शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर’ राज्यात द्वितीय

By admin | Updated: May 26, 2016 00:20 IST

मुलींची बाजी : विभागाचा निकाल ८८.१० टक्के; विभागात सातारा तृतीय स्थानावर

कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणाऱ्या बारावी परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल यावर्षी ८८.१० टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ४.०३ टक्क्यांनी घटला आहे. टक्का घसरला असला तरी, कोल्हापूर विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने ८८. ८१ टक्क्यांसह अव्वल स्थान मिळविले आहे. सांगलीने ८७.९० टक्क्यांसह द्वितीय स्थान अबाधित ठेवले असून, गतवर्षी प्रथम स्थानी असणारा सातारा जिल्हा ८७.३२ टक्क्यांनी तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी आॅनलाईन निकाल जाहीर केला. शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल व सचिव शरद गोसावी यांनी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. यावेळी बी. एस. शेटे, डी. वाय. कदम, डी. बी. कुलाळ, आदी उपस्थित होते. कोल्हापूर विभागातून ७४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील १,२०,६१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी १,०६,२६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ८८.१० इतकी आहे. या परीक्षेसाठी एकूण ७१,३५७ मुले तर, ५३,७५५ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५७,६४६ असून, त्यांचे प्रमाण ८०.७९ टक्के इतके आहे, मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४९,९९१ असून, त्यांचे प्रमाण ९३ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील २७४ कनिष्ठ महाविद्यालयांतून ४९,९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी ४४,३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.८१ टक्के आहे. सांगली जिल्ह्णातील २४७ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३३,५७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी २९,५०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८७.९० टक्के आहे. सातारा जिल्ह्णातील २२७ कनिष्ठ महाविद्यालयांतील ३७,०६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांतील ३२,३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८७.३२ टक्के आहे. विभागात सलग पाचव्या वर्षी उत्तीर्णतेमध्ये मुलींनी आपली आघाडी कायम राखली आहे. गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३ जून) दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधणारनिकालात कमी-अधिक होत राहते. कोल्हापूर विभागाच्या तेरा वर्षांत पहिल्यांदा गेल्या वर्षी ९२.१३ टक्के इतका निकाल लागला. त्यात फारशी वाढ अथवा घट होणे अपेक्षित नव्हते. यावर्षी विभागाच्या घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधली जातील, असे मंडळाचे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी सांगितले. ते म्हणाले, कारणांचा शोध घेऊन त्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. गेल्यावर्षी ०.५९ टक्क्यांनी वाढूनही कोल्हापूर विभाग तृतीय क्रमांकावर होता. यंदा टक्केवारी घटली असली तरी, राज्यात विभागाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.जिल्हानिहाय निकालजिल्हाटक्केवारीकोल्हापूर८८.८१सांगली८७.९०सातारा८७.३२मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १२.२१ टक्क्यांनी अधिककोल्हापूर विभागाचा निकाल ४.०२ टक्क्यांनी घटलाविभागात कोल्हापूरची आघाडीगैरप्रकार निम्म्याने घटले.