शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

किसान सभेतर्फे आजपासून संघर्ष सप्ताह;केंद्र शासनाच्या अन्यायी धोरणाला विरोध

By समीर देशपांडे | Updated: June 23, 2024 14:14 IST

नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना केवळ सरासरी ६.८ टक्के अशी शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली असून या अन्यायाविरुद्ध किसान सभा आज सोमवारपासून २९ जूनपर्यंत संघर्ष सप्ताह पाळणार आहे.

कोल्हापूर : नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना केवळ सरासरी ६.८ टक्के अशी शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली असून या अन्यायाविरुद्ध किसान सभा आज सोमवारपासून २९ जूनपर्यंत संघर्ष सप्ताह पाळणार आहे. या काळात सत्याग्रह आणि निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने राज्य कौन्सिल सदस्य गिरीश फोंडे, दिनकर सुर्यवंशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.

फोंडे म्हणाले, सरकारने खते आणि शेती अवजारे याची सबसिडी बंद करून त्यावर जीएसटी कराचा बोजा लावला आहे. दुष्काळी मदत, पीकविमा यात शेतकरी विरोधी धोरण राबवून नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. कार्पोरेट कंपन्यांच्या हितसंबंधासाठी आयात परवाने मोकाट द्यायचे आणि शेतकऱ्यांना लाभ देण्याची वेळ आली कि निर्यातबंदी लादायची हा अनुभव महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना सातत्याने आलेलाच आहे.‬‬‬‬‬‬

कापूस पिकाची हमी किंमत अत्यंत कमी वाढ दिली आहे.  भाजप सरकारने ‪२०२२-२३ आर्थिक वर्षात करमुक्त कापूस आयात २०० टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. या मध्ये १७०३.३७ बिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे १५ हजार कोटी रुपयांची कापूस गाठींची आयात करून कापूस उत्पादकांना यातना दिल्या आहेत. परिणामी महाराष्ट्र राज्यात दर ८ तासाला शेतकरी आत्महत्या होत आहेत.‬‬‬‬‬ या धोरणाविरोधात हा संघर्ष सप्ताह पाळण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा सचिव नामदेव पाटील, मारूती नलवडे,बाळासाहेब पाटील, सदाशिव पाटील, के.डी. पाटील, तात्यासाो पाटील, रघुनाथ माने, सदाशिव पाटील उपस्थित होते.