शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

५ नोव्हेंबरपासून धुराडी पेटणार

By admin | Updated: October 19, 2016 00:31 IST

कोंडी फुटणार : मंत्री समितीच्या बैठकीत आज निर्णय

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास सरकारकडून ‘हिरवा कंदील’ मिळणार आहे. याबाबत आज, बुधवारी होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस निर्माण झालेली हंगामाची कोंडी फुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत १ डिसेंबरपासून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. उसाच्या कमतरतेचे कारण पुढे करत हंगाम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फटका प. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसणार आहे. कर्नाटकातील कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जाण्याची अधिक आहे. परिणामी, महाराष्ट्रातील कारखाने अडचणीत येणार आहेत. यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हंगाम सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांची होती. याबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार पुन्हा मंत्री समितीची बैठक बोलावून बदल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज दुपारी एक वाजता मुंबईत मंत्री समितीची बैठक होत आहे. १ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी आहे, त्यामुळे ५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांसह शेतकरी संघटनेची आहे. त्यामुळे मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार हे निश्चित आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस हंगामाबाबत झालेली कोंडी फुटणार आहे. (प्रतिनिधी)मंत्री समितीच्या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.