शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘सावकर’, 'प्रकाशआण्णा’ वाकड्यात, जिल्ह्याची राजकीय दिशा बदलणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 15:36 IST

आमदार विनय कोरे यांनी ‘पापा’ची किंमत तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘पांग’ फेडण्याचा इशारा देऊन भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निकालाने सत्तारूढ आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून त्यातून आमदार विनय कोरे यांनी ‘पापा’ची किंमत तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘पांग’ फेडण्याचा इशारा देऊन भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. आवाडे यांना गडहिंग्लज विभागासह राधानगरी, करवीर, कोल्हापूर शहराने झटका दिला असला तरी त्यांच्या होमपिच ‘हातकणंगले’मध्ये अर्जुन आबीटकर यांनी घेतलेल्या ६९ मतांनी पराभवाचा पाया रचला, हेही विसरता येणार नाही.

विधानपरिषद निवडणुकीपासून जिल्ह्यात विनय काेरे, प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक यांनी मोट बांधली आहे. वडगाव बाजार समितीमध्ये तिन्ही नेत्यांनी ताकद दाखवून देत जिल्हा बँकेची तयारी सुरू केली होती. सत्तारुढ आघाडीतील नाराजांना सोबत घेऊन पॅनेलची तयारी केली होती. त्यामुळेच सत्तारुढ गटाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत काेरे व आवाडे यांना आत घेऊन ‘बिनविरोध’चा प्रयत्न केला. मात्र, अनपेक्षितपणे सोबत असणारे बाजूला गेले आणि निवडणूक लागली.सत्तारुढ आघाडीतील नेत्यांकडे पतसंस्था-बँका गटातील मतदारांची संख्या आवाडे यांना विजयापर्यंत नेणारी होती. सर्व नेते आपणाला मदत करतील, या आशेवर आवाडे गाफिल राहिले आणि तिथेच दणका बसला. ‘पतसंस्था’ गटातील पराभव आवाडे यांच्या जिव्हारी लागला आहे. विश्वासाने आघाडीत घेऊन घात केल्याची भावना त्यांची आहे.

प्रक्रिया गटात बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना विनय काेरे यांनी विरोध केला असला तरी ४४८ पैकी १६० मते त्यांच्याकडे घट्ट होती. सत्तारूढ आघाडीच्या काही नेत्यांनी मदन कारंडे व प्रदीप पाटील यांच्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, मताचे पॉकिट व बाबासाहेब पाटील यांच्या संपर्कापुढे त्या नेत्यांचे प्रयत्नही अपयशी ठरले. जरी नेत्यांनी आसुर्लेकरांचा पराभव करायचाच असे ठरविले असते तरी मतदार त्यांच्या हाताला लागले नसते, हेही खरे आहे.रोख सत्तारुढ आघाडीतील नेत्यांकडे कोरे, आवाडे यांच्या आरोपाचा रोख सत्तारुढ आघाडीतील नेत्यांकडे असल्याने निकालाचा जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्याचे पडसाद आगामी बाजार समिती, महापालिका, जिल्हा परिषदेसह लोकसभा निवडणुकीत दिसणार हे मात्र निश्चित आहे.

राखीव गटातही सोयीचे राजकारण

सत्तारूढ गटाच्या राखीव गटातील जागा मोठ्या फरकाने विजयी झाल्या असल्या तरी महिला गटात झालेले मतदान पाहता येथेही सोयीचे राजकारण झाल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरेPrakash Awadeप्रकाश आवाडे