शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरला पुण्यात सरपंचांचे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:40 IST

गडहिंग्लज : विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याचा कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये पुणे येथे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय पंचायत राज विकास मंच सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ...

गडहिंग्लज : विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याचा कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये पुणे येथे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय पंचायत राज विकास मंच सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष उदय चव्हाण होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या विविध अडचणीबाबत चर्चा झाली. अधिवेशनातील मागण्यासंदर्भातील मुद्याचे निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष पाटील संघटनेतर्फे देण्यात आले.पाटील म्हणाले, सरपंचांच्या मासिक मानधनासह ग्रामपंचायतींच्या विविध प्रश्नांसाठी संघटना मजबूत करण्याची गरज आहे. त्याचा सविस्तर ऊहोपाह अधिवेशनात होईल. ‘सरपंच मासिका’चे प्रकाशनही अधिवेशनात करण्यात येईल.चव्हाण म्हणाले, १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शन आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीचे नियोजन यासह विधान परिषद निवडणुकीतील मतदानाच्या हक्कासाठी राज्यव्यापी संघटना आणि लढाईची गरज आहे.बैठकीस शिवाजी राऊत (शेंद्री), सतीश कोळेकर (बड्याचीवाडी), प्रवीण माळी (करंबळी), रवींद्र घेज्जी (माद्याळ), सुजित देसाई (इंचनाळ), विजयकुमार भुरगुडा (लिंगनूर काा नूल), विजय मोहिते (अत्याळ), बसवराज हिरेमठ (भडगाव), रोहिदास चौगुले (दुगूनवाडी), आशिष साखरे (नेसरी), अरुण मिरजे (हेब्बाळ काा नूल), रेखा जाधव (कौलगे), मारुती कोकितकर (वाघराळी), बाळय्या स्वामी (मुगळी), रोहिणी पाटील (बेकनाळ), गौरी लोंढे (जरळी), आदी उपस्थित होते.सरपंच संघटनेच्या मागण्या अशा..संगणक आॅपरेटर नेमण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला द्यावा, १४ व्या वित्त आयोगातील राखीव निधी केवळ विकासकामावरच खर्ची पडावा, ‘महावितरण’कडून आकारण्यात येणारी ‘पॉवर फॅक्टर पेनाल्टी’ रद्द व्हावी, पथदिव्यांचे लाईटबिल शासनाने द्यावे आणि विद्युत खांबांचे भाडे ग्रामपंचायतीस मिळावे, विधान परिषदेत सरपंचांचा स्वतंत्र प्रतिनिधी असावा, सरपंचांना मासिक २५ हजार मासिक मानधन मिळावे.