शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

कोल्हापुरात दुपारनंतर रस्त्यावर सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : भाजी मंडईसह सर्व अत्यावश्यक सेवा फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे कोल्हापुरात बुधवारी दुपारनंतर सर्व व्यवहार ...

कोल्हापूर : भाजी मंडईसह सर्व अत्यावश्यक सेवा फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे कोल्हापुरात बुधवारी दुपारनंतर सर्व व्यवहार बंद झाले, परिणामी शहरातील सर्व रस्ते सामसूम झाले. पोलीस आणि महानगरपालिका पथकांनी सकाळी अकरानंतर सक्रिय होत सर्वच रस्त्यांवर फिरून अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यास भाग पाडले.

कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत चालला असून रुग्ण संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे दि. १५ एप्रिलपासून राज्यातील संचारबंदी काळातील नियम अधिक कडक केले होते. केवळ भाजी मार्केटसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या निमित्ताने पुन्हा मोठी गर्दी व्हायला लागली होती.

बाजारपेठेत गर्दी वाढत गेल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिकच वाढला, तसेच बाजारपेठेत फिरणारे नागरिक, भाजी विक्रेते कोरोनाबाधित असूनही राजरोसपणे फिरत असल्याचे ॲन्टिजेन चाचणी केल्यानंतर स्पष्ट झाले. कडक निर्बंध लादूनही रुग्ण वाढत आहेत म्हटल्यावर राज्य सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजी मंडई सकाळच्या सत्रात फक्त सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरातील चित्र ‘सकाळी गर्दी आणि दुपारनंतर सामसूम’ असेच होते.

सकाळी कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरी, शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट, रेल्वे फाटक, राजारामपुरी, पंचगंगा नदी घाट, कसबा बावडा येथे भरणाऱ्या नियमित भाजी मंडईत तसेच सानेगुरुजी, रायगड कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क परिसरातील रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या मंडईत भाजी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बेकरी, खाद्यपदार्थांच्या दुकानातही गर्दी दिसून आली. सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत सर्वच ठिकाणी असे चित्र होते. दुपारी बारा वाजले तरी व्यवहार सुरूच राहिले. त्यानंतर मात्र महापालिका पथकांच्या तसेच पोलिसांच्या गाड्या शहरातून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करीत फिरायला लागल्या. या पथकांनी अर्ध्या तासात सर्व व्यवहार बंद केले.

फक्त पेट्रोल पंप सुरू -

अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद झाल्यामुळे शहरात खऱ्या अर्थाने संचारबंदी असल्याचे जाणवले. काही हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनी पार्सल सुविधा सुरू ठेवल्या होत्या. औषध दुकाने आणि पेट्रोल पंप सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून वडाप रिक्षा सुरू होत्या, त्याही बंद झाल्या. रस्त्यावरील वाहनांची गर्दी रोडावली. दुपारी दोननंतर तर सर्वच रस्ते अक्षरश: ओस पडले. केवळ रुग्णवाहिका आणि त्यांच्या सायरनचा आवाजच पाहायला मिळाला.