शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सरपंच मानधनवाढीची अंमलबजावणी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:10 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरपंचांची मानधनवाढ आणि सदस्यांना बैठकीसाठीचा भत्ता वाढविण्याच्या ६ सप्टेंबर २०१४ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आदेश निघूनही साडेतीन वर्षे झाली तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील २७ जुलै २००९ च्या शासन निर्णयानुसार ० ते २००० लोकसंख्येच्या ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरपंचांची मानधनवाढ आणि सदस्यांना बैठकीसाठीचा भत्ता वाढविण्याच्या ६ सप्टेंबर २०१४ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आदेश निघूनही साडेतीन वर्षे झाली तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील २७ जुलै २००९ च्या शासन निर्णयानुसार ० ते २००० लोकसंख्येच्या गावच्या सरपंचांना ४०० रुपये, २००१ ते ८००० लोकसंख्या असणाºया गावांच्या सरपंचांना ६०० रुपये आणि ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असणाºया गावच्या सरपंचांना ८०० रुपये मासिक मानधन दिले जाते. यातील ७५ टक्के खर्च शासन करते; तर २५ टक्के खर्च संबंधित ग्रामपंचायतींकडून केला जातो.याच आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्यांना प्रतिबैठक २५ रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आदेशानुसारच सध्या मानधन आणि बैठक भत्ता दिला जातो. भत्त्याचा १०० टक्के खर्च शासनाकडून दिला जातो. हे मानधन आणि बैठक भत्ता अतिशय अल्प असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची सातत्याने मागणी होत होती. सरपंचांच्या मेळाव्यांमधूनही यासाठी पाठपुरावा सुरू होता.याची दखल घेत ६ सप्टेंबर २०१४ रोजीच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र. : व्हीपीएम/२०११/प्र.क्र. ४०/पंरा-३ नुसार सरपंचांचे मानधन आणि बैठक भत्ता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला; तर या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्यांना प्रतिबैठक २०० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या आदेशाची पुढील प्रशासकीय प्रक्रिया केली न गेल्याने अजूनही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. विधानमंडळाची मंजुरी, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद यांपैकी काहीही न झाल्याने जुन्याच दराने सरपंचांना मानधन मिळत असून सदस्यांनाही जुन्याच दराने बैठकीचा भत्ता मिळत आहे.एका जेवणाला मानधन पुरत नाहीशासन सरपंच आणि सदस्यांची एक प्रकारे थट्टाच करीत असल्यासारखी परिस्थिती आहे. एखाद्या कामासाठी जिल्हा परिषदेला जायचे म्हटले तरी भाड्याचा आणि जेवणाचा खर्च हजार रुपयांच्या घरात जात असताना महिन्याला सरपंचांना ८०० रुपये मानधन देणे अव्यवहार्य असल्याची प्रतिक्रिया अनेक सरपंच व्यक्त करीत आहेत. सर्व सदस्यांना घेऊन नाष्ट्याला गेले तरी हे मानधन पुरणारे नाही आणि आमच्याकडून ग्रामविकासाच्या भल्या मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. मात्र आमच्याकडे शासनाचे लक्ष नाही, अशी खंतही अनेक सरपंचांनी व्यक्त केली.