शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

संरक्षणाच्या यादीतून वगळले चंदनाचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST

कोल्हापूर : वृक्षतोड अधिनियमानुसार संरक्षित असलेल्या चंदनाचे झाड तोडण्यासाठी आता वनविभागाची परवानगी लागणार नाही. वनविभागाने एप्रिलमध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या ...

कोल्हापूर : वृक्षतोड अधिनियमानुसार संरक्षित असलेल्या चंदनाचे झाड तोडण्यासाठी आता वनविभागाची परवानगी लागणार नाही. वनविभागाने एप्रिलमध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतात असलेले चंदनाचे झाड वनविभागाच्या संरक्षण असणाऱ्या यादीतून वगळण्यात आले आहे. औषधी वनस्पती म्हणून चंदनाची झाडे ओळखली जातात. वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार चंदनाची झाडे तोडण्यास वनविभागाची परवानगी घ्यावी लागत होती.

यात श्वेतचंदन आणि रक्तचंदन अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर अनेकदा चंदनाची झाडे लावली जात होती; परंतु ती झाडे तोडण्यास वनविभागाची परवानगी लागत होती. मात्र, आता नव्या अधिसूचनेनुसार अशा परवानगीची गरज उरलेली नाही. हे झाड आता शेतातील पीक म्हणूनच गृहीत धरले जात आहे. राज्यात आतापर्यंत पाचशे हेक्टर क्षेत्रात चंदनाच्या झाडाची लागवड आहे.

नव्या अधिसूचनेनुसार चंदनाचे झाड हे शेतकऱ्याचे पीक म्हणून गृहीत धरले असून लागवडीसाठी ते अनुदानासही पात्र समजले जात आहे. याशिवाय याच्या रोपवाटिकेसाठीही अनुदान दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांकडून चंदनाच्या झाडांचे नुकसान झाल्यास त्यासाठीही भरपाई देण्याची तरतूद आता करण्यात आली आहे.

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबतच्या अधिसूचना १९६४ (३४) च्या कलम २, खंड फ अनुसार राज्य सरकारने अधिसूचना काढून चंदनाचे झाड संरक्षणाच्या यादीतून वगळले आहे. या अधिनियमात अनुसूचित अनुक्रमांक ८ मधील चंदनाशी संबंधित नोंद वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. २३ मार्च २०२१ राेजी राज्यपालांच्या आदेशानुसार राजपत्रात याची नोंद झाली आहे.

पूजेसाठी आणि औषधासाठी चंदनाची मोठी मागणी आहे. या नव्या अध्यादेशामुळे शेतकरी चंदन लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळू शकतो. मात्र, सरसकट चंदन तोडले गेल्यास त्याचे पर्यावरणीय परिणामही होणार आहेत. मुळात कोणतेही झाड तोडण्यास परवानगी लागत असताना चंदनाला त्यातून वगळण्यास वाईट संदेश जाईल, असे वनस्पतीतज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेल्याच चंदनाची झाडे तोडण्यापुरते हा अध्यादेश पाहिला जावा, असे मत प्रा. मधुकर बाचुळकर यांनी व्यक्त केले आहे.

ही झाडे तोडण्यास लागते परवानगी

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबतच्या अधिसूचना १९६४ (३४) च्या कलम २, खंड फ अनुसार हिरडा, साग, मोह, चिंच, आंबा, जांभूळ, खैर, चंदन, तिवस, अंजन, किंजन, फणस, हळदू, बीजा, ऐन, मॅन्ग्रोव्ह आदी १६ झाडांची तोड करण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते.

(संदीप आडनाईक)