शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नोव्हेंबरला पुण्यात सरपंचांचे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:40 IST

गडहिंग्लज : विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याचा कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये पुणे येथे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय पंचायत राज विकास मंच सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ...

गडहिंग्लज : विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याचा कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये पुणे येथे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय पंचायत राज विकास मंच सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष उदय चव्हाण होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या विविध अडचणीबाबत चर्चा झाली. अधिवेशनातील मागण्यासंदर्भातील मुद्याचे निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष पाटील संघटनेतर्फे देण्यात आले.पाटील म्हणाले, सरपंचांच्या मासिक मानधनासह ग्रामपंचायतींच्या विविध प्रश्नांसाठी संघटना मजबूत करण्याची गरज आहे. त्याचा सविस्तर ऊहोपाह अधिवेशनात होईल. ‘सरपंच मासिका’चे प्रकाशनही अधिवेशनात करण्यात येईल.चव्हाण म्हणाले, १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शन आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीचे नियोजन यासह विधान परिषद निवडणुकीतील मतदानाच्या हक्कासाठी राज्यव्यापी संघटना आणि लढाईची गरज आहे.बैठकीस शिवाजी राऊत (शेंद्री), सतीश कोळेकर (बड्याचीवाडी), प्रवीण माळी (करंबळी), रवींद्र घेज्जी (माद्याळ), सुजित देसाई (इंचनाळ), विजयकुमार भुरगुडा (लिंगनूर काा नूल), विजय मोहिते (अत्याळ), बसवराज हिरेमठ (भडगाव), रोहिदास चौगुले (दुगूनवाडी), आशिष साखरे (नेसरी), अरुण मिरजे (हेब्बाळ काा नूल), रेखा जाधव (कौलगे), मारुती कोकितकर (वाघराळी), बाळय्या स्वामी (मुगळी), रोहिणी पाटील (बेकनाळ), गौरी लोंढे (जरळी), आदी उपस्थित होते.सरपंच संघटनेच्या मागण्या अशा..संगणक आॅपरेटर नेमण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला द्यावा, १४ व्या वित्त आयोगातील राखीव निधी केवळ विकासकामावरच खर्ची पडावा, ‘महावितरण’कडून आकारण्यात येणारी ‘पॉवर फॅक्टर पेनाल्टी’ रद्द व्हावी, पथदिव्यांचे लाईटबिल शासनाने द्यावे आणि विद्युत खांबांचे भाडे ग्रामपंचायतीस मिळावे, विधान परिषदेत सरपंचांचा स्वतंत्र प्रतिनिधी असावा, सरपंचांना मासिक २५ हजार मासिक मानधन मिळावे.