शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

सत्यशोधक --डॉ. जयसिंगराव पवार

By admin | Updated: January 28, 2017 01:02 IST

हे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय इतिहास लेखक आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव माहीत आहे, त्याचे कारण त्यांची इतिहास विषयाची पुस्तके, पदवी, पदव्युत्तर आणि एमपीएससी, युपीएससी या परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी डॉ. जयसिंगराव पवार यांचीच पुस्तके वापरतात. सुबोध शैलीत लिहिलेली ही सर्व पुस्तके विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. तीस वर्षांच्या माझ्या अध्यापनाच्या अनुभवातून मला ही गोष्ट माहीत झाली की, डॉ. जयसिंगराव पवार हे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय इतिहास लेखक आहेत. ‘मराठ्यांचा इतिहास’ हा त्यांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. मराठ्यांचा इतिहासाचा सांगोपांग अभ्यास असणारे आज अगदी बोटावर मोजता येतील इतकेच संशोधक आहेत. त्यामध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. अलीकडच्या काळात डॉ. जयसिंगराव पवार महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशात तसेच जगभरातील अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध झाले. १९८० पासून मी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सान्निध्यात आहे. छत्रपती संभाजी महाराज, छ. राजाराम, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर साधने मिळविताना जयसिंगराव पवार यांना अनेक नवीन साधने मिळाली. त्याबद्दल ते आमच्याशी चर्चा करीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सामान्यांसाठी स्वतंत्र असे शिवचरित्र लिहिण्याची फार मोठी गरज आहे, याची त्यांना जाणीव झाली होती, परंतु हाती घेतलेले अनेक प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्राधान्यामुळे त्यांच्याकडून ही गोष्ट राहून गेली. कॉ. गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता’ ही पुस्तिका लिहिली. तेव्हाही डॉ. पवार व पानसरे यांची अनेक गोष्टींवर चर्चा होत असे. त्यांना मिळालेल्या नवीन साधनांच्या आधारे त्यांनी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, ते शहाजी महाराजांचे प्रामाणिक कारभारी होते. तसेच ते आदिलशहाचे नोकर असल्यामुळे शिवाजी महाराजांचे सुरुवातीच्या काळातील किल्ले जिंकून स्वराज्य निर्मितीचे प्रयत्न दादोजींना मान्य नव्हते, ही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध केली. शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था त्यांचे वडील शहाजीराजे यांनी अत्यंत विचारपूर्वक केली होती. बंगलोरवरून येताना शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी त्यांच्याबरोबर निरनिराळ्या विद्यांमध्ये पारंगत ३६ शिक्षकांना पाठविले होते. म्हणजेच दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीचे प्रेरणा देणारे नसून, त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब, पिता शहाजीराजे हेच त्यांचे खरे मार्गदर्शक आहेत, असा शोधनिबंध लिहून सिद्ध केले. नवीन वस्तुनिष्ठ साधने मिळाली तर इतिहासकाराने ती मान्य करून आपले जुने प्रतिपादन बदलले पाहिजे, हे जयसिंगराव पवार यांनी आम्हाला शिकविले आहे. सन १९६४ ते आजअखेर डॉ. जयसिंगराव यांनी जाणीवपूर्वक मानाची पदे नाकारून फक्त इतिहासाची सेवा केली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे ते कृतिशील पाईक बनले आहेत. घरातील कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पुरोहितास बोलावत नाहीत. सत्यनारायण, तुळशीचे लग्न, कर्मकांड, व्रतवैकल्ये बंद केली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी मला साक्ष ठेवून त्यांची कन्या डॉ. मंजुश्री यांना तिला पसंत पडेल अशा कोणत्याही जातीच्या वा धर्माच्या मुलाशी लग्न करण्यास माझी परवानगी आहे असे सांगितले. ते मला म्हणाले की, मोठ्या माणसांची फक्त चरित्रे लिहून उपयोग नाही, तर त्यांचे विचार स्वीकारून कृती केली पाहिजे. आज जयसिंगराव सत्यशोधक विचार घेऊन कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी वसुधा त्यांच्या सर्व कार्यात बरोबरीने काम करतात. डॉ. अरुंधती, डॉ. मंजुश्री या त्यांच्या लेखनकार्यास सहकार्य करतात, शिवाय प्रबोधनाच्या कार्यात पुढे राहतात. अनेक प्रतिष्ठित असे २१ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते डॉ. पवार यांचा सन्मान झाला आहे. ’ प्रा. डॉ. टी. एस. पाटील