शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डी.वाय.पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते; संजय पाटील यांनी व्यक्त केली भावना

By विश्वास पाटील | Updated: October 22, 2022 08:43 IST

डी.वाय.पाटील यांचा आज ८७ वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात

विश्वास पाटील, कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांचे गांधी घराण्याशी अनेक वर्षांचे ऋणानुबंध. दिवंगत संजय गांधी यांच्याशी तर त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. ते एकदा डी.वाय.दादांना म्हणाले होते की तुम्ही एकदिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाल..आणि दादांच्याकडे तेवढीच नक्कीच क्षमता होती..दादा शैक्षणिक क्षेत्रात काम करत राहिले, त्यातून त्यांनी जे जग निर्माण केले त्याचे आम्हांला मोठे समाधान आहे. डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ.संजय पाटील आठवणींचा पट उलगडून सांगत होते. निमित्त होतं..डी.वाय.पाटील यांच्या आज, शनिवारी (दि.२२ ऑक्टोबर) होणाऱ्या ८७ व्या वाढदिवसाचे.

मी असेन, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह तीन बहिणी आमच्या सर्वांचे आयुष्य आज जे कांही आहे ते सबकुछ दादा या दोनच शब्दांत सामावलं आहे. ते होते म्हणूनच आम्ही आज हे दिवस पाहिले अशीच कृतार्थभावना या कुटुंबियांच्या मनांत आहे. 

दादा आणि आई शांतादेवी यांचे कष्ट झेलले त्यांच्याच आशिर्वादामुळे आम्ही प्रगतीचा टप्पा गाठला हे खरे असले तरी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या समाजजीवनात डी. वाय. पाटील हा जो एक ब्रॅन्ड तयार झाला, त्याचे सारे श्रेय दादांच्या दूरदृष्टीला, त्यांनी उचललेल्या अपार कष्टाला, गोरगरिबांच्याप्रती त्यांच्या मनांत असलेल्या सहानुभूतीला आहे अशा भावना संजय पाटील यांनी व्यक्त केल्या. डी.वाय. पाटील जसे शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी झाले तसे ते महाराष्ट्राच्या राजकारणातही यशस्वी झाले नसते का या प्रश्नावर संजय पाटील म्हणाले.

शैक्षणिक क्षेत्रात येण्यापूर्वी डी.वाय.पाटील राजकारणात सक्रिय होते. दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील,शंकरराव चव्हाण तसेच राजारामबापू पाटील यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते..ते शिक्षण क्षेत्रात न येता राजकारणात राहिले असते तर नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. पण मागे वळून पाहताना आज आम्हांला त्याची कोणतीही खंत वाटत नाही..कारण त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे उभे केले ते देखील त्याच तोडीचे काम आहे.

ते म्हणाले, दादांनी आम्हांला दोन-तीन महत्वाच्या गोष्टी शिकवल्या. नम्रपणे वागा..लोकांची सेवा करा, त्यांना मदत करा. ही त्यांनी घालून दिलेली वाटच आमच्या जगण्याचा मूलमंत्र बनली. दादांच्या आयुष्याची सुरुवात अत्यंत खडतर झाली. ते सात वर्षाचे असताना आई गेली. सोळा वर्षाचे असताना वडिल गेले. दादा एकटेच. अन्य बहिण-भाऊ कोणी नाहीत. परंतू त्यांच्या जगण्यात लहानपणापासूनच निडरपणा होता. भिती त्यांना माहित नाही. अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी आयुष्याला आकार दिला.

संजय पाटील सांगतात, मी वयाच्या २४ वर्षाचा असताना त्यांनी या शिक्षण समुहाची सुत्रे माझ्याकडे दिली. चेकवर सहीचे अधिकार दिले. त्यानंतर त्यांनी आजअखेर कधीच कोणत्याही गोष्टीचा कधीच माझ्याकडे हिशोब मागितला नाही. एवढ्या लहान वयात त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यास पात्र राहिलो म्हणूनच आज हे सोन्याचे दिवस पाहू शकलो. नुसती संस्थात्मक प्रगतीच नव्हे तर कुटुंब म्हणूनही आम्ही एकमेकांच्या सुखदु:खाशी एकरुप झालो आहोत. दादांनी पेरलेले प्रेम पुढच्या अनेक पिढ्यांना बांधून ठेवण्याइतके नक्कीच मजबूत आहे. त्याचा आम्हांला डी.वाय.पाटील यांची मुले म्हणून नक्कीच आनंद आणि अभिमान आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kolhapurकोल्हापूर