शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५ नोव्हेंबरपासून धुराडी पेटणार

By admin | Updated: October 19, 2016 00:31 IST

कोंडी फुटणार : मंत्री समितीच्या बैठकीत आज निर्णय

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास सरकारकडून ‘हिरवा कंदील’ मिळणार आहे. याबाबत आज, बुधवारी होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस निर्माण झालेली हंगामाची कोंडी फुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत १ डिसेंबरपासून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. उसाच्या कमतरतेचे कारण पुढे करत हंगाम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फटका प. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसणार आहे. कर्नाटकातील कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जाण्याची अधिक आहे. परिणामी, महाराष्ट्रातील कारखाने अडचणीत येणार आहेत. यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हंगाम सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांची होती. याबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार पुन्हा मंत्री समितीची बैठक बोलावून बदल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज दुपारी एक वाजता मुंबईत मंत्री समितीची बैठक होत आहे. १ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी आहे, त्यामुळे ५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांसह शेतकरी संघटनेची आहे. त्यामुळे मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार हे निश्चित आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस हंगामाबाबत झालेली कोंडी फुटणार आहे. (प्रतिनिधी)मंत्री समितीच्या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.