शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘कोल्हापूर’ राज्यात द्वितीय

By admin | Updated: May 26, 2016 00:20 IST

मुलींची बाजी : विभागाचा निकाल ८८.१० टक्के; विभागात सातारा तृतीय स्थानावर

कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणाऱ्या बारावी परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल यावर्षी ८८.१० टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ४.०३ टक्क्यांनी घटला आहे. टक्का घसरला असला तरी, कोल्हापूर विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने ८८. ८१ टक्क्यांसह अव्वल स्थान मिळविले आहे. सांगलीने ८७.९० टक्क्यांसह द्वितीय स्थान अबाधित ठेवले असून, गतवर्षी प्रथम स्थानी असणारा सातारा जिल्हा ८७.३२ टक्क्यांनी तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी आॅनलाईन निकाल जाहीर केला. शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल व सचिव शरद गोसावी यांनी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. यावेळी बी. एस. शेटे, डी. वाय. कदम, डी. बी. कुलाळ, आदी उपस्थित होते. कोल्हापूर विभागातून ७४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील १,२०,६१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी १,०६,२६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ८८.१० इतकी आहे. या परीक्षेसाठी एकूण ७१,३५७ मुले तर, ५३,७५५ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५७,६४६ असून, त्यांचे प्रमाण ८०.७९ टक्के इतके आहे, मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४९,९९१ असून, त्यांचे प्रमाण ९३ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील २७४ कनिष्ठ महाविद्यालयांतून ४९,९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी ४४,३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.८१ टक्के आहे. सांगली जिल्ह्णातील २४७ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३३,५७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी २९,५०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८७.९० टक्के आहे. सातारा जिल्ह्णातील २२७ कनिष्ठ महाविद्यालयांतील ३७,०६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांतील ३२,३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८७.३२ टक्के आहे. विभागात सलग पाचव्या वर्षी उत्तीर्णतेमध्ये मुलींनी आपली आघाडी कायम राखली आहे. गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३ जून) दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधणारनिकालात कमी-अधिक होत राहते. कोल्हापूर विभागाच्या तेरा वर्षांत पहिल्यांदा गेल्या वर्षी ९२.१३ टक्के इतका निकाल लागला. त्यात फारशी वाढ अथवा घट होणे अपेक्षित नव्हते. यावर्षी विभागाच्या घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधली जातील, असे मंडळाचे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी सांगितले. ते म्हणाले, कारणांचा शोध घेऊन त्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. गेल्यावर्षी ०.५९ टक्क्यांनी वाढूनही कोल्हापूर विभाग तृतीय क्रमांकावर होता. यंदा टक्केवारी घटली असली तरी, राज्यात विभागाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.जिल्हानिहाय निकालजिल्हाटक्केवारीकोल्हापूर८८.८१सांगली८७.९०सातारा८७.३२मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १२.२१ टक्क्यांनी अधिककोल्हापूर विभागाचा निकाल ४.०२ टक्क्यांनी घटलाविभागात कोल्हापूरची आघाडीगैरप्रकार निम्म्याने घटले.