शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

सातारा-कागल सहापदरी रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करणार : चंद्रकांतदादा

By admin | Updated: November 5, 2015 23:57 IST

दोन महिन्यांत निविदा--दृष्टिक्षेपात रस्ते प्रकल्प..

कोल्हापूर : सातारा ते कागलपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाबाबत गुरुवारी दिल्लीत केंद्र सरकारचे रस्ते विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामध्ये करार झाला. त्यानुसार या १३३ किलोमीटरच्या अंतराचे सहापदरी रस्त्याचे अंदाजपत्रक करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पुणे-बंगलोर महामार्गावरील पुणे ते सातारापर्यंतच्या टप्प्याचे सहापदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. कोगनोळीपासून कर्नाटक हद्दीतील सहापदरीकरण यापूर्वीच म्हणजे चौपदरीकरणावेळीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे सातारा ते कागल या रस्त्याचे सहापदरीकरण कधी पूर्ण होणार याबद्दल लोकांत उत्सुकता आहे. कारण हा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचा वापरच करता येणार नाही. या रस्त्याची मालकी नॅशनल हायवे अ‍ॅथारिटीकडे (राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण) आहे. तो चारपदरी करण्याचे काम ठेकेदार म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. या रस्त्याचा विकास करताना त्यासाठी त्याचे मालक असलेल्या नॅशनल हायवे अ‍ॅथारिटीची परवानगी घ्यावी लागते त्या परवानगीचा भाग म्हणून हा करार झाला. सातारा ते कागल या रस्त्याच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. फिजिबिलीटीशी संबंधित अन्य अनुषंगिक मंजुरीची प्रक्रिया रखडली आहे. निविदा मागवल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिक कंपनीची काम करण्याची क्षमता व आर्थिक क्षमता तपासली जाते. ही प्रक्रिया ‘एनएचआय’च्या दिल्ली कार्यालयाकडून होते. त्यामुळे निविदा मागवून ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा-सात महिने लागू शकतात. या रस्त्यासाठी जमिनीचे संपादन यापूर्वीच झाले आहे. त्यामुळे कामामध्ये अन्य कोणताच अडथळा नाही. बसमार्ग, पार्किंग व अन्य अ‍ॅमनेटिजसाठीच नव्याने जमीन संपादन करावी लागेल.दोन महिन्यांत निविदा--सातारा-कागल सहापदरी रस्त्यासाठी येत्या दोन महिन्यांत स्वतंत्र वित्तीय संस्थेकडून या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून घेण्यात येईल व त्यानंतर रीतसर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.दृष्टिक्षेपात रस्ते प्रकल्प..सातारा ते कागल हा टप्पा १३३ किलोमीटरचा असून, रस्त्याचा खर्च २०१२ च्या अंदाजपत्रकानुसार १२९८ कोटी रुपये येणार आहे. पुणे ते सातारा हा टप्पा १४० किलोमीटरचा असून, त्याचा खर्च सुमारे १४०० कोटी रुपयांपर्यंत आहे. हे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतर्फे सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुमाचे सपाटीकरण, आवश्यक तिथे वृक्षतोड, मोऱ्या व पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. दर्जाबाबत प्रश्नचिन्ह...सातारा-कागल या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम राज्य रस्ते महामंडळाने केले आहे. त्याच्या दर्जाबद्दल सुरुवातीपासूनच प्रचंड तक्रारी आहेत. कर्नाटकातील रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून महाराष्ट्राच्या तुलनेत तिथे टोलचे दरही कमी आहेत. त्यामुळे आता नव्याने रस्त्याचे काम होताना दर्जा आणि टोलचे दर या मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.