शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जमीन संपादनाअभावी रखडला ‘सर्फनाला’! आजरा पश्चिम भागासह गडहिंग्लजला वरदान ठरणारा प्रकल्प २२० हेक्टर जमीन देय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:52 IST

आजरा : लाभक्षेत्रात आवश्यक असणाºया जमिनीचे संपादन अपूर्ण असल्याने व पारपोली गावठाण या दोन गावांतील जमीन, घरांचे संपादन पूर्ण करणे आवश्यक असल्याने आजºयाच्या

कृष्णा सावंत ।आजरा : लाभक्षेत्रात आवश्यक असणाºया जमिनीचे संपादन अपूर्ण असल्याने व पारपोली गावठाण या दोन गावांतील जमीन, घरांचे संपादन पूर्ण करणे आवश्यक असल्याने आजºयाच्या पश्चिम भागासह गडहिंग्लज तालुक्यातील शेतकºयांना वरदान ठरणारा सर्फनाला प्रकल्प केवळ जमीन संपादनाअभावी रखडला आहे. जून २००० मध्ये या प्रकल्पाला प्राथमिक मंजुरी मिळाली. मात्र, २००८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असली तरी २२० हेक्टर क्षेत्र प्रकल्पग्रस्तांना अद्याप देय आहे.

या प्रकल्पातील पाणी हिरण्यकेशी नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे हिरण्यकेशी काठावरील आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील गावांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. शिवाजी विद्यापीठातर्फे अभ्यास झालेल्या प्रकल्पाच्या सामाजिक परिणामांचा अहवाल अद्याप जाहीर झाला नसल्यामुळे संपादनाची प्रक्रिया रखडली आहे.

आंबाडे येथील तिसºया गावठाणाचा प्रश्न प्रलंबित आहे. पारपोली आणि गावठाण ही दोन गावे प्रामुख्याने पूर्ण विस्थापित झाल्याने संपादनाची प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शेळप, देवर्डे येथे दोन गावठाणे तयार करण्यात आली आहेत. तिसºया ठिकाणी होणाºया नवीन आंबाडे, गावठाणचा प्रश्न प्रलंबित आहे. शेळप, वेळवट्टी, दर्डेवाडी, मेढेवाडी, माद्याळ, विनायकवाडी या गावांतील जमीन संपादित होऊन पसंती करून ताब्यात घेतल्या आहेत. अन्य धरणांच्या तुलनेत पुनर्वसनाची स्थिती बरी असली तरी जमिनी संपादनाची प्रक्रिया थंडावली आहे. देवर्डे आणि पेरणोली येथील खासगी जमिनीची संपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे. पारपोली व देवर्डे गायरान जमिनी पुनर्वसनासाठी वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे.७० हेक्टर जमीन नापीकवेळवट्टी, दर्डेवाडी, मेढेवाडी, माद्याळ, विनायकवाडी या गावांतील जमीन संपादित होऊन पसंती करून ताब्यात घेतली असली तरी यामधील ७० टक्के जमीन नापीक असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे.प्रकल्पातील अडचणी१०९ खातेदारांना १२६.३१ हेक्टर जमिनींचे वाटप होणे बाकी आहे.मुलकी पड जमीन वर्ग करणे आवश्यक.देवर्डे, कोरीवडे व पेरणोली येथील भू-संपादनाची कार्यवाही होणे आवश्यकस्वेच्छा पुनर्वसन घेतलेल्या १२ खातेदारांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.बुडीत क्षेत्रातील पारपोली व गावठाणवाडी गावठाण प्रस्तावानुसार पुनर्वसन होणे आवश्यक आहे.