शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सातारच्या कैलास स्मशानभूमीला १४ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 21:48 IST

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अथक प्रयत्न : व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा अखंड जागर; गुटखा-तंबाखूला ‘नो एंट्री’

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : संगम माहुली येथील श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून जनतेच्या गरजेचा कैलास स्मशानभूमीला प्रकल्पाला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. कोणताही सार्वजनिक प्रकल्प उभा करणे जेवढे महत्वाचे असते, त्यापेक्षा त्याची सातत्याने देखभाल करणे हे जास्त महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने आपले कर्तव्य म्हणून गेली १४ वर्षे प्रामाणिक पणे पार पाडत आहे.राजेंद्र चोरगे यांनी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून एक सुसज्ज, देखणी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय केला. ध्येय निश्चित होते, काय करायचे ते स्पष्ट होते. भव्य अशा स्मशानभूमीचा आराखय्ऋाही तयार झाला होता. तोच घेवून राजेंद्र चोरगे सहकारी जनतेत गेले. जनतेनेही त्यांनी भरभरून साथ दिली आणि बघता बघता त्यावेळी तब्बल १ कोटी रुपये खर्च करून अतिशय भ्नकम मात्र तितकीच देखणी आणि वनराईने वेढलेली स्मशानभूमी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, दानशूर सातारकरांच्या सहभागातून उभी राहिली.या स्मशान भूमीस कोणत्याही प्रकारचे शासकीय,निमशासकीय अनुदान बांधकामासाठी मिळाले नाही. तात्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार, मदन भोसले त्याचबरोबर दिवंगत सुरेशदादा पळणीटकर, तात्कालीन जिल्हाधिकारी अनिल डिग्गीकर व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बंड, पत्रकार शरद काटकर, तसेच सर्वसामान्य सातारकरांचा सुध्दा मोलाचे सहकार्य व वाटा आहे.गुटखा, तंबाखू इत्यादी व्यसन करून कोणी आल्यास त्यास विनंती करून स्मशानभूमीतून बाहेर जाण्यास विनंती केली जाते. नागरिकांचे सुध्दा यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असते. सीसी टी.व्ही च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा सुध्दा याठिकाणी उपलब्ध असून अशा प्रकारची व्यवस्था राबविणारी महाराष्ट्रातील ही एकमेव स्मशानभूमी आहे. कैलास स्मशानभूमी परिसरातील लोकांची निस्वार्थी भावनेने व विना मोबदला सेवा करीत आहे. यासाठी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक, सदस्य राजेंद्र चोरगे, संजय कदम, उदय गुजर, नितीन माने, खंडेलवाल बंधू, सुधीर शिंंदे, विजय देवी, सुहास राजेशिर्के, अंबाजी देसाई, सुनील चतूर, सुनील खत्री, विजय पवार, दीपक मेथा, युवराज दबडे, बाळासाहेब नाईक प्रयत्नशील आहेत. १६ हजार ५00 मृतदेहांवर अंत्यसंस्कारकैलास स्मशानभूमी मध्ये आज पर्यंत १४ वर्षात १६५०० मृतात्म्यावर अंत्यविधी केले असून या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तसेच अत्यंत गरीब व बेवारस मृतातम्यावर अंत्यसंस्कार करणेसाठी मोङ्खत गोवरी पुरविल्या जात असतात. १२ वर्षापासून पारंपारिक पध्दतीने लाकय्ऋामध्ये दहन केला जात असलेला अंत्यविधी बंद करून शेण्याचा वापर करून दहन करण्यास सुरुवात केली. त्यावेळेपासून आजपर्यंत जवळ जवळ वीस हजार झाडे (१० वर्षे वाढ झालेली) वाचलेली आहेत. शेण आणि पालापाचोळा यापासून गोवरी तयार करण्यात येत असून याची जबाबदारी जिल्हयातील काही बचत गटांना देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्मिती झाली आहे. यामुळे झाडांची होणारी कत्तल थांबनू प्रदूषण कमी होण्यास मदत होऊ लागली आहे.