शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सांगली-सातारा कॉँग्रेस स्वबळावर लढणार

By admin | Updated: October 23, 2016 00:52 IST

े. सांगलीतून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते.

सांगली : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची जागा काँग्रेसला दिली नाही, तर ही जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय शनिवारी काँग्रेसच्या मुंबई येथील बैठकीत घेण्यात आला. दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांनी याबाबतचा आग्रह धरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अन्य ठिकाणच्या जागांबद्दल आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असले तरी, यातील बहुतांश जागांवर स्वबळाचाच आग्रह स्थानिक नेत्यांकडून धरला जात आहे. मुंबईतील टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. मधुकरराव चव्हाण, खा. हुसेन दलवाई, भाई जगताप, आदी उपस्थित होते. सांगलीतून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते. सांगली-सातारा विधान परिषदेची जागा काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचे सांगली-सातारा जिल्ह्यांतील नेत्यांनी अशोक चव्हाण यांना सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे ही जागा काँग्रेसला देण्याची मागणी करण्यात येईल. त्यांनी या गोष्टीस नकार दिला, तर स्वबळावर काँग्रेस ही जागा लढेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या अन्य जागांविषयीसुद्धा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी केली जात आहे. तरीही याविषयीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येईल, असे चव्हाण यांनी बैठकीत सांगितले. स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय मुंबईत झाल्यानंतर सांगलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. काँग्रेसकडून इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त जाहीर केला. (प्रतिनिधी)चर्चेपूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी उमेदवारीची घोषणा करून आघाडीचे संकेत मोडले आहेत. सांगली-सातारा विधान परिषदेच्या जागेचे गणित फिसकटले, तर अन्य जागांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्यस्थितीत आघाडी तुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, असे घडले तर दोन्ही पक्षांना कमी-अधिक तोटा होणार आहे. दोन्ही काँग्रेसमधील संघर्षाचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. - विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी