शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

सरपंच मानधनवाढीची अंमलबजावणी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 1:10 AM

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरपंचांची मानधनवाढ आणि सदस्यांना बैठकीसाठीचा भत्ता वाढविण्याच्या ६ सप्टेंबर २०१४ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आदेश निघूनही साडेतीन वर्षे झाली तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील २७ जुलै २००९ च्या शासन निर्णयानुसार ० ते २००० लोकसंख्येच्या ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरपंचांची मानधनवाढ आणि सदस्यांना बैठकीसाठीचा भत्ता वाढविण्याच्या ६ सप्टेंबर २०१४ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आदेश निघूनही साडेतीन वर्षे झाली तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील २७ जुलै २००९ च्या शासन निर्णयानुसार ० ते २००० लोकसंख्येच्या गावच्या सरपंचांना ४०० रुपये, २००१ ते ८००० लोकसंख्या असणाºया गावांच्या सरपंचांना ६०० रुपये आणि ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असणाºया गावच्या सरपंचांना ८०० रुपये मासिक मानधन दिले जाते. यातील ७५ टक्के खर्च शासन करते; तर २५ टक्के खर्च संबंधित ग्रामपंचायतींकडून केला जातो.याच आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्यांना प्रतिबैठक २५ रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आदेशानुसारच सध्या मानधन आणि बैठक भत्ता दिला जातो. भत्त्याचा १०० टक्के खर्च शासनाकडून दिला जातो. हे मानधन आणि बैठक भत्ता अतिशय अल्प असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची सातत्याने मागणी होत होती. सरपंचांच्या मेळाव्यांमधूनही यासाठी पाठपुरावा सुरू होता.याची दखल घेत ६ सप्टेंबर २०१४ रोजीच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र. : व्हीपीएम/२०११/प्र.क्र. ४०/पंरा-३ नुसार सरपंचांचे मानधन आणि बैठक भत्ता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला; तर या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्यांना प्रतिबैठक २०० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या आदेशाची पुढील प्रशासकीय प्रक्रिया केली न गेल्याने अजूनही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. विधानमंडळाची मंजुरी, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद यांपैकी काहीही न झाल्याने जुन्याच दराने सरपंचांना मानधन मिळत असून सदस्यांनाही जुन्याच दराने बैठकीचा भत्ता मिळत आहे.एका जेवणाला मानधन पुरत नाहीशासन सरपंच आणि सदस्यांची एक प्रकारे थट्टाच करीत असल्यासारखी परिस्थिती आहे. एखाद्या कामासाठी जिल्हा परिषदेला जायचे म्हटले तरी भाड्याचा आणि जेवणाचा खर्च हजार रुपयांच्या घरात जात असताना महिन्याला सरपंचांना ८०० रुपये मानधन देणे अव्यवहार्य असल्याची प्रतिक्रिया अनेक सरपंच व्यक्त करीत आहेत. सर्व सदस्यांना घेऊन नाष्ट्याला गेले तरी हे मानधन पुरणारे नाही आणि आमच्याकडून ग्रामविकासाच्या भल्या मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. मात्र आमच्याकडे शासनाचे लक्ष नाही, अशी खंतही अनेक सरपंचांनी व्यक्त केली.