शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापुरात सनई, चौघड्यांच्या साथीने व्यवसाय सुरु, राजारामपुरीत रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 19:07 IST

CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर शहरातील सर्वप्रकारची व्यावसायिक दुकाने सोमवारी सुरु झाली.

ठळक मुद्देकोल्हापुरात सनई, चौघड्यांच्या साथीने व्यवसाय सुरुराजारामपुरीत रॅली

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर शहरातील सर्वप्रकारची व्यावसायिक दुकाने सोमवारी सुरु झाली.

प्रशासनाने निर्बंध उठवल्यामुळे राजारामपुरीत व्यापारी, दुकानदारांनी बैलगाडीतून सनई, चौघड्यांसह रॅली काढून व्यवसाय सुरु झाल्याचा आनंद व्यक्त केला. सर्व व्यवसाय सुरु झाल्याने अनेक दिवसांपासून रिकामे वाटणारे रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली.कोल्हापूर जिल्ह्यात पहिली लाट ओसरल्यानंतर साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये कोल्हापुरातील सर्व व्यवसाय सुरु झाले. परंतु, व्यावसायिक, व्यापारी यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याने पुन्हा व्यवसाय बंद ठेवावे लागले. शासनाचे निर्बंध, जनता कर्फ्यू, संपूर्ण लॉकडाऊन अशा विविध कारणांनी गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील अनेक दुकाने बंद होती. ती सुरु करावीत, असा व्यापाऱ्यांचा तगादा सुरु होता.

यासाठी निवेदने, गाठीभेटीद्वारे राज्य शासनाला विनंती करण्यात आली होती. परंतु, जोपर्यंत तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा येत नाही, तोपर्यंत प्रशासनाने व्यवसायाला परवानगी नाकारली होती.अखेर सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने शहरातील निर्बंध आणखी शिथील केले आणि अत्यावश्यक, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सरसकट सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे व्यापारी, दुकानदारांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण होते.

व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी कालपासूनच तयारी सुरु केली होती. दुकानांच्या साफसफाईसह पूजेची तयारी केली होती. सोमवारी सकाळी व्यापारी, दुकानदारांनी पुन्हा असा प्रसंग येऊ नये, अशी भावना व्यक्त करत दुकानात पाऊल टाकले.राजारामपुरीत व्यापाऱ्यांची रॅली प्रशासनाने निर्बंध शिथील केल्यामुळे राजारामपुरीत सकाळी व्यापाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ राजारामपुरी जनता बझार येथून रॅली काढण्यात आली. ही रॅली मुख्य मार्गावरुन मारुती मंदिर व परत बस रुटने गेली. रॅलीमध्ये सनई, चौघडा होता. व्यापाऱ्यांच्या हातात जनजागृती करणारे फलक होते.

राजारामपुरीत खरेदीसाठी येणाऱ्या ज्या ग्राहकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांच्यासाठी खास डिस्काऊंट देण्याचा निर्णय राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली. आमचा हा प्रयत्न व्यवसाय वाढीसाठी नाही तर लसीकरणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर