शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सातारच्या कैलास स्मशानभूमीला १४ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 21:48 IST

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अथक प्रयत्न : व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा अखंड जागर; गुटखा-तंबाखूला ‘नो एंट्री’

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : संगम माहुली येथील श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून जनतेच्या गरजेचा कैलास स्मशानभूमीला प्रकल्पाला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. कोणताही सार्वजनिक प्रकल्प उभा करणे जेवढे महत्वाचे असते, त्यापेक्षा त्याची सातत्याने देखभाल करणे हे जास्त महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने आपले कर्तव्य म्हणून गेली १४ वर्षे प्रामाणिक पणे पार पाडत आहे.राजेंद्र चोरगे यांनी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून एक सुसज्ज, देखणी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय केला. ध्येय निश्चित होते, काय करायचे ते स्पष्ट होते. भव्य अशा स्मशानभूमीचा आराखय्ऋाही तयार झाला होता. तोच घेवून राजेंद्र चोरगे सहकारी जनतेत गेले. जनतेनेही त्यांनी भरभरून साथ दिली आणि बघता बघता त्यावेळी तब्बल १ कोटी रुपये खर्च करून अतिशय भ्नकम मात्र तितकीच देखणी आणि वनराईने वेढलेली स्मशानभूमी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, दानशूर सातारकरांच्या सहभागातून उभी राहिली.या स्मशान भूमीस कोणत्याही प्रकारचे शासकीय,निमशासकीय अनुदान बांधकामासाठी मिळाले नाही. तात्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार, मदन भोसले त्याचबरोबर दिवंगत सुरेशदादा पळणीटकर, तात्कालीन जिल्हाधिकारी अनिल डिग्गीकर व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बंड, पत्रकार शरद काटकर, तसेच सर्वसामान्य सातारकरांचा सुध्दा मोलाचे सहकार्य व वाटा आहे.गुटखा, तंबाखू इत्यादी व्यसन करून कोणी आल्यास त्यास विनंती करून स्मशानभूमीतून बाहेर जाण्यास विनंती केली जाते. नागरिकांचे सुध्दा यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असते. सीसी टी.व्ही च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा सुध्दा याठिकाणी उपलब्ध असून अशा प्रकारची व्यवस्था राबविणारी महाराष्ट्रातील ही एकमेव स्मशानभूमी आहे. कैलास स्मशानभूमी परिसरातील लोकांची निस्वार्थी भावनेने व विना मोबदला सेवा करीत आहे. यासाठी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक, सदस्य राजेंद्र चोरगे, संजय कदम, उदय गुजर, नितीन माने, खंडेलवाल बंधू, सुधीर शिंंदे, विजय देवी, सुहास राजेशिर्के, अंबाजी देसाई, सुनील चतूर, सुनील खत्री, विजय पवार, दीपक मेथा, युवराज दबडे, बाळासाहेब नाईक प्रयत्नशील आहेत. १६ हजार ५00 मृतदेहांवर अंत्यसंस्कारकैलास स्मशानभूमी मध्ये आज पर्यंत १४ वर्षात १६५०० मृतात्म्यावर अंत्यविधी केले असून या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तसेच अत्यंत गरीब व बेवारस मृतातम्यावर अंत्यसंस्कार करणेसाठी मोङ्खत गोवरी पुरविल्या जात असतात. १२ वर्षापासून पारंपारिक पध्दतीने लाकय्ऋामध्ये दहन केला जात असलेला अंत्यविधी बंद करून शेण्याचा वापर करून दहन करण्यास सुरुवात केली. त्यावेळेपासून आजपर्यंत जवळ जवळ वीस हजार झाडे (१० वर्षे वाढ झालेली) वाचलेली आहेत. शेण आणि पालापाचोळा यापासून गोवरी तयार करण्यात येत असून याची जबाबदारी जिल्हयातील काही बचत गटांना देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्मिती झाली आहे. यामुळे झाडांची होणारी कत्तल थांबनू प्रदूषण कमी होण्यास मदत होऊ लागली आहे.