शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

एलईडी दिव्यांनी उजळला सांगलीचा आयर्विन पूल

By admin | Updated: August 11, 2014 23:34 IST

सौंदर्यात भर : महापालिकेचा उपक्रम; सांगलीकरांची गर्दी

सांगली : सांगलीच्या लोकजीवनात मानाचे स्थान मिळविलेल्या आयर्विन पुलाचे भाग्य अखेर उजळले. गेली ८५ वर्षे सांगलीकरांना सेवा देणारा हा पूल एलईडी दिव्यांनी उजळला आहे. महापालिकेने या पुलाचे सुशोभिकरण केले असून हा नजारा नजरेत साठवण्यासाठी सांगलीकरांची गर्दी होत आहे. भूतपूर्व सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी १९२७ मध्ये या पुलाचे काम हाती घेतले. सहा लाख रुपये खर्चून हा पूल १८ नोव्हेंबर १९२९ रोजी पूर्ण झाला. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड बॅटन आयर्विन यांच्याहस्ते या पुलाचे उद्घाटन झाल्याने पुलाला ‘आयर्विन पूल’ असे नाव पडले. घडीव दगडांपासून बांधलेल्या या देखण्या, आकर्षक पुलाची लांबी ८२० फूट, रुंदी ३२ फूट, तर उंची ७० फूट आहे. पुलाचे गर्डर्स, आय चॅनेल्स इटलीहून मागविण्यात आले. महापुराचे पाणी पाहण्यासाठी पुलाखाली गॅलरी, जिने यांची व्यवस्था करण्यात आली. सांगलीच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून आयर्विन पुलाकडे पाहिले जाते. राज्यातील अनेक महापालिकांनी आपापल्या क्षेत्रातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन केले आहे. त्यामुळे त्या शहरांची नव्याने ओळख निर्माण झाली आहे. त्याच धर्तीवर सांगली महापालिकेनेही चौक, उद्यानांच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले होते. त्यात ‘आयर्विन’च्या सुशोभिकरणाची संकल्पना स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक यांनी मांडली. ‘आयर्विन’सोबतच वसंतदादा स्मारक, कृष्णाघाट या परिसराचाही सुशोभिकरणात समावेश केला आहे. मुंबई, पुणे, कऱ्हाडहून सांगलीत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आयर्विन पुलाकडूनच स्वागत होत असल्याने या पुलावर एलईडी दिवे बसवून नागरिकांसाठी विरंगुळ्याचे स्थळ निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला. गेल्या तीन महिन्यात खासगी कंपनीच्या माध्यमातून आयर्विन पुलावर एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या गॅलरीतही दिवे बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचे प्रतिबिंब कृष्णेच्या पाण्यात पडत आहे. त्यामुळे ‘आयर्विन’चे सौंदर्य आणखीनच उजळले आहे. पाण्यातून प्रतिबिंबित झालेल्या प्रकाशाने आयर्विनला नवी झळाळी आली आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च झाले आहेत. सध्या तरी एक रुपयाही संबंधित कंपनीला देण्यात आलेला नाही. पुढील पाच वर्षे कंपनीला टप्प्या-टप्प्याने पैसे द्यावयाचे असून देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीही या कंपनीकडेच देण्यात आली आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)सांगलीकरांच्या विरंगुळ्यासाठी उद्याने, चौक सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक आयर्विन पुलावर एलईडी दिवे बसविले आहेत. या दिव्यांमुळे पुलाचे सौंदर्य खुलले असून लवकरच अधिकृत उद्घाटनाचा कार्यक्रमही घेणार आहोत. या कामासाठी ठेकेदाराला टप्प्या-टप्प्याने पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर बोजा पडणार नाही. - राजेश नाईक, सभापती, स्थायी समिती, महापालिका