शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

सांगलीत डॉक्टर दाम्पत्यास अटक

By admin | Updated: August 14, 2015 23:03 IST

चौकशीत दोषी : मुलाचा मृत्यू प्रकरण

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील दिगंबर चंद्रकांत आरते (वय ६) या मुलाचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याप्रकरणी पंचमुखी रस्त्यावरील नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. भूषण विश्वास कुलकर्णी (वय ३७) व त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती (३६) यांना शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. चार महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी वैद्यकीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी सुरू होती. चौकशीत कुलकर्णी दाम्पत्य दोषी आढळल्याने अखेर त्यांच्याविरुद्ध दिगंबरच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे.दिगंबर यास टॉन्सिलचा त्रास होता. यासाठी त्याचे वडील चंद्रकांत आरते हे त्याला घेऊन कुलकर्णी यांच्या रुग्णालयात गेले होते. कुलकर्णी यांनी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले होते. त्यानुसार ३० एप्रिल २०१५ रोजी दिगंबरला शस्त्रक्रियेसाठी कुलकर्णी यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. साडेदहा वाजता शस्त्रक्रिया पूर्ण आणि यशस्वी झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले होते. तथापि, दिगंबर शुद्धीवर आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. तो रडू लागला. त्यामुळे ज्योती कुलकर्णी यांनी दिगंबरला इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडत गेली. कुलकर्णी दाम्पत्याने त्यास दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. वडिलांनी त्याला तातडीने तेथून हलविले, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. कुलकर्णी दाम्पत्याच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप चंद्रकांत आरते यांनी केला होता. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृतदेहाची विच्छेदन तपासणी करण्यात आली होती. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीचा अहवाल राखून ठेवला होता. त्यामुळे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. हे प्रकरण चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञ समितीकडे गेले होते. सहाजणांची ही समिती होती. त्यांनी पोलिसांनी केलेल्या तपासाची तसेच कुलकर्णी दाम्पत्याने केलेल्या औषधोपचाराची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली होती. तीन महिन्यांपासून समितीकडून चौकशी सुरू होती. दोन दिवसांपूर्वी चौकशीचे काम पूर्ण झाले. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी जी काळजी घ्यायला हवी ती कुलकर्णी दाम्पत्याने घेतली नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच दिगंबरचा मृत्यू झाल्याचे समितीने चौकशीत म्हटले आहे. तसा अहवालही त्यांनी पोलिसांना दिला. त्यानुसार पोलिसांनी कुलकर्णी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. याप्रकरणी चंद्रकांत आरते यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)पोलीस हात हलवित परतलेपोलीस उपनिरीक्षक आर. के. वाईकर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. कुलकर्णी दाम्पत्याला अटक करण्यासाठी वाईकर यांचे पथक शुक्रवारी सकाळी त्यांच्या रुग्णालयात गेले होते, पण डॉक्टर दाम्पत्य महत्त्वाच्या शस्त्रक्रियेत असल्याचे समजल्याने पथक हात हलवित परतले. मात्र, त्यांनी या दाम्पत्याला दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले होते. त्यानुसार ते हजर झाल्यानंतर अटक केली.रक्तस्त्रावामुळे मृत्यूदिगंबरच्या विच्छेदन तपासणीचा अहवाल राखून ठेवून व्हिसेरा काढून घेण्यात आला होता. तपासणीसाठी तो पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवालही दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. यामध्ये शस्त्रक्रियेनंतर दिगंबरच्या घशातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. हे रक्त फुफ्फुसात गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.