शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

सांगली-कोल्हापूर महामार्ग ठप्प

By admin | Updated: December 19, 2015 01:17 IST

अंकलीत ‘स्वाभिमानी’चा चक्का जाम : तीन तास आंदोलन, सांगलीतील कारखान्यांना ८०:२० प्रमाणे ऊसदर मान्य

जयसिंगपूर : सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ८०:२० फॉर्म्युल्याप्रमाणे दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली-कोल्हापूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. अंकली टोलनाका येथे सकाळी ११ वाजता ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली. सुमारे तीन तास महामार्ग रोखून धरला होता. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ८०:२० प्रमाणे दर देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी गुरुवारी बैठक घेऊन ८०:२० फॉर्म्युल्याप्रमाणे दर देण्याचे मान्य केले आहे. त्याप्रमाणेच सर्वच कारखान्यांनी दर द्यावा, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली असून, सांगली जिल्ह्यात सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी चक्का जाम आंदोलन पुकारले होते. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक, मिलिंद साखरपे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली-कोल्हापूर महार्गावरील अंकली टोलनाका येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता चक्का जाम आंदोलनास प्रारंभ झाला. आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ८०:२० फॉर्म्युल्याप्रमाणे दर देण्याचे मान्य केले असल्याची माहिती सावकर मादनाईक यांनी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विठ्ठल मोरे, शैलेश आडके, सागर मादनाईक, शैलेश चौगुले, गुंडा कोरे, शांताराम पाटील, सागर शंभुशेटे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)