शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सांगलीत टोलचा प्रश्न पुन्हा पेटणार

By admin | Updated: August 6, 2015 00:47 IST

समितीचा आंदोलनाचा इशारा : कंपनीला नुकसान भरपाई देऊन टोल रद्द करण्याची शासनाकडे मागणी

सांगली : अशोका बिल्डकॉन कंपनीस सोळा वर्षे टोल वसुलीसाठी परवानगी देण्याच्या न्यायालयीन निकालानंतर टोलविरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे. शासनाने कंपनीला त्यांची नुकसान भरपाई देऊन या वादावर पडदा टाकावा, अशी मागणी समितीने केली आहे. तातडीने याबाबत शासनाने पाऊल उचलले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. दुसरीकडे कंपनीने पोलीस संरक्षणात टोल वसुलीसाठीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे टोल वसुलीच्या प्रश्नावरून सांगलीत पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. अशोका बिल्डकॉन कंपनीस सांगलीतील टोल वसुलीकरिता दिलेल्या मुदतवाढीबाबत यापूर्वीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश तदर्थ जिल्हा व सत्रन्यायाधीश जी. एस. शेगावकर यांनी सोमवारी दिले. त्यामुळे कंपनीला पुढील १६ वर्षे सांगलीत टोलवसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालाची माहिती मिळाल्यानंतर लगेचच सांगलीतील टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक झाली असून, प्रमुख नेत्यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेतली. न्यायालयीन निर्णयास वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने कंपनीच्या नुकसान भरपाईची रक्कम त्यांना देऊन जनतेच्या डोक्यावरील टोलचे ढग हटवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सर्वच सामाजिक संघटना, पक्षीय पदाधिकारी आता टोलप्रश्नी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे टोलचा हा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) सांगलीत आज सर्वपक्षीय बैठक सांगलीतील टोलच्या प्रश्नावर सर्वपक्षीय टोलविरोधी समितीची बैठक गुरुवारी दुपारी ३ वाजता बोलावण्यात आली आहे. सांगलीच्या काँग्रेस भवनजवळील शासकीय विश्रामगृहात ही बैठक होणार आहे. निमंत्रक सतीश साखळकर यांनी, आंदोलनात यापूर्वी सहभागी असलेले सर्व पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नव्याने काही संघटना या आंदोलनात येण्यास इच्छुक असल्यास त्यांनीही या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या बैठकीत टोलप्रश्नी सर्वांची मते जाणून घेऊन काही निर्णय घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर कृती समितीच्यावतीने आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.