शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

पेच कायम; मंडई ‘बंद’च

By admin | Updated: March 7, 2017 00:12 IST

बैठक निष्फळ ; ‘अडती’च्या मुद्द्यावर दुकानदार-व्यापारी दोघेही ठाम

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील अडत दुकानदार व व्यापाऱ्यांच्यातील अडत देण्यावरून निर्माण झालेला पेच सहाव्या दिवशीही कायम आहे. दोन्ही घटकांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी कपिलतीर्थ मार्केटमध्ये झाली; पण व्यापारी अडत न देण्यावर ठामच असल्याने बैठक निष्फळ ठरली. भाजीपाला खरेदीवर ६ टक्के अडत देण्यास विरोध करीत व्यापाऱ्यांनी बुधवार (दि. १) पासून बाजार समितीतून माल खरेदी बंद केली आहे. कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातील सुमारे एक हजाराहून अधिक व्यापारी या संपात उतरल्याने शहरासह शेजारील गावांतील आठवडी बाजारातील व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजार समितीत साधारणत: रोज दोन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होते, पण व्यापाऱ्यांच्या संपापासून उलाढाल थंडावली आहे. स्थानिक व्यापारी जरी ४० टक्के माल उचलत असले तरी बाहेरील कोणीही माल खरेदी करू नये, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केल्याने भाजी खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. अडत व व्यापाऱ्यांचेच यामुळे नुकसान होत नाही तर समितीलाही ‘सेस’च्या माध्यमातून रोज तीस हजारांचा फटका बसत आहे. गेले दोन दिवस अडत दुकानदारांनी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रविवारी चर्चेदरम्यानच व्यापाऱ्याला जबर मारहाण झाल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. सोमवारी सकाळी भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जमीर बागवान, संदीप मराठे, चिंकू भोसले, अब्दुल बागवान, रहिम बागवान, जाफर बागवान या अडत्यांनी पुढाकार घेत कपिलतीर्थ मार्केटमध्ये चर्चेचा प्रयत्न केला. राज्य सरकारच्या धोरणानुसारच अडत घेत आहे, त्यात बदल करण्याचा अधिकार ना बाजार समितीला आहे ना अडत्यांना आहे. त्यामुळे आपण सामूहिक मागणी सरकारच्या पातळीवर करूया, असे आवाहन जमीर बागवान यांनी केले. अडते, व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. अनेकांची हातावरील पोटे आहेत. त्यामुळे उपाशीपोटी लढा देता येणार नाही. खरेदी सुरू करून सरकारशी लढाई करूया, असे आवाहन बागवान यांनी केले; पण ‘अडत देणार नाहीच,’ यावर व्यापारी ठाम राहिल्याने बैठक निष्फळ ठरली. यावेळी व्यापारी संघटनेचे राजू जाधव, विलास मेढे, राजू लायकर, पिंटू आंबेकर, रियाज बागवान, महेबूब बागवान उपस्थित होते. बाजार समिती : नवीन लायसन्स देणारव्यापारी जर आडमुठे धोरण घेणार असतील तर बाजार समितीला पावले उचलावी लागतील. शहरासह ग्रामीण भागातील भाजीपाला व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना समिती लायसन्स देणार आहे. एका दिवसात लायसन्स दिले जाईल. त्यांनी माल खरेदी करून शहरासह ग्रामीण भागात विक्री करावा, असे आवाहन सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांनी केले.