच्छ हवा, पाणी, भरपूर ऊर्जा आणि कृषी उत्पादन वाढविण्यावर भर हवा, असे सांगितले. यावेळी उपस्थित दोन्ही विदेशी नोबेल विजेत्या परदेशी संशोधकांनी, ‘उपयुक्त संशोधन होण्यासाठी मूलभूत संशोधन हे महत्त्वाचे आहे. मूलभूत संशोधन करण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे,’ असे आग्रही प्रतिपादन केले. यासाठी सरकारनेच निधी उपलब्ध करून द्यायला हवा, असेही सांगितले. यात मतभिन्नता असली तरी या तिघांनीही वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून समयोचित भाष्य केले.

काही भारतीय संशोधकांनी मात्र त्या ठिकाणी मांडलेली मते वैज्ञानिक होती का, याचा विचार करणे आवश्यक आहे. मागे एका मंत्रिमहोदयांनी डार्विनच्या सिद्धांताच्या सत्यतेवर आक्षेप घेतला होता. तो इतका गांभीर्याने घेण्याची गरज वाटली नाही; कारण ते मत एका राजकीय नेत्याचे होते. या अधिवेशनात त्याहीपुढे जाऊन काही संशोधकांनीच अशी मते मांडल्याने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

या अधिवेशनाचा मुख्य विषय भविष्यातील भारताबाबत होता; मात्र अनेक तज्ज्ञांनी भूतकाळातील भारताबद्दल शोधनिबंध सादर केले. रामायण, महाभारत ही महाकाव्ये की इतिहास, हा विषय अनेकदा चर्चेत येतो. मात्र, अशा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वैज्ञानिकांच्या संमेलनात आमच्याकडे सर्व अस्त्र, शस्त्रे, प्रक्षेपणास्त्रे कशी होती, हे सांगण्यात अनेकांनी धन्यता मानली. कौरवांचा जन्म टेस्टट्यूब बेबीच्या तंत्राने झाला. रावणाकडे चोवीस विमाने होती. श्रीलंकेत भव्य विमानतळ होते, असा दावा आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागेश्वर राव यांनी केला.हे सर्व वाचून मला एक घटना आठवली. मी मित्राच्या नवजात बाळाला पाहायला गेलो होतो.

मित्राचे वडील गुरुजी होते. त्यावेळी ते पाचवीतील नातवासोबत आले. त्या नातवाने भावाला पाहिले. नंतर तो दवाखान्यातील इतर बाळे पाहू लागला. थोड्या वेळात तो परत आला आणि आजोबांना त्याने प्रश्न विचारला,‘सर्व बाळांच्या मुठी का बंद असतात?’ गुरुजींनी सांगितले, ‘बाळा, त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. सत्य जाणून घ्यायची ओढ असते.’ मला ते उत्तर खूप आवडले आणि पटलेही. लहान मुलाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, हे नंतर अनुभवलेही. आज ही घटना आठवली आणि प्रश्न पडला, अशी अवैज्ञानिक विधाने करणारे संशोधक उघड्या मुठी घेऊन जन्माला आले असतील का?

कानन कृष्णन या संशोधकाने तर आईन्स्टाईन आणि न्यूटन यांना गुरुत्त्वाकर्षण कळलेच नव्हते. सापेक्षतावादाचा सिद्धांत पूर्णत: चुकीचा आहे, असे अनेक विस्मयकारक दावे केले.सकारात्मक बाब एवढीच की, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार आणि जैवरसायनशास्त्र विषयातील नामवंत संशोधक के. विजय राघवन यांनी, अशा अवैज्ञानिक भाषणाबद्दल गुन्हे नोंदवावेत, असे म्हटले.(लेखक विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत.)