शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

‘कोल्हापूर’ राज्यात द्वितीय

By admin | Updated: May 26, 2016 00:20 IST

मुलींची बाजी : विभागाचा निकाल ८८.१० टक्के; विभागात सातारा तृतीय स्थानावर

कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणाऱ्या बारावी परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल यावर्षी ८८.१० टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ४.०३ टक्क्यांनी घटला आहे. टक्का घसरला असला तरी, कोल्हापूर विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने ८८. ८१ टक्क्यांसह अव्वल स्थान मिळविले आहे. सांगलीने ८७.९० टक्क्यांसह द्वितीय स्थान अबाधित ठेवले असून, गतवर्षी प्रथम स्थानी असणारा सातारा जिल्हा ८७.३२ टक्क्यांनी तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी आॅनलाईन निकाल जाहीर केला. शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल व सचिव शरद गोसावी यांनी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. यावेळी बी. एस. शेटे, डी. वाय. कदम, डी. बी. कुलाळ, आदी उपस्थित होते. कोल्हापूर विभागातून ७४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील १,२०,६१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी १,०६,२६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ८८.१० इतकी आहे. या परीक्षेसाठी एकूण ७१,३५७ मुले तर, ५३,७५५ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५७,६४६ असून, त्यांचे प्रमाण ८०.७९ टक्के इतके आहे, मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४९,९९१ असून, त्यांचे प्रमाण ९३ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील २७४ कनिष्ठ महाविद्यालयांतून ४९,९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी ४४,३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.८१ टक्के आहे. सांगली जिल्ह्णातील २४७ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३३,५७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी २९,५०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८७.९० टक्के आहे. सातारा जिल्ह्णातील २२७ कनिष्ठ महाविद्यालयांतील ३७,०६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांतील ३२,३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८७.३२ टक्के आहे. विभागात सलग पाचव्या वर्षी उत्तीर्णतेमध्ये मुलींनी आपली आघाडी कायम राखली आहे. गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३ जून) दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधणारनिकालात कमी-अधिक होत राहते. कोल्हापूर विभागाच्या तेरा वर्षांत पहिल्यांदा गेल्या वर्षी ९२.१३ टक्के इतका निकाल लागला. त्यात फारशी वाढ अथवा घट होणे अपेक्षित नव्हते. यावर्षी विभागाच्या घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधली जातील, असे मंडळाचे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी सांगितले. ते म्हणाले, कारणांचा शोध घेऊन त्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. गेल्यावर्षी ०.५९ टक्क्यांनी वाढूनही कोल्हापूर विभाग तृतीय क्रमांकावर होता. यंदा टक्केवारी घटली असली तरी, राज्यात विभागाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.जिल्हानिहाय निकालजिल्हाटक्केवारीकोल्हापूर८८.८१सांगली८७.९०सातारा८७.३२मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १२.२१ टक्क्यांनी अधिककोल्हापूर विभागाचा निकाल ४.०२ टक्क्यांनी घटलाविभागात कोल्हापूरची आघाडीगैरप्रकार निम्म्याने घटले.