शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शनिवार पेठ अद्यापही भीतीच्या छायेखाली !

By admin | Updated: January 24, 2016 00:52 IST

इमारत कोसळल्यानंतर : काजवे कुटुंबीय नातेवाइकांकडे; उपायुक्त खोराटे यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : शनिवार पेठेत झालेल्या तीन मजली इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. शनिवारी दिवसभर क्रेनच्या साहाय्याने खुदाई करण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये वाळूची पोती टाकण्यात येत होती; तर साहित्य काढण्याचे काम सुरू होते. घरमालक प्रकाश काजवे कुटुंबीय हे नागाळा पार्क येथील त्यांच्या नातेवाइकांकडे राहावयास गेले आहेत; तर काजवे यांच्या शेजारील चव्हाण कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेचे उपायुक्त विजय खोराटे व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शनिवारी सायंकाळी पाहणी केली. शनिवार पेठेतील साळी गल्लीमध्ये अपार्टमेंटसाठी खुदाई करण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी असलेले प्रकाश काजवे यांची तीन मजली इमारत पत्त्यांच्या इमारतीप्रमाणे कोसळली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आज शनिवार दिवसभर या परिसरात नागरिक घराबाहेर थांबून होते. या ठिकाणी अग्निशामक दलाचा बंब लावण्यात आला आहे. त्याचबरोबर क्रेनच्या साहाय्याने खड्ड्यात बेचिराख झालेले साहित्य काढण्याचे काम सुरू होते; तर शेजारील कोणत्याही इमारतींना धोका पोहोचू नये यासाठी वाळूने भरलेली शंभरहून अधिक पोती टाकण्यात आली. यासाठी पद्माराजे गल्ली (एस.पी. बॉईज) येथून सोन्यामारुती चौकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. बिल्डर करण मानेला होणार अटक शनिवार पेठ, साळी गल्ली येथे नियमापेक्षा जास्त पायाखुदाई करून शेजारील इमारतीला धोका निर्माण केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत बिल्डर करण भगवंतराव माने (रा. नागाळा पार्क) यांच्यावर कलम ३३६, २८८,४२७ (नियमबाह्य व बेपर्वाई) गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक करू, असे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हरिदास घोलप यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. साळी गल्लीत अपार्टमेंट बांधकामासाठी पायाखुदाई सुरू असताना बिल्डर करण माने यांच्या बेपर्वाईमुळे शेजारील प्रकाश काजवे यांची इमारत कोसळली. त्यामध्ये ६५ लाख रुपयांचे नुकसान झाले. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अरुण आबदेव गुजर (रा. रचना अपार्टमेंट, नागाळा पार्क) यांनी बिल्डर माने यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत शुक्रवारी रात्री फिर्याद दिली. पोलिसांनी पंचनामा केला असून काजवे, त्यांचे कुटुंब व शेजाऱ्यांचे जबाब घेतले आहेत. दर्जाकडेही लक्ष द्या : व्ही. बी. पाटील मूळ इमारतीचे बांधकामही चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे शनिवार पेठेतील तीन मजली इमारत कोसळल्याची प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांनी दिली. सिमेंट-कॉँक्रीटची इमारत कशी काय ढासळली, त्याची कारणे काय, याबाबत पाटील म्हणाले, ‘इमारतीचे डिझाईन करून घेण्यास हल्ली पैसे द्यावे लागतात, म्हणून अनेकजण तज्ज्ञांकडून ‘स्ट्रक्चरल डिझाईन’ करून घेत नाहीत. त्यामुळे किती मजले आहेत, कॉलमची क्षमता किती हवी, स्टील किती क्षमतेचे वापरावे, सिमेंट किती वापरवे, याचे निकष पाळतच नाहीत. कित्येकजण सेंट्रिंगवाल्यांकडूनच डिझाईन करून घेतात. त्यांचा तोच इंजिनिअर असतो. कोसळलेल्याइमारतीच्या शेजारच्या बिल्डरने पायाखुदाई जास्त केली हे जसे महत्त्वाचे आहे; तसेच कोसळलेल्या इमारतीच्या बांधकाम दर्जाबाबत सुपरव्हिजन करणाऱ्याने लक्ष दिलेले नाही’ पैसे वाचविण्यासाठी स्वत:सह कुटुंबाचा जीव धोक्यात घालतो. या दुर्घटनेत काजवे कुटुंबीयांचे नशीब बलवत्तर म्हणूनच ते घराबाहेर पडले. त्यामुळे गावठाण भागात घरे बांधताना त्यांच्या दर्जाकडेही लक्ष द्यावे, असे व्ही. बी. पाटील यांनी सुचविले.