शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्यापाठोपाठ गेल्या आठवड्यापासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्यापाठोपाठ गेल्या आठवड्यापासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले. मात्र, कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेची १२१ महाविद्यालयांतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग अद्याप बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण घेण्यात मर्यादा येत असल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविद्यालये त्वरित सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

कोरोनामुळे गेल्या ११ महिन्यांपासून जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील वर्ग प्रत्यक्षात भरलेले नाहीत. ऑफलाईन पध्दतीने वर्ग सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात इयत्ता नववी ते बारावीचे, तर गेल्या आठवड्यापासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शासनाच्या सूचनेनुसार शाळांना कोरोनाबाबतची आवश्यक दक्षता घेतली आहे. या वर्गांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीही चांगली आहे. त्यापार्श्वभूमीवर महाविद्यालयांतील वर्गही प्रत्यक्षात सुरू करण्याची मागणी विद्यार्थी आणि संघटनांकडून सातत्याने सुरू आहे. कोरोनाबाबतची दक्षता घेऊन वर्ग सुरू करण्यास हरकत नसल्याचे प्राचार्य, प्राध्यापक संघटनांचे म्हणणे आहे. शिवाजी विद्यापीठ आणि महाविद्यालयांची भूमिकाही सकारात्मक आहे. जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन वर्ग सुरू करण्याची तयारी असल्याचे त्यांनी शासनाला कळविले आहे.

चौकट

१ लाख ९ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

जिल्ह्यात पदवी आ‌णि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ९ हजार ४२४ इतकी आहे. त्यात ५८,८९९ मुले, तर ५०,५२५ मुली आहेत. ऑनलाईन शिक्षण घेण्यातील अडचणींमुळे त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वाटत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी कॉलेज लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

प्रतिक्रिया

कोरोनामुळे बंद करण्यात आलेले उद्योग, व्यवसाय, जिम, मंदिरे आदी सुरू झाले आहे. मात्र, महाविद्यालये अद्याप बंद आहेत. विद्यार्थी हित लक्षात घेता महाविद्यालये लवकर सुरू करावीत.

- ऋषिकेश माळी, महानगरमंत्री, अभाविप.

सिनेमागृहे, हॉटेल असे सर्व काही पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयांतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू करण्यास अडचण नाही. त्याबरोबर ग्रंथालय, अभ्यासिकादेखील सुरू कराव्यात.

- प्रशांत आंबी, राज्य सेक्रेटरी, एआयएसएफ.

बीएएलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये मी शिक्षण घेत आहे. गेल्या सात महिन्यांपासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. अशा पध्दतीने काही मुद्दे समजून घेणे अडचणीचे ठरते. त्यामुळे वर्ग प्रत्यक्षात सुरू व्हावेत.

- रेवती पाटील, संभाजीनगर.

मी सध्या एम. ए. राज्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या द्वीतीय वर्षात आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यात तांत्रिक, आकलनाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे महाविद्यालयात ऑफलाईन पध्दतीने वर्ग भरविण्यात यावेत.

- सुधीर पाटील, सायबर चौक.

जिह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

एकूण महाविद्यालये : १२१

एकूण विद्यार्थी संख्या : १,०९,४२४