शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

सातारा महाविद्यालय परिसर चिडीचूप..! लोकमतचा दणका ‘लोकमत’ चे आभार

By admin | Updated: August 25, 2014 22:13 IST

पोलिसांची नजर : टोळीने फिरणाऱ्यांवर कारवाई; विद्यार्थिनी झाल्या निर्भय

सातारा : महाविद्यालयीन परिसरात तरूणींची छेडछाड करणाऱ्या टोळक्याचा बंदोबस्त करण्याचा विडा आता पोलिसांनीही उचलला आहे. महाविद्यालय सुरू झाल्यापासून संपेपर्यंत पोलीस तैनात असल्यामुळे नेहमी गजबजलेला असणारा महाविद्यालय परिसर सोमवारी एकदम चिडीचूप होता. पोलिसांनी टोळक्याने फिरणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई केली.गेल्या काही महिन्यांपासून रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय परिसरात विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्रास देण्याचे प्रकार सुरू होते. याविषयी वेळोवेळी सांगूनही दखल घेतली जात नसल्याने काही युवकांनी याविषयी ‘लोकमत’कडे तक्रार केली. याविषयी सत्यता पडताळून समोर आलेले वास्तव ‘लोकमत’ने मांडले.विद्यार्थी-विद्यार्थिनींवर अर्वाच्च शेरेबाजी करणे, क्षुल्लक कारणावरून मारामारी करणे यांसारखे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत घडत होते. याविषयी वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. संबंधित युवकांची दहशत मोडून काढायची असेल तर सर्वांनीच एकीने त्यांना विरोध करायला शिकले पाहिजे, असा सूर समाजातील विविध स्तरांतून उमटू लागला. या पार्श्वभूमीवर, सोमवारी महाविद्यालय परिसरात साध्या वेशातील आणि गणवेशातील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या समोर असणाऱ्या हॉटेलच्या मागील बाजूस धूम्रपान करणाऱ्या काही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. धूम्रपान करणाऱ्यांबरोबरच टोळीटोळीने फिरणारे विद्यार्थीही आज पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत. कारणाशिवाय नुसत्या गाड्या उडविणाऱ्या मुलांनाही आज पोलिसी खाक्याचे दर्शन घडले. गेल्या काही महिन्यांपासून दहशतीखाली वावरणाऱ्या तरूणींनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता महाविद्यालयात येताना किंवा बाहेर पडताना कुठलेच दडपण जाणवत नाही, अशी प्रतिक्रिया तरूणींनी दिली. (प्रतिनिधी)टोळीने दिला ‘विधायक कामाचा शब्द’समाजातून वाढणाऱ्या दबावामुळे अखेर संबंधित टोळीतील मुलांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन दिलगिरी व्यक्त करत, ‘यापुढे आम्ही असं करणार नाही,’ अशी शपथ घेतली. ‘भविष्यात तरूणींचा सन्मान राखणं आणि विनाकारण कोणाशीही वाद निर्माण न करणं हा शुध्द हेतू ठेवून वावरणार,’ असा शब्दही त्यांनी दिला. ‘यापुढे आमची कोणतीही तक्रार तुमच्याकडे येणार नाही असेच राहू,‘ असा निश्चय करून या टोळीने विधायक सामाजिक कार्य करून मदतीची भूमिका निभावण्याची प्रतिज्ञा केली आहे.महाविद्यालय परिसरात अचानक उभे राहिलेले पोलीस पाहून अनेक विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले. काहींनी सुटकेचा नि:श्वास सोडला तर कोणी भयंकर तणावाखाली आहे. मुलांचे बदललेले चेहरे पाहून पोलिसांनी त्यांना अडविले. यातील काही मुलांच्या बॅगा तपासल्या असता त्यात कोऱ्या वह्या आढळून आल्या. महाविद्यालयात सहज प्रवेश मिळविण्यासाठी ‘सॅक’ अडकवून येणाऱ्यांना पोलिसांनी दम देऊन आवारातून बाहेर काढले. 

‘लोकमत’ चे आभारझुंडशाहीने सुरू असलेल्या टोळीच्या बेलगाम वर्तनावर लेखणीचा आसूड उगारणाऱ्या ‘लोकमत’च्या भूमिकेचे विद्यार्थिनींनी विशेष कौतुक केले. ‘लोकमत’ने लक्ष घातल्यामुळेच तरूणींना या जाचातून सुटका मिळाली. आता महाविद्यालयात येताना आम्हाला कसलेच दडपण जाणवणार नाही. ‘लोकमत’ने पालकत्वाची भूमिका घेऊन हा प्रश्न तडीस नेल्याबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत, असेही तरूणींनी नमूद केले.