शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

अध्यक्षांकडून सडोली खालसामध्ये स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ ...

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत ग्रामपंचायत शिरोली (पुलाची) येथे खासदार धैर्यशील माने यांनी स्वच्छता श्रमदान व शोषखड्डा बांधकाम प्रारंभ केला, तर ग्रामपंचायत सडोली (खालसा) येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मसोली, ता. आजरा येथे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या सहभागातून स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले.

ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छता श्रमदान करून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत स्वच्छताफेरी व सायकल रॅलीचे आयोजन करून स्वच्छता संदेश देण्यात आला. गावामध्ये स्वच्छतेचे संदेश रंगविण्यात आले. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी गावस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे बांधकाम शुभारंभ व प्लॅस्टिक संकलन करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे उपस्थित होत्या.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

१७०९२०२१ कोल झेडपी ०१

करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.