शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

सतेज, पी. एन. मनोमिलनातून काँग्रेस बळकट करू

By admin | Updated: June 15, 2016 00:08 IST

पतंगराव कदम : कोल्हापुरातून सुरुवात करूया; कौलव येथे बाळासाहेब पाटील पुण्यतिथी कार्यक्रम

भोगावती : काँग्रेस पक्षाने विधायक दृष्टिकोन ठेवून विकास साधला आहे. या पक्षाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे काँग्रेस तशी संपणार नाही. म्हणून पक्ष संघटना बळकट करण्याची सुरुवात कोल्हापुरातून पी. एन. पाटील आणि आ. सतेज पाटील यांच्या मनोमिलनाने करू, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी जाहीर केले.कौलव (ता. राधानगरी) येथे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या २५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.कदम म्हणाले, बाळासाहेब पाटील हे संयमी नेतृत्व होते. सहकाराचा आज दिसणारा वटवृक्ष हा एकेकाळी कौलवकरांनी लावलेले रोपटं होतं, म्हणूनच त्यांचे विचार राज्याने स्वीकारले आहेत. बाळासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याची सुरुवात करून खणखणीत नाणं करू, असा विश्वास व्यक्त केला.माजी आ. पी. एन. पाटील म्हणाले, बाळासाहेब पाटील-कौलवकरांचे कार्य राज्याला परिचित आहे. म्हणून आज तमाम जनसागराच्या साक्षीने त्यांची पुण्यतिथी साजरी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली आहेत. त्यामुळे कर्जमाफी आधी शेतसारा माफी झाली पाहिजे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने काँग्रेसमुक्त भारत करण्यापेक्षा आत्महत्यामुक्त भारत बनवावा, असा संकल्प करावा. सोनिया गांधी यांनी देशात ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. भोगावती कारखान्यावर शंभर कोटींचे कर्ज आहे म्हणणाऱ्यांनी आता २00 कोटींच्या वर कर्ज केले आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.देवयानी हलके, लक्ष्मीकांत हुंडे, रोहन पाटील, ए. डी. पाटील, महादेव पाटील व विविध स्पर्धांतील स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जि. प.चे शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे, तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, शामराव देसाई, राधानगरीचे सभापती जयसिंग खामकर, विश्वनाथ पाटील, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी संचालक विजयसिंह डोंगळे, धीरज डोंगळे, डी. आय. पाटील, उपसभापती दत्तात्रय मुळीक, विजयसिंह मोरे, शिवाजी तळेकर, एम. आर. पाटील, रमेश वारके, प्रा. ए. डी. चौगले, संभाजीराव पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक उदयसिंह पाटील-कौलवकर यांनी केले. संजय चरापले यांनी आभार मानले.(वार्ताहर)