शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शनिवार पेठ अद्यापही भीतीच्या छायेखाली !

By admin | Updated: January 24, 2016 00:52 IST

इमारत कोसळल्यानंतर : काजवे कुटुंबीय नातेवाइकांकडे; उपायुक्त खोराटे यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : शनिवार पेठेत झालेल्या तीन मजली इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. शनिवारी दिवसभर क्रेनच्या साहाय्याने खुदाई करण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये वाळूची पोती टाकण्यात येत होती; तर साहित्य काढण्याचे काम सुरू होते. घरमालक प्रकाश काजवे कुटुंबीय हे नागाळा पार्क येथील त्यांच्या नातेवाइकांकडे राहावयास गेले आहेत; तर काजवे यांच्या शेजारील चव्हाण कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेचे उपायुक्त विजय खोराटे व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शनिवारी सायंकाळी पाहणी केली. शनिवार पेठेतील साळी गल्लीमध्ये अपार्टमेंटसाठी खुदाई करण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी असलेले प्रकाश काजवे यांची तीन मजली इमारत पत्त्यांच्या इमारतीप्रमाणे कोसळली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आज शनिवार दिवसभर या परिसरात नागरिक घराबाहेर थांबून होते. या ठिकाणी अग्निशामक दलाचा बंब लावण्यात आला आहे. त्याचबरोबर क्रेनच्या साहाय्याने खड्ड्यात बेचिराख झालेले साहित्य काढण्याचे काम सुरू होते; तर शेजारील कोणत्याही इमारतींना धोका पोहोचू नये यासाठी वाळूने भरलेली शंभरहून अधिक पोती टाकण्यात आली. यासाठी पद्माराजे गल्ली (एस.पी. बॉईज) येथून सोन्यामारुती चौकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. बिल्डर करण मानेला होणार अटक शनिवार पेठ, साळी गल्ली येथे नियमापेक्षा जास्त पायाखुदाई करून शेजारील इमारतीला धोका निर्माण केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत बिल्डर करण भगवंतराव माने (रा. नागाळा पार्क) यांच्यावर कलम ३३६, २८८,४२७ (नियमबाह्य व बेपर्वाई) गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक करू, असे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हरिदास घोलप यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. साळी गल्लीत अपार्टमेंट बांधकामासाठी पायाखुदाई सुरू असताना बिल्डर करण माने यांच्या बेपर्वाईमुळे शेजारील प्रकाश काजवे यांची इमारत कोसळली. त्यामध्ये ६५ लाख रुपयांचे नुकसान झाले. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अरुण आबदेव गुजर (रा. रचना अपार्टमेंट, नागाळा पार्क) यांनी बिल्डर माने यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत शुक्रवारी रात्री फिर्याद दिली. पोलिसांनी पंचनामा केला असून काजवे, त्यांचे कुटुंब व शेजाऱ्यांचे जबाब घेतले आहेत. दर्जाकडेही लक्ष द्या : व्ही. बी. पाटील मूळ इमारतीचे बांधकामही चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे शनिवार पेठेतील तीन मजली इमारत कोसळल्याची प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांनी दिली. सिमेंट-कॉँक्रीटची इमारत कशी काय ढासळली, त्याची कारणे काय, याबाबत पाटील म्हणाले, ‘इमारतीचे डिझाईन करून घेण्यास हल्ली पैसे द्यावे लागतात, म्हणून अनेकजण तज्ज्ञांकडून ‘स्ट्रक्चरल डिझाईन’ करून घेत नाहीत. त्यामुळे किती मजले आहेत, कॉलमची क्षमता किती हवी, स्टील किती क्षमतेचे वापरावे, सिमेंट किती वापरवे, याचे निकष पाळतच नाहीत. कित्येकजण सेंट्रिंगवाल्यांकडूनच डिझाईन करून घेतात. त्यांचा तोच इंजिनिअर असतो. कोसळलेल्याइमारतीच्या शेजारच्या बिल्डरने पायाखुदाई जास्त केली हे जसे महत्त्वाचे आहे; तसेच कोसळलेल्या इमारतीच्या बांधकाम दर्जाबाबत सुपरव्हिजन करणाऱ्याने लक्ष दिलेले नाही’ पैसे वाचविण्यासाठी स्वत:सह कुटुंबाचा जीव धोक्यात घालतो. या दुर्घटनेत काजवे कुटुंबीयांचे नशीब बलवत्तर म्हणूनच ते घराबाहेर पडले. त्यामुळे गावठाण भागात घरे बांधताना त्यांच्या दर्जाकडेही लक्ष द्यावे, असे व्ही. बी. पाटील यांनी सुचविले.