शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

सौरभ पाटील याला राष्ट्रपती सुवर्णपदक, तर महेश्वरी गोळे हिला कुलपती सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 16:58 IST

Shivaji University Kolhapur- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ साध्या आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. कोरोनाबाबतच्या निर्बंधामुळे यंदा प्रत्यक्षात कोणतीही पदवी या समारंभामध्ये प्रदान करण्यात आली नाही. त्याऐवजी राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता सौरभ पाटील, कुलपती सुवर्णपदक विजेती महेश्वरी गोळे आणि पीएच.डी.धारक बसवराज माळी, अमोल माने, मृणालिनी अहिरे, बलगोंडा पाटील यांची प्रातिनिधिक स्वरूपात नावे जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देसौरभ पाटील याला राष्ट्रपती सुवर्णपदक, तर महेश्वरी गोळे हिला कुलपती सुवर्णपदकशिवाजी विद्यापीठाचा ऑनलाइन दीक्षांत समारंभ

कोल्हापूर :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ साध्या आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. कोरोनाबाबतच्या निर्बंधामुळे यंदा प्रत्यक्षात कोणतीही पदवी या समारंभामध्ये प्रदान करण्यात आली नाही. त्याऐवजी राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता सौरभ पाटील, कुलपती सुवर्णपदक विजेती महेश्वरी गोळे आणि पीएच.डी.धारक बसवराज माळी, अमोल माने, मृणालिनी अहिरे, बलगोंडा पाटील यांची प्रातिनिधिक स्वरूपात नावे जाहीर करण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी, तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातून या समारंभाचे थेट प्रेक्षपण करण्यात आले.

नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थिकेंद्रित आहे. त्यात कला, संशोधन, कौशल्य, मानवी मूल्ये, सामाजिक समस्या सोडविण्याचा दृष्टिकोनाचा समावेश आहे. या धोरणामुळे शिक्षणातून उच्च दर्जाचे कौशल्य असणारे मनुष्यबळ विकसित होईल. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठण्याच्या योग्यवेळी हे धोरण आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी रोडमॅप ठरवून विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांनी कार्यरत होणे आवश्यक असल्याचे डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

पदवी मिळणे ही शिक्षणाची सुरुवात असून शेवट नाही. पदवीधरांनी आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करावा. नोकरी मागणारे होण्याऐवजी रोजगार संधी निर्माण करणारे कसे होता येईल, यादृष्टीने पदवीधरांनी कार्यरत राहावे. प्रांतवाद, जातीभेद करू नये. आत्मनिर्भरतेची सुरुवात स्वत:पासून करावी, असे ‌आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. नॅकचे ए-प्लस प्लस मानांकन मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला नवीन उपक्रमांसाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, पी. आर. शेवाळे, मेघा गुळवणी, एस. एस. महाजन, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यापीठाच्या वार्षिक कामगिरीचा आढावा सादर केला. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी पदवीधरांची माहिती दिली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. धैर्ययशील यादव, नंदिनी पाटील, तृप्ती करेकट्टी यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठuniversityविद्यापीठkolhapurकोल्हापूर