शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

जिल्ह्यातील ‘माळीण’ गावांचा शोध सुरू

By admin | Updated: August 1, 2014 00:36 IST

धोकादायक गावे : ‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागे

पाटण : पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’ गावातील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही ‘माळीण’सारखी कैक गावं डोंगर छाताडावर घेऊन जगत असल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाकडून आता धोकादायक गावांची माहिती माहिती फोनवरून घेण्याचे काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष गावांत जाऊन ग्रामस्थांच्या अडचणींची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.पाटण तालुक्यातील निम्मी गावे डोंगरकड्यांच्या आडोशाला वसली आहेत. पावसाळ्यात त्यांच्यावर कड्याची टांगती तलवार असते. डोंगरकडेला असणारी गावे शोधून त्यांना धोका आहे का, याची शोधमोहीम तलाठ्यांमार्फत राबविली जाणार आहे. आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी डोंगरच्या आडोशाला असणाऱ्या गावांचा सर्व्हे करण्याची मागणीही केली आहे. परळी : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील काळोशी गाव गायदार कड्याच्या खाली वसले आहे. हा कडा सध्या धोकायदायक स्थितीत आहे. पोलीस प्रशासनाने गुरुवारी काळोशी गावाला भेट देऊन पाहणी केली. गुरुवारी दुपारी एक वाजता पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळोशी गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून लवकरच याबाबत ग्रामसभा बोलावून धोकादायक कडा हटविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)आमचं बी गाव डोंगराखाली हाय!‘लोकमत’ने पाटण तालुक्यातील धोकायदायक गावांची सचित्र माहिती प्रसिद्ध केल्यानंतर अनेकांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी संपर्क साधून ‘अहो, आमचं बी गाव डोंगराखाली हाय, शासन लक्ष कधी देणार? तेवढी आमच्या गावाची बातमी लावा,’ अशी मागणी केली.तालुक्यातील विठ्ठलवाडी, झिमनवाडी, सुपुगडेवाडी, बोर्गेवाडी, म्हारवंड ही गावे चर्चेत आहेत. या गावांचा सर्व्हे पूर्वीच केला आहे. अशी तालुक्यात बरीच गावे आहेत. काही गावांचे पुनर्वसनाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत. - किशोर पवार, प्रांताधिकारी, पाटण