शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी दिव्यांनी उजळला सांगलीचा आयर्विन पूल

By admin | Updated: August 11, 2014 23:34 IST

सौंदर्यात भर : महापालिकेचा उपक्रम; सांगलीकरांची गर्दी

सांगली : सांगलीच्या लोकजीवनात मानाचे स्थान मिळविलेल्या आयर्विन पुलाचे भाग्य अखेर उजळले. गेली ८५ वर्षे सांगलीकरांना सेवा देणारा हा पूल एलईडी दिव्यांनी उजळला आहे. महापालिकेने या पुलाचे सुशोभिकरण केले असून हा नजारा नजरेत साठवण्यासाठी सांगलीकरांची गर्दी होत आहे. भूतपूर्व सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी १९२७ मध्ये या पुलाचे काम हाती घेतले. सहा लाख रुपये खर्चून हा पूल १८ नोव्हेंबर १९२९ रोजी पूर्ण झाला. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड बॅटन आयर्विन यांच्याहस्ते या पुलाचे उद्घाटन झाल्याने पुलाला ‘आयर्विन पूल’ असे नाव पडले. घडीव दगडांपासून बांधलेल्या या देखण्या, आकर्षक पुलाची लांबी ८२० फूट, रुंदी ३२ फूट, तर उंची ७० फूट आहे. पुलाचे गर्डर्स, आय चॅनेल्स इटलीहून मागविण्यात आले. महापुराचे पाणी पाहण्यासाठी पुलाखाली गॅलरी, जिने यांची व्यवस्था करण्यात आली. सांगलीच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून आयर्विन पुलाकडे पाहिले जाते. राज्यातील अनेक महापालिकांनी आपापल्या क्षेत्रातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन केले आहे. त्यामुळे त्या शहरांची नव्याने ओळख निर्माण झाली आहे. त्याच धर्तीवर सांगली महापालिकेनेही चौक, उद्यानांच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले होते. त्यात ‘आयर्विन’च्या सुशोभिकरणाची संकल्पना स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक यांनी मांडली. ‘आयर्विन’सोबतच वसंतदादा स्मारक, कृष्णाघाट या परिसराचाही सुशोभिकरणात समावेश केला आहे. मुंबई, पुणे, कऱ्हाडहून सांगलीत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आयर्विन पुलाकडूनच स्वागत होत असल्याने या पुलावर एलईडी दिवे बसवून नागरिकांसाठी विरंगुळ्याचे स्थळ निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला. गेल्या तीन महिन्यात खासगी कंपनीच्या माध्यमातून आयर्विन पुलावर एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या गॅलरीतही दिवे बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचे प्रतिबिंब कृष्णेच्या पाण्यात पडत आहे. त्यामुळे ‘आयर्विन’चे सौंदर्य आणखीनच उजळले आहे. पाण्यातून प्रतिबिंबित झालेल्या प्रकाशाने आयर्विनला नवी झळाळी आली आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च झाले आहेत. सध्या तरी एक रुपयाही संबंधित कंपनीला देण्यात आलेला नाही. पुढील पाच वर्षे कंपनीला टप्प्या-टप्प्याने पैसे द्यावयाचे असून देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीही या कंपनीकडेच देण्यात आली आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)सांगलीकरांच्या विरंगुळ्यासाठी उद्याने, चौक सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक आयर्विन पुलावर एलईडी दिवे बसविले आहेत. या दिव्यांमुळे पुलाचे सौंदर्य खुलले असून लवकरच अधिकृत उद्घाटनाचा कार्यक्रमही घेणार आहोत. या कामासाठी ठेकेदाराला टप्प्या-टप्प्याने पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर बोजा पडणार नाही. - राजेश नाईक, सभापती, स्थायी समिती, महापालिका